शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लोक सांगतात, नाथाभाऊचं काही अडकलं असेल म्हणून पक्ष सोडत नाही, माझा जीव पार्टीसोबत आहे- एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 15:28 IST

मुखमंत्री फडणवीस दमानिया यांना वेळ देत होते. भेटत होते. पण मला भेटण्यासाठी वेळ देत नव्हते. याचे पुरावे आहेत.

ठळक मुद्दे‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे आॅनलाईन प्रकाशनआमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता, सरकारमध्ये कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट द्यायचा, मी निर्दोष असताना क्लिन चिट दिली नाहीदेवेंद्र फडणविस दमानिया यांना वेळ देत होते, पण मला नाहीनाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाहीपक्षाच्या नेत्याकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार

मतीन शेखमुक्ताईनगर : मुखमंत्री फडणवीस दमानिया यांना वेळ देत होते. भेटत होते. पण मला भेटण्यासाठी वेळ देत नव्हते. याचे पुरावे आहेत. आज उघडपणे सांगतो. मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला. नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही. स्वस्थ बसणारा नाही. पक्षाच्या नेत्याकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार, असे वक्तव्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुरुवारी ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी खडसे फार्म हाऊसवर केले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या पुस्तकाचे आॅनलाईन प्रकाशन केलेअनेक लोक सांगतात, नाथाभाऊवर पक्ष अन्याय करतोय, त्यांचं काहीतरी अडकलं असेल म्हणून पक्ष सोडत नाही, पण स्पष्ट करतो माझं काही अडकलेलं नाही, माझा जीव पार्टी सोबत लागला आहे म्हणून सहन करतोय. पर्याय भरपूर आहेत, असे सांगून त्यांनी बंडाचा इशारा दिला. आमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता. सरकारमध्ये कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट द्यायचा. मात्र मी निर्दोष असताना क्लिन चिट दिली नाही. नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे हे आमचे नेते शुभेच्छा देताना म्हणतात, नाथाभाऊचे कार्य, योगदान मोठे आहे, नाथाभाऊ चांगला होता तर पक्षाने तिकीट का दिले नाही, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा आवाज का बंद केला, वाण्याब्राह्मणाचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या पक्षाला जुन्या सहकाऱ्यांसोबत बहुजनांचा चेहरा दिला, मग नाथाभाऊवर अन्याय का? २०१४ मध्ये राज्यात एकट्याच्या बळावर सरकार आले. विरोधी पक्ष नेता मुखमंत्री होतो, असा संकेत आहे. मी मुख्यमंत्री झालो नाही, गोपीनाथ मुंडे हयात असते तर राज्याचे चित्र वेगळे असते, असे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांना मुख्यमंत्री मिळाले खान्देशाला कधीच संधी मिळाली नाही? उत्तर महाराष्ट्राचे नशीबच असे आह.े भाऊसाहेब हिरे, रोहिदास दाजी, मधुकरराव चौधरी यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी आली अन् त्यांचे राजकारण संपविण्यात आले. तसेच माझ्यासोबत झाले.आज प्रकाशित झालेल्या पुस्तकात तुम्हाला पाहिजे ते नाही. ते येऊ घातलेल्या ‘नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’मध्ये आहे. पेशव्यांच्या इतिहास तुम्हाला माहीत आहे. नानासाहेब फडणविसांच्या कारस्थानामुळे आनंदीबाईला ‘धरा’चे ‘मारा’ झाले. असेच माझ्यासोबत ‘ध’चा ‘मा’केला गेला. चुकीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांमध्ये धमक असते. ती धमक माझ्यात आहे आणि तुम्ही माझी शक्ती आहात’ असे त्यांनी सांगितले.खासदार रक्षा खडसे आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जि.प. ध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानंद चेअरमन मंदा खडसे, माजी आमदार चैनसुख संचेती, गुरुमुख जगवाणी, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, महंत प्रभाकरशास्त्री महाराज, जिल्हा बँकेच्या चेअरमन अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर ,मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षा नजमा तडवी, बोदवड नगराध्यक्षा साजेदा शेख, सावदा नगराध्यक्ष, पुस्तकाचे लेखक डॉ.सुनील नेवे, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.