शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

खान्देशात १३०० थकबाकीदारांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

जळगाव : महावितरणतर्फे दिलेल्या मुदतीत वीज बिलाचा भरणा न केल्याने खान्देशातील तब्बल १३०० ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. ...

जळगाव : महावितरणतर्फे दिलेल्या मुदतीत वीज बिलाचा भरणा न केल्याने खान्देशातील तब्बल १३०० ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. तर १ हजार ४६० ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

कोरोनामुळे महावितरणतर्फे शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी जाऊन रीडिंग न घेता, ग्राहकांना जूनपर्यंत सरासरी बिले देण्यात आली. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेली सरासरी बिले ही अवाजवी असल्याचे सांगत, हजारो ग्राहकांनी बिलांबाबत महावितरणकडे तक्रारी केल्या. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे ठिकठिकाणी तक्रार निवारण शिबिरे घेऊन, अनेकांच्या तक्रारींचे निवारही करण्यात आले. मात्र, तरीदेखील नागरिकांनी बिलाचा भरणा करण्याकडे पाठ फिरविली आहे. जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून महावितरणची तब्बल १३०० कोटींच्या वर थकबाकी झाली आहे. यामध्ये सर्वांधिक ६६० कोटींची थकबाकी एकट्या जळगाव जिल्ह्यात असून, त्या खालोखाल धुळे जिल्ह्यात ३७८ कोटींची थकबाकी तर नंदुरबार जिल्ह्यात ३०१ कोटींची थकबाकी आहे.

त्यानंतर महावितरणतर्फे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडील पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या थकबाकीबाबत आतापर्यंत ४ लाख ११ हजार थकबाकीदारांना नोटिशी बजावल्या आहेत.

मुदत संपूनही थकबाकी न भरल्याने कारवाई

ग्राहकांना महावितरणतर्फे हप्त्याने वीजबिल भरण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र तरीदेखील ज्या ग्राहकांनी दिलेल्या मुदतीत वीजबिल भरले नाही, अशा ग्राहकांवर महावितरणतर्फे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

`त्या` ग्राहकांना वीज जोडणीसाठी नव्याने अर्ज करावा लागणार

महावितरण प्रशासनाने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पथदिवे व सार्वजनिक पुरवठ्याची थकबाकी असलेल्या जळगाव परिमंडळातील सुमारे १३०० ग्राहकांचे वीजमीटर काढून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. यामध्ये लॉकडाऊन काळातील वीजबिलासह गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर थकबाकी थकविलेल्या ग्राहकांचा समावेश आहे. वीजमीटर काढलेल्या ग्राहकांना थकबाकी भरली तरी, तत्काळ वीजपुरवठा सुरळीत न करता नवीन विजेची जोडणी करण्यासाठी नव्याने महावितरणकडे अर्ज करावा लागणार आहे.