शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रोगाच्या प्रादुर्भावामुळे पपई उत्पादक संघटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:20 IST

यामुळे पपई पिकांचे पाने पिवळी पडून पपई मळ्यावरच संकट ओढवले आहे. त्यामुळे तालुक्यातील पपई उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडल्याचे ...

यामुळे पपई पिकांचे पाने पिवळी पडून पपई मळ्यावरच संकट ओढवले आहे. त्यामुळे तालुक्यातील पपई उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. या पपई पिकावर औषधी फवारणी करूनही फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर व्हायरसचे प्रसार कमी करण्यासाठी रस शोषण किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यामुळे पपई पिकावर आंतर प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. असे आवाहन भडगाव तालुका कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुक्यात यावर्षीही भडगाव, टोणगाव, वडधे, कोठली, निंभोरा, पळासखेडे यासह काही गावांना शेतकऱ्यांनी पपई पिकाची लागवड केलेली आहे. पपई मळा कुठे पपयांनी फुलला आहे. तर कुठे पपई झाडांना पपई फळ लागून पपईचा मळा फुलायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी पपई पिकावर मेहनतीने व मोठा खर्च करून हिरवळीने पपईचे मळे ठिकठिकाणी फुलविल्याचे चित्र दिसून आले. मात्र मागील आठवड्यात सततचा पाऊस बरसल्याने व वातावरणात आर्द्रता आदीमुळे भडगाव, टोणगाव, वढधे, कोठली, निंभोरा यासह शेत शिवारात पपई पिकावर मिलीबग, दावणी, व्हायरस आदी रोगांनी आक्रमण केले आहे. शेतकरी या पपई पिकावर औषध फवारणी करूनही या रोगांना आटोक्यात आणू शकत नाहीत, अशी चर्चा पपई उत्पादक शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे. पपई पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत. तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भडगाव तालुक्यातील पपई नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून होत आहे. भडगाव टोणगाव शिवारात इंदल लालचंद परदेशी, संजय लालचंद परदेशी, वढधे येथील विजय लुभानसिंग राजपूत, कोठलीचे विनायक महादू पाटील, कांतीलाल माधवराव पाटील, महेंद्र भोजू पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांचे पपई पिकाचे भडगाव तालुक्यात नुकसान होताना दिसत आहे. शेतकरी मेटाकुटीला आला असून चांगलाच संकटात सापडला आहे. रस शोषण किडींमुळे व्हायरसचा प्रसार होत आहे. व्हायरसचे प्रसार कमी करण्यासाठी रस शोषण किडींचे नियंञण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आंतर प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. पपई पिकावर ईमामेक्टीन बेनझाईन, फिनोशॅड आदी औषधीची ४ ग्रम प्रती १० लीटर फवारणी करावी. यामुळे पपई पिकावरचा व्हायरस नष्ट करता येईल. शेतकऱ्यांनी याचा वापर करावा, असे आवाहन भडगाव तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया - भडगाव तालुक्यात जवळपास ५० हेक्टरपर्यंत पपई पिकाची लागवड केलेली आहे. मात्र सततचा पाऊस, आर्द्रता असणारे वातावरण त्यात रस शोषण किडींमुळे पपई पिकावर मिलीबग, व्हायरस आदी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरी शेतकऱ्यांनी आंतर प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. व्हायरसचे प्रसार कमी करण्यासाठी रस शोषण किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. बी. बी. गोरडे. तालुका कृषी अधिकारी भडगाव.