शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

गळत्यांचा मुद्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसह प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 11:26 IST

पाणी टंचाई निर्माण झाल्यास मनपाच जबाबदार

ठळक मुद्देसर्व यंत्रणा असतना गळत्यांकडे दुर्लक्ष का ?

जळगाव : शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनींना असणाºया गळत्यांचा मुद्यावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी भाजपासह विरोधी शिवसेनेने देखील मनपा प्रशासनाला धारेवर धरले. स्थायी समितीत सर्वच सदस्यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत गळत्यांचा गंभीर प्रश्नाकडे वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर शहरात भिषण पाणी टंचाई निर्माण होईल व या टंचाईला केवळ मनपा प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचा इशारा दिला.अनेक महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी मनपाच्या पाईपलाईनीस गळत्या सुरु आहेत. याबाबत ‘लोकमत’ ने दोन दिवसांपासून नागरिकांकडून शहरातील गळत्यांबाबतची माहिती मिळवली असता, शहरात गल्लोगल्लीत असलेल्या गळत्यांमुळे दररोज हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आहे. ही भवायह स्थिती ‘लोकमत’ ने उघडकीस आणल्यानंतर मंगळवारी झालेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत देखील याचे पडसाद उमटलेले पहायला मिळाले.शहर अभियंता खडकेंना गळत्यांची संख्याच माहिती नाहीशहरातील विविध भागात असलेल्या गळत्यांबाबत शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी शहर अभियंता यांना शहरात किती गळत्या आहेत? याबाबतची माहिती मागितली. मात्र, खडके यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.त्यावर विष्णू भंगाळे यांनी प्रशासनाला धारेवर धरत, जे काम मनपाने करायला हवे होते. ते काम ‘लोकमत’ ने केले. तसेच सर्व गळत्यांची माहिती ‘लोकमत’ ने आपल्यापर्यंत पोहचवल्यानंतरही जर मनपाकडून कारवाई होत नसेल तर भविष्यात शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास त्याला केवळ मनपा प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे भंगाळे यांनी सांगितले.सर्व यंत्रणा असतना गळत्यांकडे दुर्लक्ष का ?मनपा पाणी पुरवठा विभागाकडे व्हॉल्व्हमॅन, कर्मचारी व इतर सर्व यंत्रणा उपलब्ध आहे. तरी गळत्या रोखण्यात अपयश का येत आहे ? असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. ‘लोकमत’ ने शहरातील गळत्या लक्षात आणून दिल्या असतील तर त्या गळत्या रोखण्याची जबाबदार मनपा पाणी पुरवठा विभागाची असल्याचेही लढ्ढा म्हणाले. हिवाळ्यातील चार महिन्यात धरणातील १८ टक्के जलसाठा कमी झाला असून, आता केवळ ३० टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उन्हाळ्यात भिषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने मनपाने गळत्यांची दुरुस्ती तत्काळ करावी अशी मागणी लढ्ढा यांनी केली.धडक मोहीम राबवा - जितेंद्र मराठेशहरातील गळत्यांबाबत लोकमतने १० जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर रायपूर, कंडारी या ठिकाणच्या मोठ्या गळत्या दुरुस्त करण्यात आल्या होत्या अशी माहिती सभापती जितेंद्र मराठे यांनी सभेत दिली. तसेच आता शहरातील ज्या भागात लहान-मोठ्या गळत्या आहेत. त्या गळत्या दुरुस्त करण्यासाठी धडक मोहीम राबविण्याचा सूचना मराठे यांनी मनपा पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.उपमहापौरांनीही दिले आदेश... ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी सकाळी १० वाजता मनपा पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके यांना आपल्या दालनात बोलावून घेत सर्व गळत्यांबाबतचा आढावा घेतला. तसेच ‘लोकमत’ ने निदर्शनास आणून दिलेल्या सर्व गळत्या दुरुस्त करण्याचे आदेश उपमहापौरांनी खडके यांना दिले. दोन दिवसात सर्व गळत्या दुरुस्त करण्यात येतील असे आश्वासन खडके यांनी उपमहापौरांनी दिले. याबाबत दोन दिवसात आपण परत आढावा घेणार असल्याचेही उपमहापौरांनी खडके यांना सांगितले. ‘लोकमत’ कडून नागरिकांच्या मदतीने