शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी फिरफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:15 IST

उस्मानिया पार्क परिसर : रस्ते व गटारींचीही सुविधा नाही उस्मानिया पार्कमधील नागरिकांची व्यथा : उन्हाळ्यात बोअरवेलचा आधार लोकमत न्यूज ...

उस्मानिया पार्क परिसर : रस्ते व गटारींचीही सुविधा नाही

उस्मानिया पार्कमधील नागरिकांची व्यथा : उन्हाळ्यात बोअरवेलचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजी नगरला लागून असलेल्या उस्मानिया पार्क परिसरात गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन न टाकण्यात आल्यामुळे रहिवाशांची गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी फिरफिर होत आहे. तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच या परिसरात रस्ते व गटारींचीही समस्या कायम आहे. लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्याचीही सुविधा न करण्यात आल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या उस्मानिया पार्क परिसरात गेल्या दहा वर्षांत मोठ्या संख्येने नागरी वस्ती वाढली. मात्र, दहा वर्षांपासून असलेल्या समस्या आजही जैसे थे आहेत. या नागरिकांना सुरुवारीपासून पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. या परिसरात मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांना हुडको व दाळफड या भागातून सायकलीने किंवा दुचाकीने पाणी आणावे लागत आहे. ज्या नागरिकांकडे बोअरवेल आहेत, त्या नागरिकांना जास्त अडचणींचा सामना करावा लागत नसून, बोअर वेल नसलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

हुडको व दाळफड मध्ये नळांना पाणी आल्यावर उस्मानिया पार्क परिसरातील नागरिक, ग्रामीण भागातील नागरीकांना प्रमाणे डोक्यावर किंवा सायकली द्वारे पाणी आणावे लागत आहे. पाणी भरण्यासाठी पुरुषांसह महिलांनाही फिरफिर करावी लागत आहे.

दरम्यान, उन्हाळ्यात तर अनेक नागरिकांच्या बोअर वेलचे पाणी कमी होत असते. त्यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचेही येथील महिलांनी सांगितले.

इन्फो :

तरीही पाईप लाईन टाकण्यात आली नाही :

या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, हुडको व दाळफड या भागात पर्यंत मनपातर्फे पाईप लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, उस्मानिया पार्क परिसरात पाईप लाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरीकांना हुडको व दाळफड भागात पाणी घेण्यासाठी जावे लागत आहे. दरम्यान, मनपातर्फे याच भागात इतक्या वर्षात पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्याचे सांगितले. तसेच या परिसरात गटारी व रस्त्यांचीही सुविधा नाही. यामुळे पावसाळ्यात रहिवाशांचे खूप हाल होत असतात. तर इतक्या वर्षात रस्ते ना गटारींचीही समस्या सोडविण्यात न आल्याने नागरीकांमधून लोकप्रतिनिधींच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

इन्फो :

गेल्या दहा वर्षांपासून नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत लोकप्रतिनिधी यांच्याकडून फक्त आश्वासन दिले जाते.माञ, अद्याप पाण्याची समस्या न सोडविल्यामुळे आम्हाला हुडको व दाळफड मधून पाणी आणावे लागते. तरी मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

अब्दुल अजीज, रहिवासी

मनपा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सुविधा न केल्यामुळे आम्हाला हुडको मधून सायकलीने पाणी आणावे लागत आहे. तसेच या ठिकाणी रस्त्यांचीही मोठी समस्या आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे रहिवाशांचे खूप त्रास सहन करावा लागत असल्याने, प्रशासनाने या समस्याकडे लक्ष दिले पाहिजे.

दानियल शेख, रहिवासी

इन्फो :

गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी राहत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासोबतच रस्ते, गटारींची समस्या कायम आहे. पाण्याची समस्या बिकट असून, नागरिकांना इकडून-तिकडून पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलही आटत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी मनपा व लोकप्रतिनिधीं यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

इम्रान शेख, रहिवासी