शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

पिंपळगाव कमानी तांड्यावर शुल्लक कारणावरून महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 16:10 IST

मारेकऱ्याला जिल्हा रूग्णालयातून अटक

पहूर ता जामनेर :- पिंपळगाव कमानी तांडा, ता. जामनेर येथील रहिवासी भोजराज सावजी राठोड याने शुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण( ६०) या वृद्ध महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका टाकल्याने ती गतप्राण झाली. ही घटना गुरवारी सकाळी आठ वाजता घडलीे. याप्रकरणी पहूर पोलीसांनी संबधीत युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करूनअटक केली आहे.प्राप्त माहिती नुसार अंगणात बैल गाडी सोडण्याच्या कारणावरून भाऊलाल मदन चव्हाण व भोजराज सावजी राठोड यांच्यात भांडण होऊन हाणामारी झाली. यादरम्यान शांताबाई मदन चव्हाण या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता भोजराज सावजी राठोड याने या महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने महिला जमीनीवर कोसळून प्रचंड रक्त स्त्राव झाला. ही घटना पाहून भोजराज याने स्वत: चे डोके फोडून घेतले.यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत शांताबाईला पहूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.पाचोरा विभागाचे डिवायएसपी ईश्वर कातकडे, सपोनि राजेश काळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परीस्थिती वर नियंत्रण ठेवले. तसेच चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी पहूर येथे भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती घेतली. तपास पोउपनिरीक्षक किरण बर्गे करीत आहे.अटक केल्यावर मृतदेह घेतला ताब्यातभोजराज याने घटनेनंतर पलायन केले. त्यामुळे जोपर्यंत भोजराजला अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयत महिलेच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे सहाय्यक फौजदार अनिल अहिरे व भरत लिंगायत यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेतांना भोजराजला अटक केली आहे.त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार केले. भाऊलाल मदन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भोजराज राठोड विरुद्ध भा.द.वी.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोजराज कोणभोजराज हा रेशन दुकानदार आहे. गावातील काही नागरीकांनी त्याच्याविरुद्ध रेशन संदर्भात तहसीलदार यांच्या कडे तक्रारी केल्या आहेत. तक्रार करणाºया नागरिकांशी भोजराज भांडण करीत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे भोजराजला बोलता येत नाही.पोलीसांचा धाक संपूष्टातगेल्या काही काळापासून पहूर पोलीस स्टेशनहद्दीत शुल्लक कारणावरून भांडण व त्याचे रूपांतर हाणामारीत होत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस कारवाई थातुरमातुर होत असल्याने सबंधित समाजकंटकांना जरब बसत नसल्याने कमानीतांडा, कासली, वाकडी य ागावातखुनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलीसांचा धाक संपुष्टात आल्याचे बोलले जात असून सर्व सामान्य नागरिक भयभीत झाले आहे.