शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

‘व्हर्टिकल गार्डन’च्या माध्यमातून मनपात होतेय ऑक्सिजन निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

सतरामजलीत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत उभारलेय व्हर्टिकल गार्डन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व किती ...

सतरामजलीत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत उभारलेय व्हर्टिकल गार्डन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व किती आहे, याचा प्रत्यय सर्वांनाच आला आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रमांचे आयाेजन करण्यात येते. महापालिकेत देखील २५ फुटांचे १६ वेगवेगळे स्टॅण्ड तयार करून ऑक्सिजन देणाऱ्या राेपांची लागवड करण्यात आल्यानेे सतरामजलीत हिरवळ अनुभवास येत आहे.

वाढते प्रदूषण लक्षात घेता जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने अनेक ठिकाणी कृत्रिमरीत्या ऑक्सिजन तयार करण्याचे काम देखील हाती घेण्यात आले. तसेच भविष्यात वाढणाऱ्या प्रदूषणामुळे देखील ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून अमृत अभियानांतर्गत गेल्या काही वर्षांपासून हरित क्षेत्रांची निर्मिती केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून शासनाने नागरिकांची प्रचंड वर्दळ असलेल्या ठिकाणांची निवड करत त्या ठिकाणी व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमातून ऑक्सिजन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी महापालिकेला १० लाखांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून २ लाख ८५ हजार रुपये व्हर्टिकल गार्डनसाठी खर्च केले जात आहेत.

मनपाच्या सर्व मजल्यांवर तयार झाले गार्डन

महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यापासून ते सतराव्या मजल्यापर्यंत व्हर्टिकल गार्डनसाठी स्टॅण्ड तयार करण्यात आले आहेत. सतरामजलीत एकूण १६ स्टॅण्ड लावण्यात आले आहेत. यात एक स्टॅण्ड २५ फुटांचे असून, त्यात सुमारे ८० ते १०० फुलांच्या राेपांची लागवड करण्यात आली आहे. या राेपांना २४ तास पाणी देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात आली आहे. महापालिकेच्या काही मजल्यांवर सध्या व्हर्टिकल गार्डनमधील हिरवळ नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

जनजागृतीवर हाेणार ३ लाख खर्च

गेल्या दोन महिन्यांपासून मनपाच्या प्रत्येक मजल्यावर हेच गार्डन उभारण्यात आले असून, काही मजल्यांवरील वृक्ष कोरडे पडले आहेत. गार्डनमध्ये लावण्यात येणारी वनस्पती पुण्याहून मागवली जात असते. ज्या ठिकाणी वनस्पती कोरडी पडली आहे, त्या ठिकाणी पुन्हा नव्याने या वनस्पतीची लागवड केली जाणार आहे. दरम्यान, पर्यावरणाचे संवर्धन झाल्यास ऑक्सिजन निर्मिती शक्य हाेणार आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण हाेणे गरजेचे आहे. याच उद्देशाने या कार्यक्रमातील उर्वरित ३ लाख रुपये जनजागृतीसाठी खर्च केले जाणार आहेत. यात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जाणार असल्याचे शाखा अभियंता चंद्रकांत साेनगिरे यांनी सांगितले.