शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

थकबाकी भरा, अन्यथा वीज पुरवठा खंडीत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:14 IST

जळगाव : कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी खान्देशात ६०० कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. ग्राहकांनी ...

जळगाव : कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी खान्देशात ६०० कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. ग्राहकांनी थकबाकी भरण्याबाबत महावितरणने आक्रमक भूमिका घेतली असून, लाखो थकबाकीदार ग्राहकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. दिलेल्या मुदतीत बिलाचा भरणा न केल्यास, अशा थकबाकीदारांचा थेट विज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महावितरणतर्फे शासनाच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी बिले देण्यात आली. मात्र, देण्यात आलेली सरासरी बिले ही जादा असल्याच्या अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या. ग्राहकांच्या या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणने जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरे घेतली. यामध्ये अनेक ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येऊन, विजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्राहकांना हफ्त्यानेही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील खान्देशातील घरगुती, औद्योगिक, कृषी, लघु आदी ग्राहकांनी मार्च २०२० पासून विजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीदारांची संख्या वाढत असून, वसुलीसाठी महावितरणपुढे मोेठे आवाहन निर्माण झाले आहे.

इन्फो :

कोरोनामुळे कारवाई लांबली

शासनाने लॉकडाऊन कालावधीत घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी विजबिले देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महावितरणतर्फे सरासरी बिले देण्यात आली. तसेच शासनातर्फे कोरोना काळात थकबाकीदार ग्राहकांकडुन कुठलीही वसुली अथवा कारवाई न करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे महावितरणतर्फे कोरोनामुळे थकबाकी दारांविरोधात कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, शासनाने नुकतेच हे निर्बध उठविल्यामुळे, महावितरणतर्फे थकबाकीदारांना नोटीसा पाठवून, कारवाईचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

इन्फो :

प्रत्येक वायरमनला कारवाईचा अधिकार

महावितरणचे जळगाव परिमंडळात घरगुती, औद्योगिक, कृषी, वाणिज्य, लघू असे एकूण लहान-मोठे २० लाखांच्या घरात ग्राहक आहेत. यातील निम्म्याहून अधिक ग्राहकांकडे थकबाकी आहे. थकबाकीदारांची संख्या मोठी असल्यामुळे महावितरणतर्फे शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक वायरमनला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. संबंधित वायरमन वसुलीसाठी गेल्यावर, ज्या ग्राहकांनी नोटीसीची मुदत संपल्यानंतही बिल भरले नसेल, अशा ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करण्याचा अधिकार वायरमन यांना देण्यात आला असल्याचे महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी `लोकमत`ला सांगितले.