शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

‘सीसीआय’मध्ये वाढू लागला व्यापाऱ्यांचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:21 IST

वार्तापत्र यंदा बळीराजावर अस्मानी व सुलतानी संकटासह कोरोनाच्या संकटाचीदेखील भर पडली आहे. रब्बीचे पीक विक्रीवर आले असतानाच कोरोनाचे संकट ...

वार्तापत्र

यंदा बळीराजावर अस्मानी व सुलतानी संकटासह कोरोनाच्या संकटाचीदेखील भर पडली आहे. रब्बीचे पीक विक्रीवर आले असतानाच कोरोनाचे संकट उभे राहिले अन‌् शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रब्बीचे धान्य विक्री करावे कोठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. पिकांची गुणवत्ता चांगली असतानाही खरेदीदार न मिळाल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात गहू, हरभऱ्याची विक्री करावी लागली. रब्बीत भाव मिळाला नाही म्हणून खरिपमध्ये भर काढण्याचा उद्देशाने उतरलेल्या शेतकऱ्यांना यंदाही गेल्या वर्षाप्रमाणेच अतिवृष्टीचा सामना करावा लागला. त्यात उडीद, मूग व सोयाबीनचा पूर्णपणे सत्यानाश झाला. त्यातच कापसाचा हंगाम चांगला झाला असतानाही सीसीआयच्या तुघलकी निर्णयामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. चांगला माल विक्रीसाठी आणल्यानंतर पहिल्या टप्प्यात सीसीआयने आर्द्रतेचे कारण पुढे करत मालावर कटती लावली. त्यानंतर मालात आर्द्रता कमी झाल्यानंतर ग्रेडमध्ये घट आणली. तेवढे सहन करूनही आपला शेतकरी केंद्रावर आणत असल्यानंतरही आता बैलगाड्यांना नकार देण्याचा निर्णय सीसीआयने घेतला. यामुळे सीसीआयच्या खरेदीवरदेखील आता शंका उपस्थित केली जात आहे. खासगी जिनर्सला सोबत घेऊन व व्यापाऱ्यांशी मिलीभगत करून सीसीआयनेदेखील व्यापाऱ्यांप्रमाणे धंदा सुरू केल्याचे पहाया मिळत आहे. सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांना नकार तर व्यापाऱ्यांना पायघड्या घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून वाढत जात असून, शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांकडेच विक्री करण्यासाठी भाग पाडण्याचे हे षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे. शासकीय खरेदी केंद्रामध्ये वाढत जाणारा व्यापाऱ्यांचा हस्तक्षेप यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. अन्यथा पांढरे सोने पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा संतापाचा सामना शासनाला भविष्यात करावा लागू शकतो.