शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

शहरातील रस्ते दुरुस्तीसह इतर कामांचे होणार ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची अक्षरश चाळणी झाली असून, मनपाने पावसाळ्याचा तोंडावर केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांचेही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची अक्षरश चाळणी झाली असून, मनपाने पावसाळ्याचा तोंडावर केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांचेही पहिल्या पावसातच पितळ उघडे पडले होते. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर होणाऱ्या दुरुस्तीच्या कामात गुणवत्तेचा अभाव दिसून येत असल्याने मनपाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी येत्या काही महिन्यात शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामासह, नाल्यावरील संरक्षण भिंती व दुभाजकांच्या कामांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्याच्या तयारीत आहे.

अनेक दिवसांपासून शहरात मनपांतर्गत सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यातच रामदास कॉलनी परिसरात काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेली नाल्याची संरक्षण भिंतदेखील कोसळली होती. तर सद्यस्थितीत शहरातील दुरुस्त केलेल्या रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे मक्तेदारांनी केलेल्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मनपाकडून सर्व कामांचे ऑडिट केले जाणार आहे. याबाबत माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चादेखील केली आहे.

ऑडिटसाठी त्रयस्थ संस्थेला नेमणार

मनपाकडून लवकरच या शहरातील कामांचे ऑडिट करण्यात येणार आहे. हे ऑडिट एका त्रयस्थ संस्थेला दिले जाणार आहे. तसेच यासाठी मनपातील काही अधिकारी देखील नेमण्यात येणार आहेत. ऑडिटनंतर ज्या मक्तेदारांचे काम दर्जाहीन आढळून येणार अशा ठेकेदारांसह मनपा अभियंत्यावरदेखील कठोर कारवाई करण्याचे संकेतदेखील आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी गेला पाण्यात

१. महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत शहरातील रस्त्यांचा दुरुस्तीच्या कामांसाठी प्रभागनिहाय प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे एकूण ९ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. त्यानुसार शहरात केवळ ४ ते ५ कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत.

२. अनेक ठेकेदारांना कार्यादेश देऊनदेखील आपल्या प्रभागात मुदत संपूनदेखील कामांना सुरुवात केली नाही. तर ज्या ठेकेदारांनी कामे केली आहेत. त्या कामांची गुणवत्ता पहिल्याच पावसात उघडी पडली आहे. मनपाने रस्ते दुरुस्तीसाठी दिलेला ९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी अक्षरश: पाण्यात गेला आहे.

कोट..

शहरात पावसाळ्याआधी रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम अनेक ठिकाणी सुरूच झाले नाही. तर अनेक ठिकाणी झालेल्या कामाची गुणवत्तादेखील खराब आहे. अशा कामांचे ऑडिट करणे गरजेचे आहे. सुमार दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना आता चाप बसणे गरजेचे आहे.

- नितीन लढ्ढा, माजी महापौर