शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सर्व घरांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत समाविष्ट गावांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन स्वयंस्फूर्तीने करावे, ...

जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत समाविष्ट गावांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन स्वयंस्फूर्तीने करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. या योजनेतून कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावे व सर्व घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होईल यासाठी नियोजन करावे, अशाही सूचना यावेळी पालकममंत्र्यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन सभागृहात शुक्रवारी दुपारी जलजीवन मिशन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, ग्रामीण पुरवठा विभागाचे गजभिये, निकम यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावल व रावेर तालुक्यातील ६०३ गावांसाठी ६४१ कोटींचा आराखडा

जल जीवन मिशन ही महत्त्वपूर्ण योजना असून, या योजनेत राज्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्हा समाविष्ट असल्याने जिल्ह्यासाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे, असे पालकमंत्री म्हणाले. या योजनेसाठी जिल्ह्यातील यावल व रावेर या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यात ६०३ गावांचा ६४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे सांगत जिल्ह्यात हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहनही त्यांनी यंत्रणांना केले.

शाळा व अंगणवाड्यांना प्राधान्याने पाणीपुरवठा करा

पाणीटंचाई असलेल्या गावांना पाण्याचा पुरवठा करताना पाण्याचे स्रोत निश्चित करण्यात यावे, यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या. शाळा व अंगणवाड्यांना पाण्याचा पुरवठा प्राधान्याने होईल यासाठी नियोजन करण्याची सूचनाही उपस्थितांनी केली.