शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

खान्देशात पावणेदोन लाख शेतकºयांनी उतरविला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:32 IST

जळगाव/धुळे/ नंदुरबार : शेवटच्या क्षणापर्यंत शेतकºयांची धावपळ, बॅँका, कृषी विभागाच्या मदतीमुळे अडचणी दूर

ठळक मुद्दे जळगाव, धुळे, नंदुरबारातील शेतकºयांचा समावेशबँकामध्ये होती गर्दीमुदत वाढ मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव / धुळे / नंदुरबार : पंतप्रधान पीक विमा हप्ता भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ जुलै रोजी जिल्हाभरातील बॅँकांमध्ये मोठी गर्दी झाली होती. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पावणेदोन लाख शेतकºयांनी पीक विमा उतरविल्याची माहिती आहे.जळगाव जिल्ह्यात ६८ हजार शेतकºयांनी पीक विमा उतरविला. धुळे जिल्ह्यात अंदाजे ७० हजार तर नंदुरबार जिल्ह्यात यंदा ४२ हजार शेतकºयांनी पीक विमा काढल्याची माहिती आहे़पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची ३१ जुलै अखेरची मुदत होती. यासाठी ३० जुलै रोजी रविवारीदेखील बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या.जळगाव जिल्ह्यात ६८ हजार ३८४सोमवारी अखेरच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील शेतकºयांची संख्या कृषी विभागाकडून एकत्रित करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात ९० हजार ६७३.२९ हेक्टरसाठी ६८ हजार ३८४ शेतकºयांनी पीक विमा उतरविला.मुदतवाढीचा प्रतीक्षाया योजनेचा जास्तीत जास्त शेतकºयांना लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. मुदतवाढ मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.दरम्यान, सोमवारी आलेली आकडेवारी ही उद्या आणखी बदलण्याची शक्यता आहे. कारण अखेरचा दिवस असल्याने जिल्हा बँक रात्री उशिरापर्यंत हे अर्ज स्वीकारणार असल्याने १ आॅगस्ट रोजी नेमकी आकडेवारी स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले.धुळ्यात शेवटच्या दिवशी गर्दीपीक विमा हप्ता भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जिल्हाभरातील बॅँकांमध्ये मोठी गर्दी झाली होती. कोणी शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा व राष्टÑीयीकृत बॅँकांनी विशेष व्यवस्था केली होती. कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी बॅँकांमध्ये जाऊन अर्ज भरण्यास शेतकºयांना मदत केली. जिल्हा बॅँकेच्या धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात एकूण ९० शाखांमध्ये सर्व काउंटर्सवर पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्यात येत होती.उशिरापर्यंत थांबून कामकाजजिल्हा बॅँकेचे धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात सर्वाधिक कर्जदार शेतकरी सभासद आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आपल्या सर्व ९० शाखा कार्यालयांमध्ये कोणत्याही काउंटरवर पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्याच्या सूचना शाखाधिकाºयांना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अर्जासाठी कर्मचाºयांची मदतशेवटच्या दिवशी प्रत्यक्ष बॅँकांमध्ये काय परिस्थिती आहे, यासाठी आपण स्वत: पथकासह शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा, चिमठाणे, वीरदेल आदी विविध ठिकाणी असलेल्या बॅँकांमध्ये जाऊन माहिती घेतली.कृषी विभागाचे कर्मचारी बॅँकांमध्ये थांबून शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी तसेच काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनासाठी उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी दिली.पीक विम्यास प्राधान्यजिल्ह्यात राष्टÑीयकृत बॅँकांमध्येही शेतकºयांची पीक विमा हप्ता भरण्यासाठी तुरळक गर्दी होती. शेवटचा दिवस असल्याने या कामास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे कामकाज सुरू असल्याने कुठेही शेतकºयांना अडचण आली नाही, अशी माहिती अग्रणी (लीड) बॅँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर यांनी दिली.३१ जुलै हा अनेक कारणांसाठी सर्वांच्याच लक्षात राहिल. कारण आयकर रिटर्नसाठी ही शेवटची तारीख होती. शेतकºयांच्या पीक विम्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन होती. तसेच सध्या नवमतदारांची नोंदणी सुरू आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीखही ३१ जुलैच होती.