शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सरसकट कर्जमाफीसाठी खंडपीठात याचिका दाखल

By admin | Updated: July 9, 2017 12:34 IST

शासानने दिलेला तत्वत: आदेश रद्द करून, शेतक:यांना सरसरकट कर्जमाफी मिळावी

ऑनलाईन लोकमत

 
चोपडा, जि. जळगाव, दि.9 -  महाराष्ट्र शासनाने शेतक:यांसाठी कजर्माफी जाहीर  केली.  मात्र ती फसवी असून, या कर्जमाफीचा बहुतांश शेतक:यांना लाभ मिळणार नाही,  त्यामुळे शासानने दिलेला तत्वत: आदेश रद्द करून, शेतक:यांना सरसरकट कर्जमाफी मिळावी,  यासाठी चोपडा शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी.पाटील यांनी  औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, शासनाने  2015 नंतर 67 पैसे आतील आणेवारीच्या गावातील प्रत्येक शेतक:यांचे बागायतीचे प्रत्येकी हेक्टरी 13 हजार 500 रुपये जिरायतीसाठी सहा हजार 800 रूपये, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार अद्याप दिले नाहीत. 
 रिझव्र्ह बँकने उच्च न्यायालयाच्या  आदेशाने नैसर्गिक आपत्तीतील  शेतक:यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत व संकटग्रस्त शेतक:यांचे दंड व्याज माफ करणे तसेच सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक काढले.  त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
शासनाकडूनच टाळाटाळ 
  परंतु बँकानी व शासनाने ते आदेश पाळले नाही.  ज्या थोड्याफार शेतक:यांचे कर्जाचे पुनर्गठन केले त्यांचे देखील व्याज दर जास्त लावले. या सर्व अन्यायकारक बाबींमुळे कायदे असून देखील शेतक:यावर भिकेला लागण्याची वेळ आली. कायद्याने त्याला मदत करणे बंधनकारक असताना जाणीवपूर्वक शासनाने ते टाळले असल्याचे ते म्हणाले. 
शासनाने कर्जमाफी जाहीर करतांना तत्वत: आदेश दिले असून, तो रद्द करून, सरसकट सर्व शेतक:यांना कर्जमाफी देण्यासाठी एस.बी.पाटील यांनी खंडपीठात याचिका  (क्र. 22794/2017) दाखल केल्याचे सांगण्यात आले.