शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

‘महानेट’कडून आराखडा न घेताच सहा महिन्यांचा दिल्या परवानग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शासकीय कार्यालये व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांना फायबर ऑप्टिकल केबलने जोडण्यासाठी शासनाच्या मान्यतेने महानेट प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शासकीय कार्यालये व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांना फायबर ऑप्टिकल केबलने जोडण्यासाठी शासनाच्या मान्यतेने महानेट प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात बहुसंख्य भागात पोलची उभारणी केली आहे. ‘महानेट’च्या या कामाला मनपाच्या सेवानिवृत्त शहर अभियंत्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात ‘महानेट’ कडून होणाऱ्या या कामासाठी कोणताही आराखडा न घेताच तब्बल सहा महिन्यांचा परवानग्या दिल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

शहरातील शासकीय कार्यालयांसह त्यांच्या नियंत्रणातील अन्य कार्यालयांचा कारभार आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून नागरिकांना अधिकाधिक जलद सेवा देण्याचा सरकारचा मानस आहे. उच्च क्षमतेची इंटनेट जोडणी देण्याचा ‘महानेट’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या एकत्रितपणे आणि एकाचवेळी देण्यासह विविध प्रकारचे शुल्क भरण्यापासून सवलत देण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. त्याअंतर्गत शहरातील बहुसंख्य भागात रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून पोल उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते.

आराखडा सादर करण्याशिवाय परवानगी देता येणार नाही

पोल लावण्याआधी संबधित कंपनीने खोदकाम होणाऱ्या भागातील कामाचा आराखडा मनपाकडे सादर करणे गरजेचे होते. मात्र, मनपा बांधकाम विभागाने जुलै २०२० मध्ये तब्बल सहा महिने आधीच्या परवानग्या दिल्या होत्या. तसेच संबंधित कंपनीकडून कोणताही आराखडा यासाठी घेतलेला नव्हता. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या तत्कालीन शहर अभियंत्यांनी या परवानग्या देण्याची घाई का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या परवानग्या देताना तत्कालीन अभियंत्यांना मनपा आयुक्तांची परवानगीदेखील घेतली आहे. तत्कालीन शहर अभियंत्यांनी १९० ठिकाणची परवानगी दिली असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे परवानग्या दिल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत संबंधित अभियंता सेवानिवृत्त झाला आहे. यामुळे या परवानग्या देण्याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.

आठ दिवसांतही आराखडा सादर नाही

शहरात लावण्यात येत असलेल्या पोलबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा प्रशासनाने महानेटचे काम करत असलेल्या कंपनीला नोटीस बजावून आराखडा सादर करण्याचा सूचना दिल्या तसेच जोपर्यंत आराखडा सादर केला जाणार नाही तोवर काम बंद ठेवण्याचा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आठवडाभरात देखील कंपनीने मनपाकडे आराखडा सादर केलेला नाही.