शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढताना पक्षपात

By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST

शहरात पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपात झाल्याचा आरोप करण्यात आला.

नवापूर : शहरात पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपात झाल्याचा आरोप करण्यात आला. शहरातील युवकांच्या गटाकडून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून हा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, १८ रोजी स्थगिती झालेली अतिक्रमण काढण्याची मोहीम १९ रोजी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.पालिकेकडून १७ रोजी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. विविध भागातील एकूण २१ अतिक्रमणे काढण्यात आली. त्यात पक्के आर.सी.सी. बांधकाम असलेल्या नऊ इमारती व इमारतींच्या भागाचा समावेश आहे.बसस्थानक परिसरात दुपारी साडेचारला अतिक्रमण काढताना काही युवक व पालिका कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. हाच धागा पकडून युवकांच्या गटाकडून मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.पोलीस निरीक्षक शेळके यांनाही निवेदन देण्यात आले. ठरावीक लोकांचे बांधकाम तोडणे व त्याच रांगेतल्या इतरांना सोडून देण्यात आल्याचा प्रकार शहरवासीयांनी पाहिल्याचे निवेदनात म्हटले आहे. बसस्थानक परिसरात काढण्यात आलेले अतिक्रमण नोटीस न देता काढण्यात आल्याचा आरोप करून गरिबांचा वाली कुणी नसल्याने प्रशासनाने ही कारवाई केली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.हीच कारवाई राजकीय व्यक्तींच्या विरोधात करण्याचे धैर्य प्रशासन दाखवेल का, ही कारवाई एकतर्फी आहे. अशी कारवाई त्वरित न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा प्रदीप नगराळे, आसिफ शेख, दशरथ नगराळे, संजय मावची, जहूर मकराणी, आरिफ फ्रूटवाला, भावेश वाघ, इकबाल पठाण, विजय कोकणी, उमेश पवार, सुनील पेंढारकर व सहकार्‍यांनी दिला आहे. (वार्ताहर)