शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘महानेट’कडून आराखडा न घेताच सहा महिन्यांचा दिल्या परवानग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शासकीय कार्यालये व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांना फायबर ऑप्टिकल केबलने जोडण्यासाठी शासनाच्या मान्यतेने महानेट प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शासकीय कार्यालये व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांना फायबर ऑप्टिकल केबलने जोडण्यासाठी शासनाच्या मान्यतेने महानेट प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात बहुसंख्य भागात पोलची उभारणी केली आहे. ‘महानेट’च्या या कामाला मनपाच्या सेवानिवृत्त शहर अभियंत्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात ‘महानेट’ कडून होणाऱ्या या कामासाठी कोणताही आराखडा न घेताच तब्बल सहा महिन्यांचा परवानग्या दिल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

शहरातील शासकीय कार्यालयांसह त्यांच्या नियंत्रणातील अन्य कार्यालयांचा कारभार आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून नागरिकांना अधिकाधिक जलद सेवा देण्याचा सरकारचा मानस आहे. उच्च क्षमतेची इंटनेट जोडणी देण्याचा ‘महानेट’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या एकत्रितपणे आणि एकाचवेळी देण्यासह विविध प्रकारचे शुल्क भरण्यापासून सवलत देण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. त्याअंतर्गत शहरातील बहुसंख्य भागात रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून पोल उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते.

आराखडा सादर करण्याशिवाय परवानगी देता येणार नाही

पोल लावण्याआधी संबधित कंपनीने खोदकाम होणाऱ्या भागातील कामाचा आराखडा मनपाकडे सादर करणे गरजेचे होते. मात्र, मनपा बांधकाम विभागाने जुलै २०२० मध्ये तब्बल सहा महिने आधीच्या परवानग्या दिल्या होत्या. तसेच संबंधित कंपनीकडून कोणताही आराखडा यासाठी घेतलेला नव्हता. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या तत्कालीन शहर अभियंत्यांनी या परवानग्या देण्याची घाई का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या परवानग्या देताना तत्कालीन अभियंत्यांना मनपा आयुक्तांची परवानगीदेखील घेतली आहे. तत्कालीन शहर अभियंत्यांनी १९० ठिकाणची परवानगी दिली असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे परवानग्या दिल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत संबंधित अभियंता सेवानिवृत्त झाला आहे. यामुळे या परवानग्या देण्याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.

आठ दिवसांतही आराखडा सादर नाही

शहरात लावण्यात येत असलेल्या पोलबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा प्रशासनाने महानेटचे काम करत असलेल्या कंपनीला नोटीस बजावून आराखडा सादर करण्याचा सूचना दिल्या तसेच जोपर्यंत आराखडा सादर केला जाणार नाही तोवर काम बंद ठेवण्याचा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आठवडाभरात देखील कंपनीने मनपाकडे आराखडा सादर केलेला नाही.