शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हर्टिकल गार्डन’च्या माध्यमातून मनपात होतेय ऑक्सिजन निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

सतरामजलीत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत उभारलेय व्हर्टिकल गार्डन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व किती ...

सतरामजलीत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत उभारलेय व्हर्टिकल गार्डन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व किती आहे, याचा प्रत्यय सर्वांनाच आला आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रमांचे आयाेजन करण्यात येते. महापालिकेत देखील २५ फुटांचे १६ वेगवेगळे स्टॅण्ड तयार करून ऑक्सिजन देणाऱ्या राेपांची लागवड करण्यात आल्यानेे सतरामजलीत हिरवळ अनुभवास येत आहे.

वाढते प्रदूषण लक्षात घेता जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने अनेक ठिकाणी कृत्रिमरीत्या ऑक्सिजन तयार करण्याचे काम देखील हाती घेण्यात आले. तसेच भविष्यात वाढणाऱ्या प्रदूषणामुळे देखील ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून अमृत अभियानांतर्गत गेल्या काही वर्षांपासून हरित क्षेत्रांची निर्मिती केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून शासनाने नागरिकांची प्रचंड वर्दळ असलेल्या ठिकाणांची निवड करत त्या ठिकाणी व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमातून ऑक्सिजन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी महापालिकेला १० लाखांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून २ लाख ८५ हजार रुपये व्हर्टिकल गार्डनसाठी खर्च केले जात आहेत.

मनपाच्या सर्व मजल्यांवर तयार झाले गार्डन

महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यापासून ते सतराव्या मजल्यापर्यंत व्हर्टिकल गार्डनसाठी स्टॅण्ड तयार करण्यात आले आहेत. सतरामजलीत एकूण १६ स्टॅण्ड लावण्यात आले आहेत. यात एक स्टॅण्ड २५ फुटांचे असून, त्यात सुमारे ८० ते १०० फुलांच्या राेपांची लागवड करण्यात आली आहे. या राेपांना २४ तास पाणी देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात आली आहे. महापालिकेच्या काही मजल्यांवर सध्या व्हर्टिकल गार्डनमधील हिरवळ नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

जनजागृतीवर हाेणार ३ लाख खर्च

गेल्या दोन महिन्यांपासून मनपाच्या प्रत्येक मजल्यावर हेच गार्डन उभारण्यात आले असून, काही मजल्यांवरील वृक्ष कोरडे पडले आहेत. गार्डनमध्ये लावण्यात येणारी वनस्पती पुण्याहून मागवली जात असते. ज्या ठिकाणी वनस्पती कोरडी पडली आहे, त्या ठिकाणी पुन्हा नव्याने या वनस्पतीची लागवड केली जाणार आहे. दरम्यान, पर्यावरणाचे संवर्धन झाल्यास ऑक्सिजन निर्मिती शक्य हाेणार आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण हाेणे गरजेचे आहे. याच उद्देशाने या कार्यक्रमातील उर्वरित ३ लाख रुपये जनजागृतीसाठी खर्च केले जाणार आहेत. यात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जाणार असल्याचे शाखा अभियंता चंद्रकांत साेनगिरे यांनी सांगितले.