शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

सर्व घरांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत समाविष्ट गावांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन स्वयंस्फूर्तीने करावे, ...

जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत समाविष्ट गावांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन स्वयंस्फूर्तीने करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. या योजनेतून कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावे व सर्व घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होईल यासाठी नियोजन करावे, अशाही सूचना यावेळी पालकममंत्र्यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन सभागृहात शुक्रवारी दुपारी जलजीवन मिशन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, ग्रामीण पुरवठा विभागाचे गजभिये, निकम यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावल व रावेर तालुक्यातील ६०३ गावांसाठी ६४१ कोटींचा आराखडा

जल जीवन मिशन ही महत्त्वपूर्ण योजना असून, या योजनेत राज्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्हा समाविष्ट असल्याने जिल्ह्यासाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे, असे पालकमंत्री म्हणाले. या योजनेसाठी जिल्ह्यातील यावल व रावेर या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यात ६०३ गावांचा ६४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे सांगत जिल्ह्यात हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहनही त्यांनी यंत्रणांना केले.

शाळा व अंगणवाड्यांना प्राधान्याने पाणीपुरवठा करा

पाणीटंचाई असलेल्या गावांना पाण्याचा पुरवठा करताना पाण्याचे स्रोत निश्चित करण्यात यावे, यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या. शाळा व अंगणवाड्यांना पाण्याचा पुरवठा प्राधान्याने होईल यासाठी नियोजन करण्याची सूचनाही उपस्थितांनी केली.