शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

पाचो:यात युती नाहीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:34 IST

आर.ओ. पाटील यांची स्पष्टोक्ती : शिवसेना मेळावा

पाचोरा :  जळगाव जिल्ह्यात भाजपाशी युती नाही, आणि पाचो:यात तर ती कदापिही होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी रविवारी येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले.   आगामी जि.प.- पं.स. निवडणुकीच्या  पाश्र्वभूमीवर पाचोरा- भडगाव तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिका:यांचा  मेळावा महालपुरे मंगल कार्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला मोठय़ा संख्येने शिवसैनिक हजर होते.  यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, पाचोरा- भडगाव मतदारसंघात विकासकामे झपाटय़ाने होत असून शिवसैनिक हा हाडाचा कार्यकर्ता आहे. यामुळे विकास हाच शिवसेनेचा अजेंडा असून  दोन्ही तालुक्यातून जि.प.-पं.स. च्या जागांवर  भगवाच फडकेल, असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.  आमदार पाटील यांनी पुढे सांगितले की, सरकारमध्ये सहभागी असलो तरी विरोधी व सत्ताधारी पक्ष अशी दुहेरी भूमिका शिवसेनेला पार पाडावी लागत आहे. कारण राज्यात मजबूत विरोधी पक्षच शिल्लक नाही.  काँग्रेस- राष्ट्रवादी नेत्याच्ंया कुंडल्या मुख्यमंत्र्यांना माहीत असून सरकारपुढे विरोधी पक्ष नामोहरम होतो.  यावेळी केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीचा परिणाम काय झाला, याबाबतचा खरपूस समाचार आमदार पाटील यांनी घेतला.  मेळाव्यात अरुण पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश सोमवंशी, गणेश परदेशी यांचीही भाषणे झाली.  प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले. यावेळी पाचोरा -भडगाव तालुक्यातील अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी , भाजपा कार्यकत्र्यानी शिवसेनेत प्रवेश केला.  मेळाव्याला दीपक राजपूत, ज्ञानेश्वर सोनार, नगराध्यक्ष संजय गोहील,  उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवदास पाटील, पंढरीनाथ पाटील, उध्दव मराठे, डॉ.एल.टी.पाटील, युवराज पाटील, डॉ.भरत पाटील,  दिनकर पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना वाघ तर आभार दीपक राजपूत यांनी मानले. (वार्ताहर)पाचोरा पीपल्स बँक संचालकांना खावी लागणार जेलची हवा 4पाचोरा पीपल्स बँकेत भ्रष्टाचार व हुकूमशाही आहे, यामुळे मनात आणले तर  सहा महिन्यात या बँकेच्या संचालकांना जेलची हवा खावी लागेल, असा गर्भित इशाराही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान या विधानाबाबत पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन अशोक संघवी यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरुन बोलताना सांगितले की, सभासदांनी आमच्या प्रामाणिकपणामुळे पूर्ण बहुमत दिले. आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा बँकेत सुरु असलेल्या व्यवहारांबाबत अधिक लक्ष घालावे. ते पराभव पचवू शकले नाही, यामुळेच ते असे आरोप करीत आहेत, असेही संघवी यांनी              स्पष्ट केले.