शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शोषितांच्या भावना कवितांमधून व्यक्त करणारा काव्यसंग्रह : उन्हाळ झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:16 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी ज्येष्ठ कवी निंबाजीराव बागुल यांच्या ‘उन्हाळ झळा’ या काव्यसंग्रहाचा थोडक्यात करून दिलेला परिचय.

नंदुरबार स्थित ज्येष्ठ कवी निंबाजीराव हरिभाऊ बागुल यांचा ‘उन्हाळ झळा’ हा दुसरा काव्यसंग्रह आहे. समाजातील शोषित, कष्टाळू, श्रमिक वर्गाला ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात. या काव्यसंग्रहात ५३ कवितांचा समावेश असून, निखळ सामाजिक प्रबोधनाला चालना मिळावी हा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण व शहरी वाड्या-वस्त्यातील सामान्य माणसांची व्यथा, वेदना बोलकी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विविध क्षेत्रातील प्रस्थापितांचा सर्व स्तरावरील शोषणाचा लेखाजोखा हा त्यांच्या कवितांचा विषय आणि आशय आहे. असे असले तरी कुणाच्या वैयक्तिक वा सांघिक भावनेवर कवितेतून त्यांनी प्रहार केलेला नाही. व्यापक सामाजिक हितसंबंध जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. तथापि, अमानवी विघातक प्रवृत्तीबद्दलचा सात्विक रोष व्यक्त करताना सामाजिक बांधिलकी त्यांनी जपलेली आहे. याबाबत ‘शापित गाव’ या कवितेत कवी निंबाजीराव बागुल लिहितात,हासूनी छेडण्याचा हा डाव माणसांचा,पाठीत वार करण्याचा सराव माणसांचा.फसवे मुखवटे हे नेमके गर्दीत झाकलेले, व्यथेवर मीठ, चोळण्याचा बनाव माणसांचा.अशा काही कविता वास्तवतेचे भान जागवतात.आपल्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची ससेहोलपट, दुष्काळाने ग्रामीण समाजाचा मोडलेला कणा, शेतकºयांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाºया आत्महत्या, स्त्रियांचे सामाजिक शोषण, न संपणारा बेरोजगारीचा प्रश्न या काव्यसंग्रहातून मांडण्याचा कवीने प्रयत्न केला आहे.कवी : निंबाजीराव बागुल , प्रकाशक : कुसुमाग्रज प्रकाशन, पृष्ठे ७६, मूल्य ८० रुपये.