शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी फिरफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:15 IST

उस्मानिया पार्क परिसर : रस्ते व गटारींचीही सुविधा नाही उस्मानिया पार्कमधील नागरिकांची व्यथा : उन्हाळ्यात बोअरवेलचा आधार लोकमत न्यूज ...

उस्मानिया पार्क परिसर : रस्ते व गटारींचीही सुविधा नाही

उस्मानिया पार्कमधील नागरिकांची व्यथा : उन्हाळ्यात बोअरवेलचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजी नगरला लागून असलेल्या उस्मानिया पार्क परिसरात गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन न टाकण्यात आल्यामुळे रहिवाशांची गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी फिरफिर होत आहे. तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच या परिसरात रस्ते व गटारींचीही समस्या कायम आहे. लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्याचीही सुविधा न करण्यात आल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या उस्मानिया पार्क परिसरात गेल्या दहा वर्षांत मोठ्या संख्येने नागरी वस्ती वाढली. मात्र, दहा वर्षांपासून असलेल्या समस्या आजही जैसे थे आहेत. या नागरिकांना सुरुवारीपासून पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. या परिसरात मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांना हुडको व दाळफड या भागातून सायकलीने किंवा दुचाकीने पाणी आणावे लागत आहे. ज्या नागरिकांकडे बोअरवेल आहेत, त्या नागरिकांना जास्त अडचणींचा सामना करावा लागत नसून, बोअर वेल नसलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

हुडको व दाळफड मध्ये नळांना पाणी आल्यावर उस्मानिया पार्क परिसरातील नागरिक, ग्रामीण भागातील नागरीकांना प्रमाणे डोक्यावर किंवा सायकली द्वारे पाणी आणावे लागत आहे. पाणी भरण्यासाठी पुरुषांसह महिलांनाही फिरफिर करावी लागत आहे.

दरम्यान, उन्हाळ्यात तर अनेक नागरिकांच्या बोअर वेलचे पाणी कमी होत असते. त्यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचेही येथील महिलांनी सांगितले.

इन्फो :

तरीही पाईप लाईन टाकण्यात आली नाही :

या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, हुडको व दाळफड या भागात पर्यंत मनपातर्फे पाईप लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, उस्मानिया पार्क परिसरात पाईप लाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरीकांना हुडको व दाळफड भागात पाणी घेण्यासाठी जावे लागत आहे. दरम्यान, मनपातर्फे याच भागात इतक्या वर्षात पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्याचे सांगितले. तसेच या परिसरात गटारी व रस्त्यांचीही सुविधा नाही. यामुळे पावसाळ्यात रहिवाशांचे खूप हाल होत असतात. तर इतक्या वर्षात रस्ते ना गटारींचीही समस्या सोडविण्यात न आल्याने नागरीकांमधून लोकप्रतिनिधींच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

इन्फो :

गेल्या दहा वर्षांपासून नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत लोकप्रतिनिधी यांच्याकडून फक्त आश्वासन दिले जाते.माञ, अद्याप पाण्याची समस्या न सोडविल्यामुळे आम्हाला हुडको व दाळफड मधून पाणी आणावे लागते. तरी मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

अब्दुल अजीज, रहिवासी

मनपा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सुविधा न केल्यामुळे आम्हाला हुडको मधून सायकलीने पाणी आणावे लागत आहे. तसेच या ठिकाणी रस्त्यांचीही मोठी समस्या आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे रहिवाशांचे खूप त्रास सहन करावा लागत असल्याने, प्रशासनाने या समस्याकडे लक्ष दिले पाहिजे.

दानियल शेख, रहिवासी

इन्फो :

गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी राहत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासोबतच रस्ते, गटारींची समस्या कायम आहे. पाण्याची समस्या बिकट असून, नागरिकांना इकडून-तिकडून पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलही आटत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी मनपा व लोकप्रतिनिधीं यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

इम्रान शेख, रहिवासी