शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

पितरांच्या पिंडाना महागाईचा काकस्पर्श...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:32 IST

पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध केले जाते. यात पिंडाला (घास) काकस्पर्श होणे महत्त्वाचे मानले जाते. परंतु शहरी भागात कावळ्यांच्या संख्येत घट होत असल्याने आता काकस्पर्श दुर्लभ झाला आहे.

ठळक मुद्देआजच्या व्यस्त युगात कुणाच्या घरी जेवायला जायलाही वेळ मिळेनासा झाला आहे.श्राद्धासाठी लागणारा मेनू सांभाळताना गृहिणीची तारेवरची कसरत

अजय कोतकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध केले जाते. यात पिंडाला (घास) काकस्पर्श होणे महत्त्वाचे मानले जाते. परंतु शहरी भागात कावळ्यांच्या संख्येत घट होत असल्याने आता काकस्पर्श दुर्लभ झाला आहे. धर्मशास्त्रात जन्म ते मृत्यू या दरम्यानच्या काळात विविध धार्मिक कार्यांना महत्व आहे.एकेकाळी पितृपक्ष पंधरवडा म्हटला की, गावात दररोज घरोघरी पंगती उठायच्या. आजच्या धकाधकीच्या युगात केवळ घरच्या घरी पित्रे जेवू घालण्याची पद्धत वाढू लागल्याने पितृपक्षातील पंगती आता ग्रामीण असो वा शहरी भागात दुर्मिळ झाल्या आहेत.भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून साजरा केला जातो. या पंधरवड्यात हिंदूधर्मीय आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालत असतात. आजपासून काही वर्षे अगोदरपर्यंत पितृपक्ष म्हटला की ग्रामीण भागात घरोघरी पंगती उठविल्या जायच्या. घरातील गृहिणी दिवसभर स्वयंपाकात व्यस्त असायच्या. रात्री उशिरापर्यंत गल्लोगल्ली पंगतींची एकच लगबग चालायची. वरण,भात, कढी वडे, अळूच्या पानांच्या वड्या, खीर व तीन चार प्रकारच्या भाज्या अशा प्रकारचा पितरांचा खास मेनू असायचा आणि आजही आहे.आजच्या व्यस्त युगात कुणाच्या घरी जेवायला जायलाही वेळ मिळेनासा झाला आहे. शिवाय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एवढा स्वयंपाक करायचा कोणी हाही प्रश्न निर्माण झाल्याने आता घरच्या- घरी पितर ही पद्धत रुढ झाली आहे. पितृपक्षाला प्रारंभ होऊन एक आठवडा होत आला तरी पूर्वी असलेला जेवणावळीचा गलबला कुठेच ऐकू येत नाही. आज पितृपक्ष म्हणजे केवळ श्राद्ध घालण्याची औपचारिकता बनून राहिली आहे .रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ बाजूला काढून अनेकजण ही प्रथा पाळताना दिसतात, पण गच्चीवर, कौलावर, पत्रावर ठेवण्यात येणाऱ्या पदार्थांना यंदा महागाईचा स्पर्श झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा खाली होताना दिसत आहे.महागाईच्या काळात श्राद्धासाठी लागणारा मेनू सांभाळताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहेपितरांना जेवू घालताना साधारणत: दोन ते तीन हजारावर येणारा खर्च आज दुपटीने वाढला आहे. त्यामुळे श्राद्धाचे बजेट कसे सांभाळावे असा प्रश्न पडला आहे. महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले असले तरी पारंपरिक पद्धतीने आपापल्या परीने श्राद्ध घालण्यात येत आहे