शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
3
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
4
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
5
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
6
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
7
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
8
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
9
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
10
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
11
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
12
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
13
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
14
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
15
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
16
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
17
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
18
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
19
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
20
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी फिरफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:15 IST

उस्मानिया पार्क परिसर : रस्ते व गटारींचीही सुविधा नाही उस्मानिया पार्कमधील नागरिकांची व्यथा : उन्हाळ्यात बोअरवेलचा आधार लोकमत न्यूज ...

उस्मानिया पार्क परिसर : रस्ते व गटारींचीही सुविधा नाही

उस्मानिया पार्कमधील नागरिकांची व्यथा : उन्हाळ्यात बोअरवेलचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजी नगरला लागून असलेल्या उस्मानिया पार्क परिसरात गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन न टाकण्यात आल्यामुळे रहिवाशांची गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी फिरफिर होत आहे. तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच या परिसरात रस्ते व गटारींचीही समस्या कायम आहे. लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्याचीही सुविधा न करण्यात आल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या उस्मानिया पार्क परिसरात गेल्या दहा वर्षांत मोठ्या संख्येने नागरी वस्ती वाढली. मात्र, दहा वर्षांपासून असलेल्या समस्या आजही जैसे थे आहेत. या नागरिकांना सुरुवारीपासून पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. या परिसरात मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांना हुडको व दाळफड या भागातून सायकलीने किंवा दुचाकीने पाणी आणावे लागत आहे. ज्या नागरिकांकडे बोअरवेल आहेत, त्या नागरिकांना जास्त अडचणींचा सामना करावा लागत नसून, बोअर वेल नसलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

हुडको व दाळफड मध्ये नळांना पाणी आल्यावर उस्मानिया पार्क परिसरातील नागरिक, ग्रामीण भागातील नागरीकांना प्रमाणे डोक्यावर किंवा सायकली द्वारे पाणी आणावे लागत आहे. पाणी भरण्यासाठी पुरुषांसह महिलांनाही फिरफिर करावी लागत आहे.

दरम्यान, उन्हाळ्यात तर अनेक नागरिकांच्या बोअर वेलचे पाणी कमी होत असते. त्यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचेही येथील महिलांनी सांगितले.

इन्फो :

तरीही पाईप लाईन टाकण्यात आली नाही :

या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, हुडको व दाळफड या भागात पर्यंत मनपातर्फे पाईप लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, उस्मानिया पार्क परिसरात पाईप लाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरीकांना हुडको व दाळफड भागात पाणी घेण्यासाठी जावे लागत आहे. दरम्यान, मनपातर्फे याच भागात इतक्या वर्षात पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्याचे सांगितले. तसेच या परिसरात गटारी व रस्त्यांचीही सुविधा नाही. यामुळे पावसाळ्यात रहिवाशांचे खूप हाल होत असतात. तर इतक्या वर्षात रस्ते ना गटारींचीही समस्या सोडविण्यात न आल्याने नागरीकांमधून लोकप्रतिनिधींच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

इन्फो :

गेल्या दहा वर्षांपासून नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत लोकप्रतिनिधी यांच्याकडून फक्त आश्वासन दिले जाते.माञ, अद्याप पाण्याची समस्या न सोडविल्यामुळे आम्हाला हुडको व दाळफड मधून पाणी आणावे लागते. तरी मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

अब्दुल अजीज, रहिवासी

मनपा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सुविधा न केल्यामुळे आम्हाला हुडको मधून सायकलीने पाणी आणावे लागत आहे. तसेच या ठिकाणी रस्त्यांचीही मोठी समस्या आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे रहिवाशांचे खूप त्रास सहन करावा लागत असल्याने, प्रशासनाने या समस्याकडे लक्ष दिले पाहिजे.

दानियल शेख, रहिवासी

इन्फो :

गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी राहत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासोबतच रस्ते, गटारींची समस्या कायम आहे. पाण्याची समस्या बिकट असून, नागरिकांना इकडून-तिकडून पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलही आटत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी मनपा व लोकप्रतिनिधीं यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

इम्रान शेख, रहिवासी