शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

वृक्षलागवडीत ठेकेदाराकडून केली जातेय बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 21:43 IST

  पाळधी, ता.जामनेर : पाळधीसह परिसरात वृक्षलागवडीसाठी शासनामार्फत रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र, मिळालेल्या रोपांमध्ये ठेकेदारामार्फत बनवाबनवी ...

 

पाळधी, ता.जामनेर : पाळधीसह परिसरात वृक्षलागवडीसाठी शासनामार्फत रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र, मिळालेल्या रोपांमध्ये ठेकेदारामार्फत बनवाबनवी केली जात असल्याचा प्रकार ८ जुलै रोजी पाळधी येथे उघडकीस आला आहे. हाच प्रकार सोनाळे, दोदवाडे, शेरी व लोंढरी, एकुलतीसह तालुक्यात बहुतांश ठिकाणी पाहायला मिळाला.शासनामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला ३२०० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत ३२०० रोपे वाटप करण्यात येत आहेत. परंतु हे फक्त कागदावरच असल्याचे जाणवत आहे. प्रत्यक्षात फारच कमी रोपे मिळत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडून प्राप्त होत आहेत. सोनाळे येथे सरपंचपती रवींद्र पाटील, संभाजी पाटील, संदीप पाटील, पवीण कापडे, योगेश गुरव, रामा लोहार यांनी रोपांची मोजणी केली. त्या ठिकाणी ६२१ रोपे प्राप्त झाली. तर दोदवाडे येथे १०८० रोपे मिळाली. परंतु दोन्ही ठिकाणी पोहोचपावती मात्र ३२०० रोपांची देण्यात आली. प्राप्त झालेली रोपेसुद्धा फारच लहान आहेत तर काही निरुपयोगी असल्याचा सूर ग्रामस्थांमधून निघत आहे. यावरून झाडे लागवडीचा प्रकार केवळ कागदावरच होत असल्याचे निदर्शनास येत आहे.वृक्षलागवडीच्या मोहिमेत होत असलेली बनवाबनवी थांबवावी. केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी नव्हे तर वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणासाठी असे प्रकार घडू नयेत. एकीकडे वृक्षलागवडीसाठी शासनाकडून मोठ्या स्वरूपात मोहीम सुरू असताना असा प्रकार घडणे चुकीचे आहे. ग्रामपातळीवर ग्रमस्थ, शालेय विद्यार्थी वृक्षलागवडीसाठी उत्सुक आहेत. मात्र, शासनाकडून तिपटीने कमी रोपे मिळत असतील तर संकल्पपूर्ती होणे अशक्य आहे. अनेक समाजसेवी संस्थांकडून तसेच वैयक्तिक खर्चाने रोपे विकत घेऊन लागवड करता येऊ शकते. पण, ग्रामीण भागात शेतक-यांकडे मोठे आर्थिक संकट आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन प्रत्येक गावात ठरावीक प्रमाणात आणि वेळेत रोपे उपलब्ध करून द्यावीत, अशा आशयाच्या प्रतिक्रिया ग्रमस्थांनी व्यक्त केल्या.