शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

नदीपात्रातील अतिक्रमण काढण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST

चाळीसगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे दुकाने, घरे यांची पडझड, शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

चाळीसगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे दुकाने, घरे यांची पडझड, शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी पूरग्रस्तांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

शनिवारी सकाळी मंत्री जयंत पाटील यांनी प्रथम शहरातील तितुर नदीकाठी असलेल्या परिसरातील वस्तीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील वाकडी, वाघडू, रोकडे, बाणगाव, जावळे, कोदगाव या गावांना भेट देऊन तेथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पाहणी दरम्यान त्यांनी नुकसाग्रस्त भागाचे शासनातर्फे पंचनामे सुरू आहेत, हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाने अलीकडेच जाहीर केलेल्या धोरणानुसार मदत दिली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

भविष्यात पुराच्या पाण्यापासून गावाचे संरक्षण करण्यासाठी नदीकाठच्या गावांना आवश्यकतेनुसार संरक्षण भिंती बांधण्यात येणार आहेत. तसेच शहरासह इतर ठिकाणी नदीकाठी विनापरवाना बांधकाम असलेले सर्व अतिक्रमण काढण्यात येणार आहे, तशी सूचना आपण जिल्हाधिकारी यांना देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासकीय यंत्रणांकडून सतर्कतेबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही मंत्री जयंत पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले.

त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समिती सभापती अजय पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, जि.प. सदस्य भूषण पाटील उपस्थित होते.