शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

नवीन नळ संयोजनासाठीची रक्कम सात दिवसांत भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

मनपा प्रशासनाचा आदेश लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘अमृत’अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, याअंतर्गत नागरिकांना नवीन ...

मनपा प्रशासनाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ‘अमृत’अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, याअंतर्गत नागरिकांना नवीन नळ संयोजन देण्याचे कामदेखील मनपा पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. ज्या नागरिकांची नवीन नळ संयोजनाची जोडणी अद्याप झाली नाही, अशा नागरिकांनी सात दिवसांच्या आत रक्कम भरून ती जोडणी करून घेण्याचे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. सात दिवसांच्या आत ही रक्कम न भरल्यास नागरिकांना खर्चाच्या दुप्पट रक्कम मनपात भरावी लागेल, असा इशारादेखील मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. महापालिकेने नवीन नळ संयोजनचे कामदेखील हाती घेतले असून, आतापर्यंत वीस हजारांहून अधिक नागरिकांना नवीन नळ कनेक्शन दिले आहे. शहरातील अनेक टाक्यांचे कामदेखील पूर्ण झाले असून, नळ कनेक्शन देऊन अमृत अंतर्गत योजनेची चाचणी देखील महापालिकेकडून आता करण्यात येत आहेत. अद्यापही अनेक नागरिकांनी नवीन कनेक्शनसाठी रक्कम भरलेली नाही. अशा नागरिकांनी सात दिवसांच्या आत रक्कम भरण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अनेक भागांत नवीन वितरण व्यवस्था टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. अशाच वेळी कनेक्शन देण्याचे कामदेखील मनपा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मात्र, त्यानंतर चारी बुजल्यानंतर खोदकाम करण्यास संबंधित नागरिकांना कनेक्शनसाठी दुप्पट रक्कम मनपा प्रशासनाला द्यावी लागेल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

वॉटर मीटरबाबत अद्यापही नियोजन नाही

अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, यासाठी वॉटर मीटरची आवश्यकता लागणार आहे. मात्र, मनपाच्या नीविदा प्रक्रियेत वॉटर मीटरची तरतूद महापालिकेने केलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा द्यायचा असेल तर वॉटर मीटर आवश्यक आहे. याबाबत अद्यापही मनपा प्रशासनाने कोणतेही नियोजन केले नसून, पुढील महासभेत वॉटर मीटरवरून वाद होण्याची शक्यता आहे.