शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशी चोरट्याने पळविली कार

By admin | Updated: March 5, 2017 00:03 IST

जळके गावाजवळ दुसरी घटना : भुसावळचे नाव सांगून मुंबईहून भाड्याने आणली कार

जळगाव : भुसावळ येथे पत्नीला घेण्यासाठी जायचे आहे, असे सांगून एका चोरट्याने मुंबई येथून कार भाड्याने घेतली व जळके गावाजवळ लघु शंकेला थांबला असता तेथे मोबाईल पडल्याचा बहाणा करीत चालकाला मोबाईल घेण्यास खाली उतरवून कार घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे साडे चार वाजता जळके गावाजवळ  घडली. दोन महिन्यांपूर्वी जळके गावाजवळ अशीच घटना घडली होती. सलग दुसºयांदा घटना घडल्याने खळबळ उडालीआहे.आरडाओरड करुनही उपयोग नाहीप्रवाशी म्हणून आलेल्या चोरट्याने कार पळविल्याचे लक्षात आल्यानंतर दास यांनी आरडाओरड केली, मात्र पहाटेच्या सुमारास रस्त्यावर कोणीच नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी जळके गावाजवळ येवून ग्रामस्थांच्या मदतीने दास यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून उपनिरीक्षक एन.बी. सूर्यवंशी व रतिलाल पवार यांच्याकडे हकीकत कथन केली. या गाडीची किंमत चार लाख रुपये असल्याचे दास यांनी सांगितले. कारसह दोन मोबाईलही त्याने लांबविले आहेत.लघु शंकेला थांबला अन् मोबाईल पडल्याचा बहाणा करीत चालकाला दिला चकवायाबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विक्रम धिरेंद्र दास (वय ४० रा.भार्इंदर, जि.पालघर) यांचा टॅक्सी टुरीस्टचा व्यवसाय आहे. १ मार्च रोजी एका व्यक्तीने फोन करुन भुसावळ येथे पत्नीला घेण्यासाठी जायचे आहे, असे सांगून कार बुक केली. त्यानुसार ३ मार्च रोजी रात्री ९ वाजता विक्रम दास हे कारसह (क्र.एम.एच.०२ सी.आर.१८८७) कल्याण-भिवंडी नाका येथे पोहचले. तेथून संबंधित व्यक्तीला घेवून ते भुसावळकडे रवाना झाले. पुढे नाशिक शहराजवळ कारमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर दास हे मालेगावजवळ एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले, मात्र चोरटा कारच्या खाली उतरला नाही. जेवण आटोपल्यानंतर धुळे, एरंडोल व म्हसावदमार्गे येत असताना जळके गावाजवळ लालू वंजारी यांच्या शेताजवळ चोरट्याने लघुशंकेसाठी कार थांबवली. लघुशंकेनंतर पुन्हा तो कारमध्ये बसला व शंभर फुटाजवळ कार नेल्यानंतर कारमध्ये बसताना बाटली व मोबाईल पडला आहे असे सांगून पुन्हा कार थांबविली व त्या वस्तू घेण्यास दास यांनाच पाठविले. दास हे तिकडे जायला निघताच चोरट्याने कार पळविली. दरम्यान, पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी मागील गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढायला सुरुवात केली आहे.आरोपी व ठिकाण एकचगेल्या दोन महिन्यापूर्वी जळके गावाजवळ अशीच घटना घडली होती. तेव्हाही चोरट्याने जामनेरला जायचे आहे असे सांगून मुंबई येथून कार भाड्याने आणली होती व त्याच जागेवरच लघुशंकेसाठी थांबवून कार घेवून पळ काढला होता. गुन्ह्णाची पध्दत पाहता या घटनेतही तोच आरोपी असल्याची शक्यता उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी यांनी वर्तविली आहे.उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सूर्यवंशी यांच्याकडून मागील गुन्हा व आताचा गुन्हा याबाबत माहिती जाणून घेत तपासाबाबत सूचना केल्या.