शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

चोपड्यात उर्दू शाळेला पालकांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:29 IST

शिक्षणाचा बट्टयाबोळ झाल्याने पालकांचा संताप : सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक नाही

चोपडा : शहरातील दर्गा अली भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या उर्दु कन्या शाळा क्रमांक १ मध्ये शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून प्रभारी मुख्याध्यापिका शाळेत येत नसल्याने शाळा वाऱ्यावर आहे. तसेच इयत्ता पहिली ते सातवी अशा सात वर्गांना केवळ तीनच शिक्षक सध्या असल्याने मुलींना शिकवायला कोणीही जात नाही. आदी कारणांनी संतप्त पालकांनी शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या शाळेला कुलूप ठोकले.याबाबत वृत्त असे की, दर्गा अली परिसरात उर्दु कन्या शाळा क्रमांक १ मध्ये एकूण विद्यार्थिनींची संख्या २०५ एवढी आहे. पहिली मध्ये १९ विद्याथीर्नी, दुसरी मध्ये २० , तिसरी मध्ये ३०, चौथीमध्ये ३७, पाचवीमध्ये ३२, सहावीमध्ये ३३ तर सातवीमध्ये ३४ विद्यार्थीनी आहेत. मात्र जुलै महिन्यापासून प्रभारी मुख्याध्यापिका लतिफा पठाण या शाळेतच येत नसल्याने शाळा जणू वाºयावरच झाली आहे. गेल्यावर्षी जून पासून त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा भार आहे. वास्तविक ही अतिशय जुनी शाळा आहे.५२ वषार्पासून ही शाळा सुरू आहे. सध्या शिक्षण विभागाकडे प्रभारी मुख्याध्यापिका पठाण यांनी १४ नोव्हेंबर रोजी जीवितास धोका असल्याचा अर्ज दिला आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी यांनी २३ नोव्हेंबर रोजी त्यांची बदली केल्याचे आदेश पारित केले आहे. शहरातील उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये त्यांची बदली झालेली आहे. मात्र यापूर्वी २४ जुलैपासून तर २३ नोव्हेंबरपर्यंत या कुठे होत्या, हजेरी पत्रावर त्यांची स्वाक्षरी त्या काळात दिसत नाही. तरीही त्यांचा पगार मात्र निघत होता. अखेर विद्यार्थिनींचे नुकसान होत असल्याचे पाहून संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे.विद्यार्थिनींना अजूनहीगणवेश नाहीसंतप्त पालकांनी दिलेली माहिती अशी की, शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारा गणवेश सुद्धा यंदा अद्याप मिळालेला नाही. या शाळेत शिक्षकांमध्ये प्रभार घेण्याच्या वादावरूनच शाळेचे वाटोळे झाल्याचे दिसत आहे. शासनाचा सेवाज्येष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापक पदाचा पदभार द्यावा असा आदेश असून संबंधित सेवाज्येष्ठ शिक्षकानी पदभार घेतला नसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचाही आदेश आहे. मात्र शिक्षण विभागाकडून प्रभारी मुख्याध्यापिका यांना पाठीशी घातले जात असल्याचे आरोप पालकांनीही प्रतिनिधीशी बोलताना केला.याबाबतीत येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्या कामानिमित्त बैठकीसाठी बाहेर होत्या. त्यामुळे अधिक माहिती समजू शकली नाही.कुलूप ठोकणाºया पालकांमध्ये शबाना बी मुस्तफा खान, साबेरा आपा, गुलशन बी, जायदा बी शेख एजाज, नीलोफर जहा, शगुफ्ता बी सय्यद जफर, फरसाना बी शेख साजिद, नाजिया बी शेख जावेद, रीहाना बी, हिना बी, शकील अहमद गुलाम रसूल शेख, सय्यद जाफर सय्यद हनीफ, अकील अहमद गुलाम गैस, जावेद अहमद गुलाम गैस, शबाना मुस्ताक अली खान, जमील शेख गफूर, अखिल शेख जाबिद यांचा समावेश होता.... आणि संतप्त पालक धडकले पंचायत समितीमध्येसंतप्त पालकांनी शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पंचायत समितीवर मोर्चा नेला होता. त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयात नसल्याने संतप्त पालकांनी आपला मोर्चा शिक्षण विस्तार अधिकारी एस. जी. गजरे यांच्याकडे वळविला व त्यांना गाºहाणे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे ही शाळा येत नसल्याने याबाबतीत मी काहीही बोलू शकत नाही असे त्यांनी सांगितले. यापूर्वी संबंधित शाळेतील शिक्षकांची या व इतर कारणावरून चौकशी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.तीन शिक्षक आणि सात वर्गया शाळेमध्ये विद्यार्थिनीच्या संख्येनुसार ग्रेडेड मुख्याध्यापकाचे पद असताना ते रिक्त आहे. त्याचा पदभार इतर जेष्ठ शिक्षकांकडे सोपविला जात आहे. एक ग्रेडेड मुख्याध्यापक, दोन पदवीधर शिक्षक आणि पाच शिक्षक अशी संख्या या शाळेत असणे गरजेचे असताना सध्या केवळ तीनच शिक्षक या शाळेत सात वर्गातील विद्यार्थिनींना शिकवीत आहेत. तीन शिक्षक सात वर्ग कसे चालवतील? हा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे.