शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नियोजन विभागाकडे पावणेतीन लाखांचे वीजबिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:23 IST

जळगाव : जिल्हा नियोजन विभागाकडे तब्बल दोन लाख ७५ हजार रुपयांचे वीजबिल थकले असून याविषयी महावितरणने नियोजन विभागाला नोटीस ...

जळगाव : जिल्हा नियोजन विभागाकडे तब्बल दोन लाख ७५ हजार रुपयांचे वीजबिल थकले असून याविषयी महावितरणने नियोजन विभागाला नोटीस दिली आहे. सभागृहाचा खर्च व आवक यांचा ताळमेळ करताना मोठी कसरत होत असून शासनाकडूनही निधी मिळत नसल्याने नियोजन विभागाचेच आर्थिक नियोजन कोलमडत आहे.

जिल्हा नियोजन विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुसज्ज असे नियोजन सभागृह उभारून देण्यात आले. मात्र, त्यासाठी शासनाकडून कोणताही निधी दिला जात नाही. यात नियोजन सभागृह बैठका, काही कार्यक्रमांसाठी भाड्याने देऊन त्यातूनच हा खर्च करायचा असतो. शिवाय, या ठिकाणी असलेल्या वीज उपकरणांमुळे येणारे वीजबिलही या भाड्यातूनच भरावयाचे असते.

एखाद्या कार्यक्रमासाठी हे सभागृह दिल्यास त्याचे १८ हजार रुपये भाडे आकारले जाते. मात्र, येथील देखभाल, दुरुस्ती व कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या विजेचा वापर हे पाहता वीजबिल वाढते. सध्या येथे काम करणाऱ्या दोघांचा पगार कसाबसा केला जातो. मात्र, वीजबिल भरणे कठीण होत आहे. यासाठी शासनाकडूनही निधी देण्यास नकार असतो. त्यामुळे नियोजन विभागाकडे दोन लाख ७५ हजारांचे वीजबिल थकले आहे.