शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वैयक्तीक काळजी, वैयक्तीक लॉकडाऊन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:16 IST

कोरोनाची रुग्णसंख्या ही एका दिवसात आता एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. बुधवारी एका दिवसात ९९६ रुग्ण समोर आले आहेत. ...

कोरोनाची रुग्णसंख्या ही एका दिवसात आता एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. बुधवारी एका दिवसात ९९६ रुग्ण समोर आले आहेत. अत्यंत झपाट्याने हा संसर्ग होत आहे. मात्र, आता सर्वत्र लॉकडाऊन शक्य नाही, मात्र, गर्दी टाळण्यानेच संसर्गाचा फैलाव रोखता येईल हेही तेवढेच खरे. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तीक पातळीवर काळजी घेतल्यास स्वत:सह दुसऱ्यांनाही आपण सुरक्षित ठेवू शकतो. विशेषत: तरूणांनी याची अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत जळगाव शहरात सर्वाधिक संसर्ग वाढला आहे. येथील बाधितांचे प्रमाण एके दिवशी थेट ५२ टक्क्यांवर गेले होते. त्यामुळे या ठिकाणी काळजी घेणे अधिकच महत्त्वाचे ठरते. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात तब्बल १४७ टक्क्यांनी संसर्ग वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने होत असल्याचे विदारक चित्र आहे. अशा स्थितीत स्वत:ला सुरक्षीत ठेवण्यासाठी काय करावे तर मास्कचा नियमीत वापर, प्रत्येकाशी बोलताना दुरूनच संवाद, चेहऱ्याला हात लावण्या आधी तो स्वच्छ धुवूनच लावा, अशा साध्या सोप्या तीन गोष्टी डॉक्टर सांगतात. त्या पाळल्यास आपण स्वत:ला, कुटुंबाला आणि इतरांनाही सुरक्षीत ठेवू शकतो. वैयक्तीक लॉकडाऊन म्हणजे, अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा, बाहेर गेलाच तरी मास्क वापरा, गर्दीत जावूच नका, गेले तरी मास्क उतरवू नका, हात स्वच्छ धुवा... आरोग्य विभागाने सांगितलेले नियम पाळून जर आपण सुरक्षीत राहू शकतो, तर ते न पाळता उगाच निष्काळजीपणा करून स्वत:सह इतरांचे आरोग्य धोक्यात का टाकावे, असा विचार सर्वांनी केल्यास संसर्ग रोखता येणार आहे. अन्यथा परिस्थति अधिक गंभीर होणार आहे...