शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अतिक्रमण काढताना पक्षपात

By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST

शहरात पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपात झाल्याचा आरोप करण्यात आला.

नवापूर : शहरात पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपात झाल्याचा आरोप करण्यात आला. शहरातील युवकांच्या गटाकडून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून हा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, १८ रोजी स्थगिती झालेली अतिक्रमण काढण्याची मोहीम १९ रोजी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.पालिकेकडून १७ रोजी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. विविध भागातील एकूण २१ अतिक्रमणे काढण्यात आली. त्यात पक्के आर.सी.सी. बांधकाम असलेल्या नऊ इमारती व इमारतींच्या भागाचा समावेश आहे.बसस्थानक परिसरात दुपारी साडेचारला अतिक्रमण काढताना काही युवक व पालिका कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. हाच धागा पकडून युवकांच्या गटाकडून मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.पोलीस निरीक्षक शेळके यांनाही निवेदन देण्यात आले. ठरावीक लोकांचे बांधकाम तोडणे व त्याच रांगेतल्या इतरांना सोडून देण्यात आल्याचा प्रकार शहरवासीयांनी पाहिल्याचे निवेदनात म्हटले आहे. बसस्थानक परिसरात काढण्यात आलेले अतिक्रमण नोटीस न देता काढण्यात आल्याचा आरोप करून गरिबांचा वाली कुणी नसल्याने प्रशासनाने ही कारवाई केली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.हीच कारवाई राजकीय व्यक्तींच्या विरोधात करण्याचे धैर्य प्रशासन दाखवेल का, ही कारवाई एकतर्फी आहे. अशी कारवाई त्वरित न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा प्रदीप नगराळे, आसिफ शेख, दशरथ नगराळे, संजय मावची, जहूर मकराणी, आरिफ फ्रूटवाला, भावेश वाघ, इकबाल पठाण, विजय कोकणी, उमेश पवार, सुनील पेंढारकर व सहकार्‍यांनी दिला आहे. (वार्ताहर)