शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा यंत्रणा भेदून कारागृहात पिस्तुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:40 IST

कारागृहाची लक्तरे वेशीवर

जळगाव : कारागृहातून कैदी पलायन होण्याची ही पहिली वेळ नसली तरी येथील सुरक्षा यंत्रणा भेदून एक नाही तर तब्बल तीन गावठी पिस्तुल कारागृहात येतात,याला नक्कीच कारागृह प्रशासन जबाबदार असून या घटनेमुळे कारागृहाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. दरम्यान, कारागृहाच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही यंत्रणा सहा महिन्यापासून बंद असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.पिस्तुलचा धाक दाखवून सुशील अशोक मगरे (३२,रा.कसबे पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील (२१, रा.तांबापुरा,अमळनेर) व सागर संजय पाटील (२२, पैलाड,अमळनेर) या तीन न्यायालयीन बंदींनी कारागृहातून फिल्मीस्टाईल पलायन केल्याची थरारक घटना उघड झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व त्यांचे पथक कारागृहात दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या चौकशीत कारागृहात अनेक गंभीर प्रकार उघड झाले असून बॅरेक व भींत यांच्यातील अंतर तसेच अंतर्गत सुरक्षेबाबत होणारा हलगर्जीपणा तसेच अनेक उणिवा आढळून आल्या आहेत.कारागृह शहराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करु : पालकमंत्रीया घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कारागृहात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, या कारागृहात तटबंदीची गरज आहे. दोनशे बंदींची क्षमता असताना चारशेपेक्षा बंदी येथे आहेत, त्याशिवाय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अधीक्षकपद रिक्त आहे, पंधरा दिवसापूर्वी प्रभारी अधीक्षकाची नियुक्ती झाली आहे. यात कारागृह प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला असे म्हणता येणार नाही. सकाळी बंदी बाहेर येण्याची वेळ असते. रक्षक बेसावध असतानाही ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तरतूद केली जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे कारागृह शहराबाहेर असणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न केले जातील. पळालेल्या संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.एलसीबीचे सहा पथके रवानातीन बंदी पलायन झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जिल्ह्याच्या सर्व सिमांवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी तातडीने सहा पथके जिल्ह्यात रवाना केले. या तिघांना पळवून नेणारा जगदीश पाटील व एक जण असे दोघं सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास पारोळा शहरातून दुचाकीवर जाताना दिसल्याचेही सांगितले जात होते.रक्षकाची पोलीस व महानिरीक्षकांकडून चौकशीया प्रकरणात रक्षक पंडीत गुंडाळे यांच्यावरही संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व त्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी दुपारपर्यंत चौकशी केली.पंडीत गुंडाळे म्हणाले अपयश आले, पण जीव वाचला !या थराराक घटनेबाबत रक्षक पंडीत गुंडाळे यांना ‘लोकमत’ने बोलते केले असता ते म्हणाले, त्यांनी ‘आपबिती’ कथन केली. तिघांजवळ गावठी पिस्तुल होते. सुशील मगरे याने डोक्याला पिस्तूल लावून शिवीगाळ केली. दुसºयाने कॉलर पकडून जमिनीवर पाडले. खिशातून चावी काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला प्रतिकार केला. मात्र तिघांच्या ताकदीपुढे माझी ताकद अपूर्ण पडली, त्यामुळे ते पळाले. त्यात त्यांना यश व मला अपयश आले, पण माझा जीव वाचला. तिनही बंदीचा इतिहास हा शस्त्रांचाच आहे. यापूर्वी त्यांनी गोळीबार केला आहे. डोळ्यासमोर साक्षात मृत्यू असताना त्याच्यातून नशिबानेच बचावलो, अशी भावना गुंडाळे यांनी व्यक्त केली.उपमहानिरीक्षकांकडून दोन तास झाडाझडती... बंद्यांनी पलायन केल्याची माहिती मिळाल्यानंतर कारागृहाचे उपमहानिरीक्षक दिलीप झळके तातडीने औरंगाबाद येथून जळगावात दाखल झाले. दुपारी ४ वाजता ते कारागृहात पोहचले व सायंकाळी ६ वाजता परत औरंगाबादकडे रवाना झाले. दोन तासात त्यांनी कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासह रक्षक पंडीत गुंडाळे यांची चौकशी केली. काही बॅरेकला त्यांनी भेटी दिल्या. सीसीटीव्ही बंद असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, त्याशिवाय गावठी पिस्तुल कारागृहात कसे काय आले याचाही त्यांनी अधीक्षकांना जाब विचारला. दरम्यान, या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ ला दिली.भींतीवरुन पिस्तूल फेकल्याचा संशयसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहाच्या पाठीमागे असलेल्या गणेश नगरातून शुक्रवारी एका व्यक्तीने भींतीवरुन कारागृहात तीन पिस्तुल फेकले व ते सुशील, सागर व गौरव या तिघांनी घेतले. सुशील मगरे हा जगदीश पाटील (रा.पिंपळकोठा, ता. पारोळा) या तरुणाच्या संपर्कात होता. कुटुंब इतर नातेवाईकांच्या क्रमांकात मगरे याने कारागृह प्रशासनाकडे राहूल याचा मोबाईल क्रमांक दिलेला होता. त्यामुळे मोबाईलवर बोलून त्यांनी पिस्तुल आणण्यापासून तर पलायन करण्यापर्यंतचे नियोजन केले होते, त्यासाठी जगदीश हा शनिवारी सकाळीच कारागृहाच्या बाहेर काही अंतरावर दुचाकी घेऊन थांबला होता असेही तपासात निष्पन्न झालेले आहे. दरम्यान, याआधी देखील कारागृहात शस्त्र, गांजा, दारु व इतर साहित्य आढळून आलेले होते. त्याशिवाय कैदी पलायनाच्या घटनाही घडलेल्या आहेत. भींतीवरुन उडी घेऊन पलायन करणे व या भींतीवरुनच शस्त्र व इतर साहित्य कारागृहात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव