जळगाव : निमखेडी शिवारातील हंजीर बायोटेक कंपनीने मनपाशी करारभंग केल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या.व्ही. एस. पाटील यांनी सोमवारी दिले. २00७ मध्ये मनपाने बीओटी तत्त्वावर या कंपनीशी घनकचरा प्रकल्पाचा करार केला होता. त्यासाठी कंपनीला निमखेडी शिवारात जागा दिली होती. मात्र, कंपनीने या कराराचा भंग करून प्रकल्प परस्पर बंद केला. त्यामुळे मनपातर्फे शहरातून संकलित होणार्या कचर्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे हजारो टन कचरा येथे साचला आहे. मनपाचा गुन्हा दाखल करण्याचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. मनपातर्फे अँड.केतन ढाके यांनी काम पाहिले. सचिन पाटील सुंदर ते ध्यान.. तरुण कुढापा मंडळाने स्थापन केलेली पांडुरंगाच्या वेशातील गणरायाची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हंजीर बायोटेकविरुद्ध गुन्हा दाखलचे आदेश
By admin | Updated: September 2, 2014 16:53 IST