शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जिल्ह्यात पाच लाखांवर लोकांना मिळाले मोफत धान्य; पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

जळगाव : कोरोनाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. ...

जळगाव : कोरोनाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील ५ लाख १३ हजार १५० जणांना गहू, तांदळाचे वाटप करण्यात आले. मात्र नोव्हेंबरपर्यंतच हे वाटप झाले असले तरी यानंतर पुढे काय, अशी चिंता हाताला काम नसलेल्यांना लागली आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले. यामध्ये सर्वच व्यवहार, उद्योग बंद असल्याने अनेकांच्या हातचे काम गेले. इतकेच नव्हे चहा, खाद्यपदार्थ विक्रेते, पानटपरी चालत यांचेही उदरनिर्वाहाचे साधन बंद झाल्याने त्याच्यासमोर संकट उभे राहिले. अशावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू करण्यात येऊन यामध्ये सुरुवातीला एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या काळात पाच किलो तांदूळ वाटप करण्यात आले. त्यानंतर जुलैपासून ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंत तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वाटप करण्यात आले. नोव्हेंबरपर्यंत तर हे धान्य मिळाले, मात्र आता डिसेंबरपासून धान्य मिळणे बंद झाले आहे. अजूनही हाताला काम नसल्याने चिंता वाढली आहे.

व्यवसाय बंदच, आता पोट कसे भरणार?

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्यापही पाहिजे तसे व्यवहार पूर्वपदावर आलेले नाही. त्यामुळे चिंता तर राहणारच आहे. शाळा, महाविद्यालय पूर्णपणे सुरू झालेले नाही, त्यामुळे व्यवसाय पूर्वपदावर आलेले नाही. धान्य योजना अजूनही सुरू रहावी.

- मुकेश चौधरी

व्यवहार पूर्वपदावर नाही, पोटाची चिंता !

सध्या कोरोना कमी होत असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक व्यवहार सुरू झालेले नाही. त्यामुळे पोट भरण्याची चिंता तर राहणारच आहे. धान्य योजना बंद झाल्याने चिंता आणखी वाढली आहे. ही योजना यापुढेही सुरू ठेवावी, अशी अपेक्षा आहे.

- कासूबाई पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. डिसेंबर महिन्यापासून नियमित धान्य वाटप केले जाणार आहे.

- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी