शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पितरांच्या पिंडाना महागाईचा काकस्पर्श...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:32 IST

पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध केले जाते. यात पिंडाला (घास) काकस्पर्श होणे महत्त्वाचे मानले जाते. परंतु शहरी भागात कावळ्यांच्या संख्येत घट होत असल्याने आता काकस्पर्श दुर्लभ झाला आहे.

ठळक मुद्देआजच्या व्यस्त युगात कुणाच्या घरी जेवायला जायलाही वेळ मिळेनासा झाला आहे.श्राद्धासाठी लागणारा मेनू सांभाळताना गृहिणीची तारेवरची कसरत

अजय कोतकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध केले जाते. यात पिंडाला (घास) काकस्पर्श होणे महत्त्वाचे मानले जाते. परंतु शहरी भागात कावळ्यांच्या संख्येत घट होत असल्याने आता काकस्पर्श दुर्लभ झाला आहे. धर्मशास्त्रात जन्म ते मृत्यू या दरम्यानच्या काळात विविध धार्मिक कार्यांना महत्व आहे.एकेकाळी पितृपक्ष पंधरवडा म्हटला की, गावात दररोज घरोघरी पंगती उठायच्या. आजच्या धकाधकीच्या युगात केवळ घरच्या घरी पित्रे जेवू घालण्याची पद्धत वाढू लागल्याने पितृपक्षातील पंगती आता ग्रामीण असो वा शहरी भागात दुर्मिळ झाल्या आहेत.भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून साजरा केला जातो. या पंधरवड्यात हिंदूधर्मीय आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालत असतात. आजपासून काही वर्षे अगोदरपर्यंत पितृपक्ष म्हटला की ग्रामीण भागात घरोघरी पंगती उठविल्या जायच्या. घरातील गृहिणी दिवसभर स्वयंपाकात व्यस्त असायच्या. रात्री उशिरापर्यंत गल्लोगल्ली पंगतींची एकच लगबग चालायची. वरण,भात, कढी वडे, अळूच्या पानांच्या वड्या, खीर व तीन चार प्रकारच्या भाज्या अशा प्रकारचा पितरांचा खास मेनू असायचा आणि आजही आहे.आजच्या व्यस्त युगात कुणाच्या घरी जेवायला जायलाही वेळ मिळेनासा झाला आहे. शिवाय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एवढा स्वयंपाक करायचा कोणी हाही प्रश्न निर्माण झाल्याने आता घरच्या- घरी पितर ही पद्धत रुढ झाली आहे. पितृपक्षाला प्रारंभ होऊन एक आठवडा होत आला तरी पूर्वी असलेला जेवणावळीचा गलबला कुठेच ऐकू येत नाही. आज पितृपक्ष म्हणजे केवळ श्राद्ध घालण्याची औपचारिकता बनून राहिली आहे .रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ बाजूला काढून अनेकजण ही प्रथा पाळताना दिसतात, पण गच्चीवर, कौलावर, पत्रावर ठेवण्यात येणाऱ्या पदार्थांना यंदा महागाईचा स्पर्श झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा खाली होताना दिसत आहे.महागाईच्या काळात श्राद्धासाठी लागणारा मेनू सांभाळताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहेपितरांना जेवू घालताना साधारणत: दोन ते तीन हजारावर येणारा खर्च आज दुपटीने वाढला आहे. त्यामुळे श्राद्धाचे बजेट कसे सांभाळावे असा प्रश्न पडला आहे. महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले असले तरी पारंपरिक पद्धतीने आपापल्या परीने श्राद्ध घालण्यात येत आहे