शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

शिरसोलीत मृत्यूचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरसोली : रविवारी एकाच दिवशी येथे वेगवेगळ्या कारणांनी सहा जणांचा मृत्यू झाला असून यामुळे गावात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरसोली : रविवारी एकाच दिवशी येथे वेगवेगळ्या कारणांनी सहा जणांचा मृत्यू झाला असून यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने संपूर्ण गावात फवारणी करून तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

शिरसोली प्र. बो. येथील नाना लक्ष्मण वाघ ( कोतवाल, ५०) यांचा जळगाव येथे शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला व त्यांच्यावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना असा परीवार आहे.

दुसऱ्या एका घटनेत जाकीर समसुद्दीन पिंजारी (५४) यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार भाऊ असा परिवार आहे.

तसेच शिरसोली प्र. बो. येथील सखाऊद्दीन मुजाहीद्दीन शेख (६३) यांनाही ह्रदयविकाराचा झटका आल्याने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना घरी आणले असता घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिरसोली प्र. बो. येथील पाटील वाड्यातील मंडाबाई राजाराम पाटील (७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे. इंदिरा नगर भागातील जयवंता पंडित भिल (६५) यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परीवार आहे.

शिरसोली प्र. नं. येथील द्वारकाबाई दशरथ खलसे (बारी) (७०) यांची जळगाव येथे डोळ्यांची शस्रक्रिया करण्यात आली होती. परंतु तेथेच त्यांची प्रकृती खालावली व त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावरही जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शिरसोली येथे प्रथमच एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तपासणी मोहीम राबवा

शिरसोली येथे तापाची साथ सुरु असल्याने घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. गावातील रुग्णालयात गर्दी होत असून ग्रामपंचायतीने गावातील गटारी व परिसर स्वच्छ करुन सॅनेटाईजेशन करावे तर आरोग्य विभागाने ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करावे, अशी मागणी होत आहे.