शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मास्क न लावल्यास दंड, कारवाईसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:43 IST

जळगाव : कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गुरुवारी दंडात्मक कारवाईचे आदेश पारित केले आहेत. ...

जळगाव : कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गुरुवारी दंडात्मक कारवाईचे आदेश पारित केले आहेत. त्यासोबतच त्यावर कारवाई आणि समन्वयासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड, दुकाने, आस्थापना, विक्रेते यांनी विनामास्क दुकानात येणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला वस्तू देऊ नये, दुकानदार आणि कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे अनिवार्य आहे. या बाबींचे उल्लंघन केल्यास संबंधितांना ५०० रुपये दंड किंवा दुकान मालक सील करण्याची कार्यवाही करावी, एकाच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता अनावश्यकरित्या पाचपेक्षा गर्दी करून नागरिक जमा झाल्यास प्रति व्यक्ती २०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना पाचशे रुपये दंडाची तरतूद आहे.

त्याच्या समन्वयासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यात ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी कमलाकर रणदिवे, महापालिका क्षेत्रासाठी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, नगर परिषद, नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश दिघे, पोलीस उपअधीक्षक डी.एम. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, मोटार वाहन निरीक्षक महेश देशमुख, अन्न आणि प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त योगेश बेंडकुळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.