शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

मातृप्रेमावर दगड ठेवून कोरोना रुग्णांना लावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:39 IST

कोरोनाचा नायनाट केल्याशिवाय आमचे कर्तव्य थांबणार नाही, असा दृढनिश्चयच कोविड रुग्णालय सांभाळणाऱ्या महिला डॉक्टर, नर्स या रणरागिणींनी केला आहे.

ठळक मुद्देमहिला डॉक्टर व परिचारिका यांच्या त्यागामुळे अनेकांचे थांबणारे श्वास पुन्हा झाले सुरूकोविड सेंटरला काम करतो म्हणून परिसरातील नागरिकांचा सामाजिक बहिष्कार, मनाला दु:ख होतेकोरोनाच्या वेदनेपेक्षा मायेच्या वेदना, मात्र कर्तव्याने त्या वेदनांवर फुंकर घालून मनाला आनंदकोरोनाचा कहर माजला होता तेव्हा अनेकांनी सांगितले की, सोडा ही नोकरी

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : आपल्या लहान बाळांना वृद्ध आई-वडील, सासू-सासरे यांच्याकडे ठेवून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्या कोरोनाशी लढत आहेत. त्यांच्या यशस्वी लढ्याने अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. कोरोनाचा नायनाट केल्याशिवाय आमचे कर्तव्य थांबणार नाही, असा दृढनिश्चयच कोविड रुग्णालय सांभाळणाऱ्या महिला डॉक्टर, नर्स या रणरागिणींनी केला आहे.अमळनेर तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर व प्रताप महाविद्यालयात कोविड केयर सेंटर आहेत. दोन्ही ठिकाणी महिला डॉक्टर आणि परिचारिका आपल्या जीवाची पर्वा न करता पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करीत आहेत.डॉ.वर्षा पाटील या आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून कोरोना काळात रुजू झाल्या. त्यांचे पती डॉ.प्रशांत पाटील हेही कोविड सेंटरला सेवा देत आहेत. आपल्या पाच वर्षांच्या मुलाला वयस्कर सासूच्या स्वाधीन करून कर्तव्यावर यावे लागते. घरी गेल्यावर मुलाला चेहराही दाखवता येत नाही. मास्क घालून त्याच्याशी बोलावे लागते. मातृत्वावर दगड ठेवून कोविड रुग्णांसाठी मायेचा पाझर फोडावा लागतो. अंगात ताप आणि अंगदुखी असतानाही सारे दुखणे विसरून आधी कर्तव्याला प्राधान्य देत आहोत. कोविड सेंटरला काम करतो म्हणून परिसरातील, आजूबाजूच्या नागरिकांनी टाकलेल्या सामाजिक बहिष्काराला सामोरे जाताना मनाला दु:ख होते, पण अनेकांना जगण्यासाठी आपण धीर देतो याचा आनंद आहे, असे सांगून वर्षा पाटील म्हणाल्या की, दीपिका साळुंखे आणि त्यांचे पती पॉझिटिव्ह आले. आॅक्सिजन ६५ ते ७० होता. रुग्ण मानसिकदृष्ट्या खचले होते. त्यांना भक्कम केले. उपचार केले आणि ते सुखरूप घरी गेले.माधवी गायकवाड या परिचारिकेने सांगितले की, अडीच वर्षाची मुलगी घरी आई-वडिलांजवळ टाकून येते. त्यांना मधुमेह, रक्तदाब आहे, त्यांची काळजी घेण्याची स्थिती असताना त्यांना दुर्लक्षित करून रुग्णांजवळ जावून इंजेक्शन, औषधी देऊन त्यांना आधारही द्यावा लागत आहे. सेवा करताना स्वत: पॉझिटिव्ह आली. १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. बाराव्या दिवशी पुन्हा सेवेत हजर झाली. अडीच वर्षाच्या मुलीचे तोंडही पाहता आले नव्हते. कोरोनाच्या वेदनेपेक्षा मायेच्या वेदना खूप होत्या. मात्र कर्तव्याने त्या वेदनांनावर फुंकर घालून मनाला खूप आनंद दिला आहे. २७ वर्षांचा संदीप जिजाबराव पाटील ग्रामीण रुग्णालयात आला. त्याचा आॅक्सिजन ६७ होता. परंतु त्याला धीर दिला, लक्ष दिले. त्याची स्वत:ची मानसिकता बळकट होऊन तो घरी गेला.यासह डॉ.शिरीन बागवान यादेखील पाच वर्षांच्या मुलाला जळगावला ठेवून सेवेसाठी येतात. डॉ.आरती नेरपवार, डॉ.तनुश्री फडके यादेखील आपल्या परिवाराला सोडून कोरोनाग्रस्तांची सेवा करीत आहेत. निखद सय्यद परिचारिका सेवा करताना पॉझिटिव्ह आल्या. पुन्हा लगेच सेवेत हजर झाल्या. कल्याणी बडगुजर आपल्या दोन वर्षांच्या मुलीला डायलिसिसची रुग्ण असलेल्या सासूजवळ सोडून कोरोनाग्रस्ताची सेवा करतेय. राजश्री पाटील १० जणांचे कुटुंब सोडून घरातील तीन ते १३ वर्षांची चार मुले वाºयावर सोडून रुग्णसेवेत वेळेवर हजर होते. त्यांच्यासह प्रमुख परिचारिका सुवार्ता वळवी, शुभांगी श्रावणे, सोनाली महिरास, कोमल सस्तरने, प्रगती वानखेडे, लता चौधरी, पूनम नेरे, वैशाली चव्हाण या महिला परिचारिका, वार्ड लेडी आपली सेवा चोख बजावत आहेत.कोरोनाचा कहर माजला होता. तेव्हा अनेकांनी या महिलांना सांगितले की, सोडा ही नोकरी, परंतु काहींचे पती त्यांच्यासोबत सेवेत आहेत. त्यांनी पाठबळ दिले, काहींनी स्वत:च ठाम निश्चय केला की, हीच सेवा करायची.चार पाच रुग्ण असे होते की, त्यांना खासगी रुग्णालयात नेऊनही फरक पडला नव्हता. रुग्ण जीव गमावतात की काय अशी स्थिती होती. त्यांना विश्वासात घेऊन ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यांना प्रेमाने धीर दिला. बळ दिले. वेळेवर औषधी दिल्या. स्वत:चा डोळा लागू दिला नाही. मात्र त्या रुग्णांची काळजी घेतली. काही दिवसात ते सुखरूप परतले आणि जाताना त्यांनी व्यक्त केलेले ऋण व शेरेबुकात दिलेला शेरा आम्हाला आणखी ताकद देऊन गेला. यापेक्षा अधिक आनंद काय असेल, अशा भावना या महिला कर्मचाºाांनी व्यक्त केल्या.रुग्ण दाखल करायला बेड उपलब्ध नसायचा. नातेवाईक केविलवाणे होऊन विनवण्या करायचे. तडजोड म्हणून खालीदेखील बेड टाकून त्याही रुग्णांना वाचवून घरी रवाना केले, परंतु कंटाळा कधीच केला नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmalnerअमळनेर