शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:38 IST

रावेर : ग्रामीण भागातील पाणी समस्या गंभीर, वीज वितरण प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

ठळक मुद्देथकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणची धडक कारवाईऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंतीराजकीय पक्षाचा हस्तक्षेप

आॅनलाईन लोकमतरावेर, जि़ जळगाव, दि, २८ - गेल्या आठवड्यापासून ७२ ग्रा. पं. च्या ९९ पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई महावितरणने केल्यानंतर, ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी काही राजकीय पक्षांनी हस्तक्षेप करून आंदोलन छेडले होते़ त्यामध्ये महावितरणचे कार्यकारी अभियंता मोरे यांच्याशी चर्चा करून थकीत रकमेचा पाचवा हिस्सा भरण्याऐवजी अंतिम दोन चालू बिल भरण्याचा शुक्रवारी तोडगा काढला होता. मात्र, केवळ ११ ग्रा.पं. वगळता ६१ ग्रा.पं. यंत्रणेने अद्यापही वीज बिले भरल्याने या गावांमधील नागरिक पाणीपुरवठ्याअभावी त्रस्त झाले आहेत़तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनांचे १९. ४४ कोटी रुपये वीज बिलांची रक्कम थकीत असून त्यापैकी रावेर उपविभागांतर्गत ७२ ग्रा.पं.च्या ९९ पाणीपुरवठा योजनांकडे १२.७४ कोटी रुपये थकीत होते. ही थकबाकी वसुलीसाठी उपकार्यकारी अभियंता गणेश अस्मर यांनी योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई बुधवारपासून केली होती. या कारवाईमुळे ग्रा. पं. यंत्रणेपेक्षा ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाल्याचे वस्तुनिष्ठ वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. त्यानुषंगाने शिवसेनेने त्याच दिवशी थेट तहसीलदार कार्यालयावर धडक देऊन ‘वीज जोडा पाणी पाजा’ आंदोलन छेडून शुक्रवारी सायंकाळी वीज संयोजन सुरू न केल्यास गुराढोरांसह तहसील कार्यालयात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश अस्मर यांच्यासोबत ग्रा.पं. प्रशासनाची तातडीने बैठक घेतली होती.बैठकीत जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी पं.स. सभापती माधुरी नेमाडे, जि.प. सदस्य कैलास सरोदे, उपसभापती अनिता चौधरी, पं.स. सदस्य पी.के. महाजन, जितेंद्र पाटील, कृउबा संचालक गोपाळ नेमाडे, श्रीकांत महाजन या पदाधिकाºयांसह थकीत वीज बिलांच्या किमान पाचव्या हिश्याची रक्कम न भरता थकीत दोन वीज बिलांची रक्कम भरण्याचा तोडगा काढला होता. सप्ताहभरापासून पाण्यासाठी ६१ गावांमधील ग्रामीण जनता पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहे.