शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील अतिक्रमण काढण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST

चाळीसगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे दुकाने, घरे यांची पडझड, शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

चाळीसगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे दुकाने, घरे यांची पडझड, शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी पूरग्रस्तांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

शनिवारी सकाळी मंत्री जयंत पाटील यांनी प्रथम शहरातील तितुर नदीकाठी असलेल्या परिसरातील वस्तीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील वाकडी, वाघडू, रोकडे, बाणगाव, जावळे, कोदगाव या गावांना भेट देऊन तेथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पाहणी दरम्यान त्यांनी नुकसाग्रस्त भागाचे शासनातर्फे पंचनामे सुरू आहेत, हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाने अलीकडेच जाहीर केलेल्या धोरणानुसार मदत दिली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

भविष्यात पुराच्या पाण्यापासून गावाचे संरक्षण करण्यासाठी नदीकाठच्या गावांना आवश्यकतेनुसार संरक्षण भिंती बांधण्यात येणार आहेत. तसेच शहरासह इतर ठिकाणी नदीकाठी विनापरवाना बांधकाम असलेले सर्व अतिक्रमण काढण्यात येणार आहे, तशी सूचना आपण जिल्हाधिकारी यांना देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासकीय यंत्रणांकडून सतर्कतेबाबत वेळोवेळी सूचना देण्यात येतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही मंत्री जयंत पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले.

त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समिती सभापती अजय पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, जि.प. सदस्य भूषण पाटील उपस्थित होते.