शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्ते दुरुस्तीसह इतर कामांचे होणार ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची अक्षरश चाळणी झाली असून, मनपाने पावसाळ्याचा तोंडावर केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांचेही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची अक्षरश चाळणी झाली असून, मनपाने पावसाळ्याचा तोंडावर केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांचेही पहिल्या पावसातच पितळ उघडे पडले होते. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर होणाऱ्या दुरुस्तीच्या कामात गुणवत्तेचा अभाव दिसून येत असल्याने मनपाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी येत्या काही महिन्यात शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामासह, नाल्यावरील संरक्षण भिंती व दुभाजकांच्या कामांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्याच्या तयारीत आहे.

अनेक दिवसांपासून शहरात मनपांतर्गत सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यातच रामदास कॉलनी परिसरात काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेली नाल्याची संरक्षण भिंतदेखील कोसळली होती. तर सद्यस्थितीत शहरातील दुरुस्त केलेल्या रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे मक्तेदारांनी केलेल्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मनपाकडून सर्व कामांचे ऑडिट केले जाणार आहे. याबाबत माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चादेखील केली आहे.

ऑडिटसाठी त्रयस्थ संस्थेला नेमणार

मनपाकडून लवकरच या शहरातील कामांचे ऑडिट करण्यात येणार आहे. हे ऑडिट एका त्रयस्थ संस्थेला दिले जाणार आहे. तसेच यासाठी मनपातील काही अधिकारी देखील नेमण्यात येणार आहेत. ऑडिटनंतर ज्या मक्तेदारांचे काम दर्जाहीन आढळून येणार अशा ठेकेदारांसह मनपा अभियंत्यावरदेखील कठोर कारवाई करण्याचे संकेतदेखील आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी गेला पाण्यात

१. महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत शहरातील रस्त्यांचा दुरुस्तीच्या कामांसाठी प्रभागनिहाय प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे एकूण ९ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. त्यानुसार शहरात केवळ ४ ते ५ कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत.

२. अनेक ठेकेदारांना कार्यादेश देऊनदेखील आपल्या प्रभागात मुदत संपूनदेखील कामांना सुरुवात केली नाही. तर ज्या ठेकेदारांनी कामे केली आहेत. त्या कामांची गुणवत्ता पहिल्याच पावसात उघडी पडली आहे. मनपाने रस्ते दुरुस्तीसाठी दिलेला ९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी अक्षरश: पाण्यात गेला आहे.

कोट..

शहरात पावसाळ्याआधी रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम अनेक ठिकाणी सुरूच झाले नाही. तर अनेक ठिकाणी झालेल्या कामाची गुणवत्तादेखील खराब आहे. अशा कामांचे ऑडिट करणे गरजेचे आहे. सुमार दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना आता चाप बसणे गरजेचे आहे.

- नितीन लढ्ढा, माजी महापौर