शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

सुरक्षा यंत्रणा भेदून कारागृहात पिस्तुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:40 IST

कारागृहाची लक्तरे वेशीवर

जळगाव : कारागृहातून कैदी पलायन होण्याची ही पहिली वेळ नसली तरी येथील सुरक्षा यंत्रणा भेदून एक नाही तर तब्बल तीन गावठी पिस्तुल कारागृहात येतात,याला नक्कीच कारागृह प्रशासन जबाबदार असून या घटनेमुळे कारागृहाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. दरम्यान, कारागृहाच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही यंत्रणा सहा महिन्यापासून बंद असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.पिस्तुलचा धाक दाखवून सुशील अशोक मगरे (३२,रा.कसबे पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील (२१, रा.तांबापुरा,अमळनेर) व सागर संजय पाटील (२२, पैलाड,अमळनेर) या तीन न्यायालयीन बंदींनी कारागृहातून फिल्मीस्टाईल पलायन केल्याची थरारक घटना उघड झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व त्यांचे पथक कारागृहात दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या चौकशीत कारागृहात अनेक गंभीर प्रकार उघड झाले असून बॅरेक व भींत यांच्यातील अंतर तसेच अंतर्गत सुरक्षेबाबत होणारा हलगर्जीपणा तसेच अनेक उणिवा आढळून आल्या आहेत.कारागृह शहराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करु : पालकमंत्रीया घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कारागृहात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, या कारागृहात तटबंदीची गरज आहे. दोनशे बंदींची क्षमता असताना चारशेपेक्षा बंदी येथे आहेत, त्याशिवाय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अधीक्षकपद रिक्त आहे, पंधरा दिवसापूर्वी प्रभारी अधीक्षकाची नियुक्ती झाली आहे. यात कारागृह प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला असे म्हणता येणार नाही. सकाळी बंदी बाहेर येण्याची वेळ असते. रक्षक बेसावध असतानाही ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तरतूद केली जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे कारागृह शहराबाहेर असणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न केले जातील. पळालेल्या संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.एलसीबीचे सहा पथके रवानातीन बंदी पलायन झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जिल्ह्याच्या सर्व सिमांवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी तातडीने सहा पथके जिल्ह्यात रवाना केले. या तिघांना पळवून नेणारा जगदीश पाटील व एक जण असे दोघं सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास पारोळा शहरातून दुचाकीवर जाताना दिसल्याचेही सांगितले जात होते.रक्षकाची पोलीस व महानिरीक्षकांकडून चौकशीया प्रकरणात रक्षक पंडीत गुंडाळे यांच्यावरही संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व त्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी दुपारपर्यंत चौकशी केली.पंडीत गुंडाळे म्हणाले अपयश आले, पण जीव वाचला !या थराराक घटनेबाबत रक्षक पंडीत गुंडाळे यांना ‘लोकमत’ने बोलते केले असता ते म्हणाले, त्यांनी ‘आपबिती’ कथन केली. तिघांजवळ गावठी पिस्तुल होते. सुशील मगरे याने डोक्याला पिस्तूल लावून शिवीगाळ केली. दुसºयाने कॉलर पकडून जमिनीवर पाडले. खिशातून चावी काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला प्रतिकार केला. मात्र तिघांच्या ताकदीपुढे माझी ताकद अपूर्ण पडली, त्यामुळे ते पळाले. त्यात त्यांना यश व मला अपयश आले, पण माझा जीव वाचला. तिनही बंदीचा इतिहास हा शस्त्रांचाच आहे. यापूर्वी त्यांनी गोळीबार केला आहे. डोळ्यासमोर साक्षात मृत्यू असताना त्याच्यातून नशिबानेच बचावलो, अशी भावना गुंडाळे यांनी व्यक्त केली.उपमहानिरीक्षकांकडून दोन तास झाडाझडती... बंद्यांनी पलायन केल्याची माहिती मिळाल्यानंतर कारागृहाचे उपमहानिरीक्षक दिलीप झळके तातडीने औरंगाबाद येथून जळगावात दाखल झाले. दुपारी ४ वाजता ते कारागृहात पोहचले व सायंकाळी ६ वाजता परत औरंगाबादकडे रवाना झाले. दोन तासात त्यांनी कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासह रक्षक पंडीत गुंडाळे यांची चौकशी केली. काही बॅरेकला त्यांनी भेटी दिल्या. सीसीटीव्ही बंद असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, त्याशिवाय गावठी पिस्तुल कारागृहात कसे काय आले याचाही त्यांनी अधीक्षकांना जाब विचारला. दरम्यान, या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ ला दिली.भींतीवरुन पिस्तूल फेकल्याचा संशयसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहाच्या पाठीमागे असलेल्या गणेश नगरातून शुक्रवारी एका व्यक्तीने भींतीवरुन कारागृहात तीन पिस्तुल फेकले व ते सुशील, सागर व गौरव या तिघांनी घेतले. सुशील मगरे हा जगदीश पाटील (रा.पिंपळकोठा, ता. पारोळा) या तरुणाच्या संपर्कात होता. कुटुंब इतर नातेवाईकांच्या क्रमांकात मगरे याने कारागृह प्रशासनाकडे राहूल याचा मोबाईल क्रमांक दिलेला होता. त्यामुळे मोबाईलवर बोलून त्यांनी पिस्तुल आणण्यापासून तर पलायन करण्यापर्यंतचे नियोजन केले होते, त्यासाठी जगदीश हा शनिवारी सकाळीच कारागृहाच्या बाहेर काही अंतरावर दुचाकी घेऊन थांबला होता असेही तपासात निष्पन्न झालेले आहे. दरम्यान, याआधी देखील कारागृहात शस्त्र, गांजा, दारु व इतर साहित्य आढळून आलेले होते. त्याशिवाय कैदी पलायनाच्या घटनाही घडलेल्या आहेत. भींतीवरुन उडी घेऊन पलायन करणे व या भींतीवरुनच शस्त्र व इतर साहित्य कारागृहात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव