शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

मृत्यूचे तांडव ; शहरात एकाच दिवसात सहा रूग्ण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव पुन्हा सुरू झाले आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल १३ बाधितांचा बळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव पुन्हा सुरू झाले आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल १३ बाधितांचा बळी गेला. यामध्‍ये सर्वाधिक सहा मृत जळगाव शहरातील आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात नवीन १२२३ तर शहरात २४८ कोरोना बाध‍ित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा उद्रेक वाढला असून आता तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक असताना सुध्दा नागरिक ‘बिनधास्त’ असल्याचे चित्र शहरात बघायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय तीव्र स्वरूपात पसरत आहे. दुस-या लाटेत जशी रूग्ण संख्‍या वाढत आहे. तशीच मृत्यू होणा-यांचेही प्रमाण वाढत आहे. चार ते पाच दिवसांपासून दररोज आठ ते दहा बाधित रूग्णांचा बळी जात आहे. मंगळवारी १२ तर बुधवारी जिल्हयात १३ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बळीचा आकडा हा १५२६ एवढा झाला आहे. बुधवारी शहरात ६ बाधितांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ३५, ५३, ६५,७२ वर्षीय पुरूष व ७४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे, भुसावळ तालुक्यात दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात २० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

९०८ बाधितांची कोरोनावर मात

दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्‍या वाढत असली तरी, बरे होणा-यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. बुधवारी जिल्ह्यात १२२३ रूग्ण आढळून आले असले तरी ९०८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्‍यात आला आहे. शहरात सुध्‍दा २४८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आले आहे, पण दुसरीकडे २३५ जण कोरोनाला हरवून घरी परतले आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या ही आता ८० हजार ७८६ वर पोहोचली आहे तर एकूण बरे होणा-यांची संख्‍या ६८ हजार ९८१ एवढी आहे. आतापर्यंत जळगाव शहरात २१ हजार ९७५ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १८ हजार ६१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर ३५५ बाधितांचा मृत्यू झाला असून ३ हजार ७ बाधितांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

१० हजार २७९ बाधितांवर उपचार सुरू

सद्यस्थितीला जिल्ह्यातील १० हजार २७९ बाधितांवर उपचार सुरू आहे. यामध्‍ये ७ हजार ८३१ लक्षणे नसलेली तर २ हजार ४४८ लक्षणे असलेली रूग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा ८५.३९ टक्क्यांवर पोहोचला असून बुधवारी मृत्यू दर १.८९ टक्के होता. अजूनही ३५४ अहवाल प्रलंबित आहेत.

१४२ ॲक्टीव कंटेनमेंट झोन

जिल्ह्यात १४२ ॲक्टीवर कंटेनमेंट झोन आहेत. ग्रामीण क्षेत्रात ६०, शहरी क्षेत्रात ५२ तर मनपा क्षेत्रात ३० आहेत. एकूण १५२६ बाधित मृतांमध्ये ५० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींचा समावेश असून ती संख्‍या १३५४ एवढी आहे.

ओटू टॅंकमध्ये पुरेसा पुरवठा

जीएमसीत ओटू टॅंक व सिलेंडर या दोघांद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मुख्य इमारतीत पाइपलाईन असल्याने टॅंकद्वारे पुरवठा होतो तर इतर वॉर्डात सिलेंडरद्वारे पुरवठा करण्यात येत आहे. संपूर्ण रुग्णालय कोविड झाल्याने व सर्व वॉर्ड सुरु झाल्याने रुग्ण संख्या देखील वाढायला लागली आहे. ही परिस्थिती पाहता रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित करता यावा यासाठी बुधवारी ओटू टॅंकमध्ये १३ किलो लिटर लिक्विड भरण्यात आले तर सिलेंडरचा देखील मुबलक साठा असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दिली.

गरोदर माता पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले

दरम्यान, दुसऱ्या लाटेत गरोदर माता पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच बाळांना देखील कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जीएमसीत एएनसी वॉर्ड हा कोरोना बाधित गरोदर मातांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बाधित गरोदर महिलांची फिरवाफिरव नको व्हायला म्हणून ही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी २५ बेड तयार करण्यात आले आहे.

डॉक्टर रुजू

जीएमसीमधील ५० हुन अधिक डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी बाधित झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर जे रुग्ण बरे झाले आहे. त्यांनी सेवा द्यायला सुरवात केली आहे. बुधवारी बाधित डॉक्टरांपैकी एक तर राज्यातील प्रतिनियुक्तीतील डॉक्टरांपैकी २ डॉक्टर रुजू झाले आहे. त्यामुळे आता प्रतिनियुक्तीतील १० तर बाधित डॉक्टरांपैकी ८ डॉक्टर आतापर्यंत रुजू झाले आहे.

कर्तव्यावर तात्काळ रूजू व्हा

जे अधिकारी व कर्मचारी अर्जित राज, वैद्यकीय रजा तसेच किरकोळ रजेवर आहेत. त्यांनी तात्काळ कर्तव्यावर रजू व्हावे, असे आदेश अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी बुधवारी काढले आहे. तथापि, जे कर्मचारी रजेवर राहतील, त्यांच्यावर कारवाई करण्‍यात येईल,असेही आदेशात म्हटले आहे.