शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भूसंपादनाचे देणी चुकती करण्यासाठी साडेसोळा कोटी शासनाकडून अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:18 IST

२५ वर्षापासूनचा प्रश्न अखेर लागला मार्गी

ठळक मुद्देजिल्हा परिषद

जळगाव : भूसंपादनाचे शेतकऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी शासनाने नुकतेच १६ कोटी ५१ लाख रुपये जिल्हा परिषद प्रशासनाला अदा केले आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला असून ही देणी देण्यासाठी जिल्हा परिषदेवर जप्ती तसेच परस्पर पैसे कपतीची नामुष्की आली होती.यांसंदर्भात शिवसेनेचे जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी आवाज उठविल्यावर सत्ताधारी गटाचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी लक्ष घालून पाठपुरावा केला. यामुळे भविष्यात जि. प.च्या खात्यातून रकमेची कपात होणे आता टळले असून जिल्हा परिषदेसमोरील मोठा प्रश्न सुटला आहे.भूसंपादनापोटी जिल्ह्यातील सुमारे ७० शेतकºयांचे १७ कोटी रुपये जि.प. च्या सिंचन विभागाकडे घेणे असताना ते मिळण्यास विलंब होत असल्यामुळे हे शेतकरी न्यायालयात गेल्यावर गेल्या काही महिन्यात ४ टप्प्यात सुमारे ५ लाख रुपये शेतकºयांना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या खात्यातून जिल्हा बँकेमार्फत न्यायालयाच्या आदेशानुसार ४ वेळा वळविण्यात होते.दरम्यान ही देणी देण्याची जबाबदारी शासनाची असताना जिल्हा परिषदेचा निधी परस्पर देणी देण्यासाठी वळविला जात असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत होते.याबाबीकडे अधिकारी व पदाधिकारी हे लक्ष देत नव्हते यामुळे नानाभाऊ महाजन यांनी स्थायी समितीच्या सभेत हा विषय उपस्थित केला होता.यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा १ कोटी ५२ लाख रुपये जि. प. खात्यातून वळविण्याची जिल्हा बँकेला नोटीस आली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या दालनात जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख तसेच बँक आणि जि.प. चे वकील तसेच अधिकारी यांची बैठक झाली होती.या बैठकीत न्यायालयात म्हणणे मांडणार असल्याचे जि.प. तर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा न्यायालयात म्हणणे मांडले असता दोन दिवसांपर्यंत पर्यंत पैसे वळविण्यास स्थगिती देण्यात आली होती. शासनाकडून हे पैसे मिळणे अपेक्षित असताना जि.प. कडून ते वसूल केले जात आहेत. दरम्यान सिंचन विभागा व्यतिरीक्त इतर विभागाचेही पैसे खात्यात असल्याने ते देखील वळविले जात आहेत, हे पैसे शासनाकडून लवकरच मिळवून दिले जातील व यासाठी प्रयत्नही सुरु आहेत. ही भूमिका न्यायालयात मांडली गेली. उच्च न्यायलयातही ही भूमिका मांडल्यावर एक महिन्याची स्थगिती दिली. त्यानुसार सत्ताधारी पदाकिाºयांनी पाठपुरावा केला व अखेर विरोधी सदस्य नानाभाऊ महाजन आणि सत्ताधारी यांना यश आले व शासनाने शेतकºयांची देणी देण्यासाठीचा निधी जि. प. ला दिला आहे. यामुळे सुमारे २५ वर्षापासूनचा हा प्रश्न सुटला आहे.