शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मविप्रमध्ये पाटीलकी कायम, भोईटे गटाला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळावर स्व.नरेंद्र पाटील यांच्या गटाचीच सत्ता कायम असल्याचा निकाल जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळावर स्व.नरेंद्र पाटील यांच्या गटाचीच सत्ता कायम असल्याचा निकाल जिल्हा न्यायालयाने दिला आहे. यात नरेंद्र पाटील यांचे लहान बंधु ॲड. विजय भास्कर पाटील यांनी ही कायदेशीर लढाई दिली. मविप्रत २०१५ मध्ये नरेंद्र पाटील यांच्या गटाने विजय मिळविला.त्यानंतर भोईटे गटाने समांतर कार्यकारी मंडळ सुरू केले. त्याला तहसिलदारांनी मान्यता दिली. मात्र तहसिलदारांचा हा निर्णय न्यायालयाने आज रद्दबातल ठरवल्याने भोईटे गटाला मोठा धक्का बसला आहे.

२०१८ मध्ये संस्थेच्या ताब्यावरून वाद उद्भवल्यानंतर पोलिसांच्या प्रस्तावानुसार तत्कालिन तहसिलदार अमोल निकम यांनी संस्थेवर नरेंद्र पाटील गटाचा ताबा असल्याचे आदेश दिले. मात्र काही दिवसांनी संस्थेवर भोईटे गटाचा ताबा असल्याबाबत नव्याने आदेश दिला.

तहसिलदारांच्या या आदेशाला नरेंद्र पाटील गटाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबत न्यायाधिशांनी २३ पानांचा विस्तृत निकाल दिला आहे. त्यामुळे तत्कालीन तहसिलदारांनी ही संस्था नरेंद्र पाटील गटाच्या ताब्यात देण्याचा पहिला निर्णय मान्य झाला आहे. त्यामुळे आता संस्थेवर पाटील गटाचाच ताबा असणार हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात नरेंद्र पाटील गटाकडून ॲड. सैयद जाकीर अहमद, ॲड. प्रकाश पाटील यांनी काम पाहिले.

तहसिलदारांनी दिले होते दोन निकाल

वाद उद्भवल्यानंतर तत्कालिन तहसीलदार अमोल निकम यांनी पहिला निकाल हा नरेंद्र पाटील गटाच्या बाजुने दिला होता. मात्र नंतर त्यांनी तो निकाल बदलून दुसऱ्या आदेशात भोईटे गटाची सत्ता असल्याचे म्हटले होते. मात्र हा दुसरा निकाल न्यायालयाने रद्दबातल केला आहे. पहिल्या आदेशाला देखील बराच काळ उलटून गेला असून अजून त्यावर कुणीही हरकत घेतली नाही.

अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या फडणवीस- महाजन यांची चौकशी करा- ॲड.विजय पाटील

या प्रकरणात तहसिलदारांनी दिलेला पहिला निकाल मान्य झाला आहे. त्यानुसार आमच्या गटाची सत्ता मान्य झाली आहे. तरी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांना दुसरा निकाल देण्यास भाग पाडले होते. आता प्रशासनाने तत्कालिन तहसिलदारांचा जबाब घेऊन दबाव आणणाऱ्या फडणवीस आणि महाजन यांची चौकशी करावी, अशी मागणी ॲड. विजय भास्कर पाटील यांनी केली आहे.