शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

फिजिक्स आणि केमिस्ट्रीने विद्यार्थ्यांना फोडला घाम! एकाच नावाने उडाला गोंधळ

By सुनील पाटील | Updated: May 7, 2023 21:19 IST

परिक्षा केंद्राबाहेर आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले.

जळगाव : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यात १३ केंद्रांवर पार पडली. फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांनी विद्यार्थ्यांना प्रचंड घाम फोडला. दर आठवड्याला घेण्यात येत असलेल्या टेस्टपेक्षाही कठीण प्रश्न या परीक्षेत होते, त्यामुळे निम्मेही प्रश्न सोडविणे विद्यार्थ्यांना कठीण गेले. परिक्षा केंद्राबाहेर आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले.

या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकूण २ हजार ८८४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. प्रत्यक्षात २ हजार ८५२ विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली. तर ३२ विद्यार्थी विविध कारणांनी परीक्षा देऊ शकले नाही. ही परीक्षा जिल्ह्यात एकूण १३ केंद्रांवर घेण्यात आली. यामध्ये जळगाव शहरातील दोन केंद्रांचा समावेश होता.तालुका पातळीवर काही केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी २ ते ५.२० या वेळेत नीट परीक्षा पार पडली. या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांवर एकूण ७२० प्रश्न विचारण्यात आले. बायोलॉजीचे ३६० तर फिजिक्स व केमिस्ट्री या विषयावर आधारित प्रत्येकी १८० प्रश्न होते. या प्रश्नांची सोडवणूक करताना विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक झाली. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली.

अनेक विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर करण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रस टेस्ट म्हणजेच ‘नीट’ परीक्षा देणे बंधनकारक आहे. यंदाच्या परीक्षेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या प्रश्नांनी घाम फोडला. तुलनेत बायोलॉजीचे प्रश्न तितके अवघड नव्हते, असे काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. यावेळी प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. कोणत्याच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती नीट परीक्षा जिल्हा समन्वयक प्रा.अब्राहम मॅथ्यू यांनी दिली.

एकाच नावाचे शाळांमुळे गोंधळपोद्दार इंटरनॅशनल हे परिक्षेचे केंद्र होते. या नावाने जळगाव चाळीसगाव येथे शाळा आहेत. परिक्षा मात्र चाळीसगाव केंद्रावर होती.त्यामुळे काही विद्यार्थी जळगावच्या शाळेत आले होते. हे केंद्र नसल्याचे कळाल्यावर ते चाळीसगाव रवाना झाले. हा किरकोळ गोंधळ वगळता परिक्षा कुठेही वाद झाला नाही. शांततेत परीक्षा पार पडली. 

टॅग्स :examपरीक्षा