शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नवीन नळ संयोजनासाठीची रक्कम सात दिवसांत भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

मनपा प्रशासनाचा आदेश लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘अमृत’अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, याअंतर्गत नागरिकांना नवीन ...

मनपा प्रशासनाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ‘अमृत’अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, याअंतर्गत नागरिकांना नवीन नळ संयोजन देण्याचे कामदेखील मनपा पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. ज्या नागरिकांची नवीन नळ संयोजनाची जोडणी अद्याप झाली नाही, अशा नागरिकांनी सात दिवसांच्या आत रक्कम भरून ती जोडणी करून घेण्याचे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. सात दिवसांच्या आत ही रक्कम न भरल्यास नागरिकांना खर्चाच्या दुप्पट रक्कम मनपात भरावी लागेल, असा इशारादेखील मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. महापालिकेने नवीन नळ संयोजनचे कामदेखील हाती घेतले असून, आतापर्यंत वीस हजारांहून अधिक नागरिकांना नवीन नळ कनेक्शन दिले आहे. शहरातील अनेक टाक्यांचे कामदेखील पूर्ण झाले असून, नळ कनेक्शन देऊन अमृत अंतर्गत योजनेची चाचणी देखील महापालिकेकडून आता करण्यात येत आहेत. अद्यापही अनेक नागरिकांनी नवीन कनेक्शनसाठी रक्कम भरलेली नाही. अशा नागरिकांनी सात दिवसांच्या आत रक्कम भरण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अनेक भागांत नवीन वितरण व्यवस्था टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. अशाच वेळी कनेक्शन देण्याचे कामदेखील मनपा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मात्र, त्यानंतर चारी बुजल्यानंतर खोदकाम करण्यास संबंधित नागरिकांना कनेक्शनसाठी दुप्पट रक्कम मनपा प्रशासनाला द्यावी लागेल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

वॉटर मीटरबाबत अद्यापही नियोजन नाही

अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, यासाठी वॉटर मीटरची आवश्यकता लागणार आहे. मात्र, मनपाच्या नीविदा प्रक्रियेत वॉटर मीटरची तरतूद महापालिकेने केलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा द्यायचा असेल तर वॉटर मीटर आवश्यक आहे. याबाबत अद्यापही मनपा प्रशासनाने कोणतेही नियोजन केले नसून, पुढील महासभेत वॉटर मीटरवरून वाद होण्याची शक्यता आहे.