शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लोक सांगतात, नाथाभाऊचं काही अडकलं असेल म्हणून पक्ष सोडत नाही, माझा जीव पार्टीसोबत आहे- एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 15:28 IST

मुखमंत्री फडणवीस दमानिया यांना वेळ देत होते. भेटत होते. पण मला भेटण्यासाठी वेळ देत नव्हते. याचे पुरावे आहेत.

ठळक मुद्दे‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे आॅनलाईन प्रकाशनआमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता, सरकारमध्ये कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट द्यायचा, मी निर्दोष असताना क्लिन चिट दिली नाहीदेवेंद्र फडणविस दमानिया यांना वेळ देत होते, पण मला नाहीनाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाहीपक्षाच्या नेत्याकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार

मतीन शेखमुक्ताईनगर : मुखमंत्री फडणवीस दमानिया यांना वेळ देत होते. भेटत होते. पण मला भेटण्यासाठी वेळ देत नव्हते. याचे पुरावे आहेत. आज उघडपणे सांगतो. मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला. नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही. स्वस्थ बसणारा नाही. पक्षाच्या नेत्याकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार, असे वक्तव्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुरुवारी ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी खडसे फार्म हाऊसवर केले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या पुस्तकाचे आॅनलाईन प्रकाशन केलेअनेक लोक सांगतात, नाथाभाऊवर पक्ष अन्याय करतोय, त्यांचं काहीतरी अडकलं असेल म्हणून पक्ष सोडत नाही, पण स्पष्ट करतो माझं काही अडकलेलं नाही, माझा जीव पार्टी सोबत लागला आहे म्हणून सहन करतोय. पर्याय भरपूर आहेत, असे सांगून त्यांनी बंडाचा इशारा दिला. आमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता. सरकारमध्ये कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट द्यायचा. मात्र मी निर्दोष असताना क्लिन चिट दिली नाही. नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे हे आमचे नेते शुभेच्छा देताना म्हणतात, नाथाभाऊचे कार्य, योगदान मोठे आहे, नाथाभाऊ चांगला होता तर पक्षाने तिकीट का दिले नाही, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा आवाज का बंद केला, वाण्याब्राह्मणाचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या पक्षाला जुन्या सहकाऱ्यांसोबत बहुजनांचा चेहरा दिला, मग नाथाभाऊवर अन्याय का? २०१४ मध्ये राज्यात एकट्याच्या बळावर सरकार आले. विरोधी पक्ष नेता मुखमंत्री होतो, असा संकेत आहे. मी मुख्यमंत्री झालो नाही, गोपीनाथ मुंडे हयात असते तर राज्याचे चित्र वेगळे असते, असे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांना मुख्यमंत्री मिळाले खान्देशाला कधीच संधी मिळाली नाही? उत्तर महाराष्ट्राचे नशीबच असे आह.े भाऊसाहेब हिरे, रोहिदास दाजी, मधुकरराव चौधरी यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी आली अन् त्यांचे राजकारण संपविण्यात आले. तसेच माझ्यासोबत झाले.आज प्रकाशित झालेल्या पुस्तकात तुम्हाला पाहिजे ते नाही. ते येऊ घातलेल्या ‘नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’मध्ये आहे. पेशव्यांच्या इतिहास तुम्हाला माहीत आहे. नानासाहेब फडणविसांच्या कारस्थानामुळे आनंदीबाईला ‘धरा’चे ‘मारा’ झाले. असेच माझ्यासोबत ‘ध’चा ‘मा’केला गेला. चुकीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांमध्ये धमक असते. ती धमक माझ्यात आहे आणि तुम्ही माझी शक्ती आहात’ असे त्यांनी सांगितले.खासदार रक्षा खडसे आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जि.प. ध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानंद चेअरमन मंदा खडसे, माजी आमदार चैनसुख संचेती, गुरुमुख जगवाणी, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, महंत प्रभाकरशास्त्री महाराज, जिल्हा बँकेच्या चेअरमन अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर ,मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी, बोदवड नगराध्यक्षा साजेदा शेख, सावदा नगराध्यक्ष, पुस्तकाचे लेखक डॉ.सुनील नेवे, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.