शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिरसोलीत मृत्यूचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरसोली : रविवारी एकाच दिवशी येथे वेगवेगळ्या कारणांनी सहा जणांचा मृत्यू झाला असून यामुळे गावात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरसोली : रविवारी एकाच दिवशी येथे वेगवेगळ्या कारणांनी सहा जणांचा मृत्यू झाला असून यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने संपूर्ण गावात फवारणी करून तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

शिरसोली प्र. बो. येथील नाना लक्ष्मण वाघ ( कोतवाल, ५०) यांचा जळगाव येथे शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला व त्यांच्यावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना असा परीवार आहे.

दुसऱ्या एका घटनेत जाकीर समसुद्दीन पिंजारी (५४) यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार भाऊ असा परिवार आहे.

तसेच शिरसोली प्र. बो. येथील सखाऊद्दीन मुजाहीद्दीन शेख (६३) यांनाही ह्रदयविकाराचा झटका आल्याने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना घरी आणले असता घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिरसोली प्र. बो. येथील पाटील वाड्यातील मंडाबाई राजाराम पाटील (७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे. इंदिरा नगर भागातील जयवंता पंडित भिल (६५) यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परीवार आहे.

शिरसोली प्र. नं. येथील द्वारकाबाई दशरथ खलसे (बारी) (७०) यांची जळगाव येथे डोळ्यांची शस्रक्रिया करण्यात आली होती. परंतु तेथेच त्यांची प्रकृती खालावली व त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावरही जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शिरसोली येथे प्रथमच एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तपासणी मोहीम राबवा

शिरसोली येथे तापाची साथ सुरु असल्याने घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. गावातील रुग्णालयात गर्दी होत असून ग्रामपंचायतीने गावातील गटारी व परिसर स्वच्छ करुन सॅनेटाईजेशन करावे तर आरोग्य विभागाने ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करावे, अशी मागणी होत आहे.