शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पिंपळगाव कमानी तांड्यावर शुल्लक कारणावरून महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 16:10 IST

मारेकऱ्याला जिल्हा रूग्णालयातून अटक

पहूर ता जामनेर :- पिंपळगाव कमानी तांडा, ता. जामनेर येथील रहिवासी भोजराज सावजी राठोड याने शुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण( ६०) या वृद्ध महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका टाकल्याने ती गतप्राण झाली. ही घटना गुरवारी सकाळी आठ वाजता घडलीे. याप्रकरणी पहूर पोलीसांनी संबधीत युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करूनअटक केली आहे.प्राप्त माहिती नुसार अंगणात बैल गाडी सोडण्याच्या कारणावरून भाऊलाल मदन चव्हाण व भोजराज सावजी राठोड यांच्यात भांडण होऊन हाणामारी झाली. यादरम्यान शांताबाई मदन चव्हाण या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता भोजराज सावजी राठोड याने या महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने महिला जमीनीवर कोसळून प्रचंड रक्त स्त्राव झाला. ही घटना पाहून भोजराज याने स्वत: चे डोके फोडून घेतले.यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत शांताबाईला पहूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.पाचोरा विभागाचे डिवायएसपी ईश्वर कातकडे, सपोनि राजेश काळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परीस्थिती वर नियंत्रण ठेवले. तसेच चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी पहूर येथे भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती घेतली. तपास पोउपनिरीक्षक किरण बर्गे करीत आहे.अटक केल्यावर मृतदेह घेतला ताब्यातभोजराज याने घटनेनंतर पलायन केले. त्यामुळे जोपर्यंत भोजराजला अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयत महिलेच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे सहाय्यक फौजदार अनिल अहिरे व भरत लिंगायत यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेतांना भोजराजला अटक केली आहे.त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार केले. भाऊलाल मदन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भोजराज राठोड विरुद्ध भा.द.वी.३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोजराज कोणभोजराज हा रेशन दुकानदार आहे. गावातील काही नागरीकांनी त्याच्याविरुद्ध रेशन संदर्भात तहसीलदार यांच्या कडे तक्रारी केल्या आहेत. तक्रार करणाºया नागरिकांशी भोजराज भांडण करीत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे भोजराजला बोलता येत नाही.पोलीसांचा धाक संपूष्टातगेल्या काही काळापासून पहूर पोलीस स्टेशनहद्दीत शुल्लक कारणावरून भांडण व त्याचे रूपांतर हाणामारीत होत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस कारवाई थातुरमातुर होत असल्याने सबंधित समाजकंटकांना जरब बसत नसल्याने कमानीतांडा, कासली, वाकडी य ागावातखुनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलीसांचा धाक संपुष्टात आल्याचे बोलले जात असून सर्व सामान्य नागरिक भयभीत झाले आहे.