शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

भुसावळात भारिपचे दोन्ही जिल्हाध्यक्ष स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:05 IST

विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची परवानगी मागणाºया भारिप-बहुजन महासंघाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना पोलीस विभागाने स्थानबद्ध केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केली स्थानबद्धतेची कारवाईभारिप नेत्यांनी पोलिसांवर केला हुकुमशाहीचा आरोप

भुसावळ, जि.जळगाव : विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची परवानगी मागणाºया भारिप-बहुजन महासंघाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना पोलीस विभागाने स्थानबद्ध केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ८ आॅक्टोबर रोजी जळगाव दौºयावर आले होते. जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, मागासवर्गीय व ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पूर्ववत व वेळेवर मिळावी, जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री मिळावा, शेतमालाला योग्य हमी भाव देण्यात यावा आदी मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष विजय उर्फ बाळा पवार आदींनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे लेखी पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना भेटीची व निवेदन देण्यासाठी परवानगी मागितली होती.पोलीस व महसूल विभागाने परवानगी न देता जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष विजय पवार या दोघांना घरून बोलवत स्थानबद्ध केले. यापूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अचानक भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अडविला होता. त्यामुळे पोलिस विभागा व प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली होती. पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, पोलीस कर्मचारी छोटू वैद्य, बाळू पाटील, नंदू सोनवणे व दीपक जाधव यांनी ही कारवाई केली.या वेळी पोलीस ठाण्यात एमआयएमचे तालुकाध्यक्ष फिरोज शेख, शहर सचिव मुजाहिद शेख, भारिप जिल्हा सचिव दिनेश ईखारे, विद्यासागर खरात, रुपेश साळुंखे, अरुण नरवाडे, नीलेश जाधव, तुषार जाधव, स्वप्नील इंगळे, अरुण तायडे, जयराज आव्हाड, सोनू वाघमारे आदी उपस्थित होते.जिल्ह्याच्या दौºयावर राज्याचे मुख्यमंत्री येत असल्याने शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती आदी विषय मार्गी लावण्यासाठी लोकशाही मार्गाने भारिप बहुजन महासंघ मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी महसूल विभाग व पोलिस विभागाला ६ आॅक्टोबर रोजी रीतसर परवानगीसाठी अर्ज दिला होता. मात्र मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी न देता उलट आम्हाला पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. हा विषय म्हणजे लोकशाहीत सरकार व प्रशासनाची हुकुमशाही असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ