शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

शोषितांच्या भावना कवितांमधून व्यक्त करणारा काव्यसंग्रह : उन्हाळ झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:16 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी ज्येष्ठ कवी निंबाजीराव बागुल यांच्या ‘उन्हाळ झळा’ या काव्यसंग्रहाचा थोडक्यात करून दिलेला परिचय.

नंदुरबार स्थित ज्येष्ठ कवी निंबाजीराव हरिभाऊ बागुल यांचा ‘उन्हाळ झळा’ हा दुसरा काव्यसंग्रह आहे. समाजातील शोषित, कष्टाळू, श्रमिक वर्गाला ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात. या काव्यसंग्रहात ५३ कवितांचा समावेश असून, निखळ सामाजिक प्रबोधनाला चालना मिळावी हा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण व शहरी वाड्या-वस्त्यातील सामान्य माणसांची व्यथा, वेदना बोलकी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विविध क्षेत्रातील प्रस्थापितांचा सर्व स्तरावरील शोषणाचा लेखाजोखा हा त्यांच्या कवितांचा विषय आणि आशय आहे. असे असले तरी कुणाच्या वैयक्तिक वा सांघिक भावनेवर कवितेतून त्यांनी प्रहार केलेला नाही. व्यापक सामाजिक हितसंबंध जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. तथापि, अमानवी विघातक प्रवृत्तीबद्दलचा सात्विक रोष व्यक्त करताना सामाजिक बांधिलकी त्यांनी जपलेली आहे. याबाबत ‘शापित गाव’ या कवितेत कवी निंबाजीराव बागुल लिहितात,हासूनी छेडण्याचा हा डाव माणसांचा,पाठीत वार करण्याचा सराव माणसांचा.फसवे मुखवटे हे नेमके गर्दीत झाकलेले, व्यथेवर मीठ, चोळण्याचा बनाव माणसांचा.अशा काही कविता वास्तवतेचे भान जागवतात.आपल्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची ससेहोलपट, दुष्काळाने ग्रामीण समाजाचा मोडलेला कणा, शेतकºयांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाºया आत्महत्या, स्त्रियांचे सामाजिक शोषण, न संपणारा बेरोजगारीचा प्रश्न या काव्यसंग्रहातून मांडण्याचा कवीने प्रयत्न केला आहे.कवी : निंबाजीराव बागुल , प्रकाशक : कुसुमाग्रज प्रकाशन, पृष्ठे ७६, मूल्य ८० रुपये.