शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पितरांच्या पिंडाना महागाईचा काकस्पर्श...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:32 IST

पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध केले जाते. यात पिंडाला (घास) काकस्पर्श होणे महत्त्वाचे मानले जाते. परंतु शहरी भागात कावळ्यांच्या संख्येत घट होत असल्याने आता काकस्पर्श दुर्लभ झाला आहे.

ठळक मुद्देआजच्या व्यस्त युगात कुणाच्या घरी जेवायला जायलाही वेळ मिळेनासा झाला आहे.श्राद्धासाठी लागणारा मेनू सांभाळताना गृहिणीची तारेवरची कसरत

अजय कोतकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध केले जाते. यात पिंडाला (घास) काकस्पर्श होणे महत्त्वाचे मानले जाते. परंतु शहरी भागात कावळ्यांच्या संख्येत घट होत असल्याने आता काकस्पर्श दुर्लभ झाला आहे. धर्मशास्त्रात जन्म ते मृत्यू या दरम्यानच्या काळात विविध धार्मिक कार्यांना महत्व आहे.एकेकाळी पितृपक्ष पंधरवडा म्हटला की, गावात दररोज घरोघरी पंगती उठायच्या. आजच्या धकाधकीच्या युगात केवळ घरच्या घरी पित्रे जेवू घालण्याची पद्धत वाढू लागल्याने पितृपक्षातील पंगती आता ग्रामीण असो वा शहरी भागात दुर्मिळ झाल्या आहेत.भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून साजरा केला जातो. या पंधरवड्यात हिंदूधर्मीय आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालत असतात. आजपासून काही वर्षे अगोदरपर्यंत पितृपक्ष म्हटला की ग्रामीण भागात घरोघरी पंगती उठविल्या जायच्या. घरातील गृहिणी दिवसभर स्वयंपाकात व्यस्त असायच्या. रात्री उशिरापर्यंत गल्लोगल्ली पंगतींची एकच लगबग चालायची. वरण,भात, कढी वडे, अळूच्या पानांच्या वड्या, खीर व तीन चार प्रकारच्या भाज्या अशा प्रकारचा पितरांचा खास मेनू असायचा आणि आजही आहे.आजच्या व्यस्त युगात कुणाच्या घरी जेवायला जायलाही वेळ मिळेनासा झाला आहे. शिवाय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एवढा स्वयंपाक करायचा कोणी हाही प्रश्न निर्माण झाल्याने आता घरच्या- घरी पितर ही पद्धत रुढ झाली आहे. पितृपक्षाला प्रारंभ होऊन एक आठवडा होत आला तरी पूर्वी असलेला जेवणावळीचा गलबला कुठेच ऐकू येत नाही. आज पितृपक्ष म्हणजे केवळ श्राद्ध घालण्याची औपचारिकता बनून राहिली आहे .रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ बाजूला काढून अनेकजण ही प्रथा पाळताना दिसतात, पण गच्चीवर, कौलावर, पत्रावर ठेवण्यात येणाऱ्या पदार्थांना यंदा महागाईचा स्पर्श झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा खाली होताना दिसत आहे.महागाईच्या काळात श्राद्धासाठी लागणारा मेनू सांभाळताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहेपितरांना जेवू घालताना साधारणत: दोन ते तीन हजारावर येणारा खर्च आज दुपटीने वाढला आहे. त्यामुळे श्राद्धाचे बजेट कसे सांभाळावे असा प्रश्न पडला आहे. महागाईच्या जमान्यात सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले असले तरी पारंपरिक पद्धतीने आपापल्या परीने श्राद्ध घालण्यात येत आहे