शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यात २६ लाख ५२ हजार कापसाच्या बियाणांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी पूर्ण झाली असून, जवळपास ७० हजार हेक्‍टर क्षेत्रावर हंगामपूर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी पूर्ण झाली असून, जवळपास ७० हजार हेक्‍टर क्षेत्रावर हंगामपूर्व कापसाची लागवडदेखील करण्यात आली आहे. यंदा कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाकडून २६ लाख ५२ हजार ६०० पाकिटे कापसाच्या बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच १ लाख ३३ हजार मेट्रिक टन खतांचा साठादेखील कृषी विभागाकडून उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी दिली.

जिल्ह्यात जवळपास साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड केली जात असते. त्यात ७० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड जिल्ह्यात होत असते. यावर्षीदेखील जिल्ह्यात ५ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे, तर सोयाबीनच्या क्षेत्रातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अंदाजे ७० हजार हेक्‍टर क्षेत्रावर हंगामपूर्व कापसाची लागवडदेखील करण्यात आली असून, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी व मान्सूनपूर्व पावसामुळे हंगामपूर्व कापसाला फायदा होणार आहे.

आता प्रतीक्षा मान्सूनची

मे महिन्यातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागती पूर्ण केल्या असून, आता पेरणीसाठी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. यावर्षी जिल्ह्यात चांगल्या पावसासह उत्पन्नदेखील चांगले यावे यासाठी शेतकरी वरुणराजाकडे प्रार्थना करत आहे. उडीद, मूग व सोयाबीनची लागवड जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या व जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यातच केली जात असते. जिल्ह्यात १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. जूनच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात जिल्ह्यात चांगल्या प्रकारे मान्सून सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्हा व तालुकास्तरावर १६ भरारी पथकांची स्थापना

कोविड पार्श्वभूमीवर सर्व निविष्ठांची सुलभ वाहतूक आणि पुरवठा करण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवणे, बियाणे खते व कीटकनाशके यांची गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तत्काळ निराकरण करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यावर्षी गुणवत्ता नियंत्रण कार्यवाहीसाठी निरीक्षकनिहाय व महिनानिहाय नियोजन केलेले आहे. जिल्ह्यात ११५२ बियाणांचे नमुने, ६७५ खतांचे नमुने व ३९५ कीटकनाशकांचे नमुने काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील बियाणे खते व कीटकनाशके उत्पादन स्थळ व साठवणूक स्थळ तपासणी तसेच जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील उत्पादकांचे साठवणूक स्थळ तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

- कापसासाठी बियाणे - २६ लाख ५२ हजार ६०० पाकिटे

-१ लाख ३३ हजार मेट्रिक टन खतांचा साठा

- ११ हजार ९४५ मेट्रिक टन खतांचा बफर स्टॉक

- सोयाबीनसाठी ७ हजार ५०० बियाणांचे नियोजन