शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

गळत्यांचा मुद्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसह प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 11:26 IST

पाणी टंचाई निर्माण झाल्यास मनपाच जबाबदार

ठळक मुद्देसर्व यंत्रणा असतना गळत्यांकडे दुर्लक्ष का ?

जळगाव : शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनींना असणाºया गळत्यांचा मुद्यावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी भाजपासह विरोधी शिवसेनेने देखील मनपा प्रशासनाला धारेवर धरले. स्थायी समितीत सर्वच सदस्यांनी ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत गळत्यांचा गंभीर प्रश्नाकडे वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर शहरात भिषण पाणी टंचाई निर्माण होईल व या टंचाईला केवळ मनपा प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचा इशारा दिला.अनेक महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी मनपाच्या पाईपलाईनीस गळत्या सुरु आहेत. याबाबत ‘लोकमत’ ने दोन दिवसांपासून नागरिकांकडून शहरातील गळत्यांबाबतची माहिती मिळवली असता, शहरात गल्लोगल्लीत असलेल्या गळत्यांमुळे दररोज हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आहे. ही भवायह स्थिती ‘लोकमत’ ने उघडकीस आणल्यानंतर मंगळवारी झालेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत देखील याचे पडसाद उमटलेले पहायला मिळाले.शहर अभियंता खडकेंना गळत्यांची संख्याच माहिती नाहीशहरातील विविध भागात असलेल्या गळत्यांबाबत शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी शहर अभियंता यांना शहरात किती गळत्या आहेत? याबाबतची माहिती मागितली. मात्र, खडके यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.त्यावर विष्णू भंगाळे यांनी प्रशासनाला धारेवर धरत, जे काम मनपाने करायला हवे होते. ते काम ‘लोकमत’ ने केले. तसेच सर्व गळत्यांची माहिती ‘लोकमत’ ने आपल्यापर्यंत पोहचवल्यानंतरही जर मनपाकडून कारवाई होत नसेल तर भविष्यात शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास त्याला केवळ मनपा प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे भंगाळे यांनी सांगितले.सर्व यंत्रणा असतना गळत्यांकडे दुर्लक्ष का ?मनपा पाणी पुरवठा विभागाकडे व्हॉल्व्हमॅन, कर्मचारी व इतर सर्व यंत्रणा उपलब्ध आहे. तरी गळत्या रोखण्यात अपयश का येत आहे ? असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. ‘लोकमत’ ने शहरातील गळत्या लक्षात आणून दिल्या असतील तर त्या गळत्या रोखण्याची जबाबदार मनपा पाणी पुरवठा विभागाची असल्याचेही लढ्ढा म्हणाले. हिवाळ्यातील चार महिन्यात धरणातील १८ टक्के जलसाठा कमी झाला असून, आता केवळ ३० टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उन्हाळ्यात भिषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने मनपाने गळत्यांची दुरुस्ती तत्काळ करावी अशी मागणी लढ्ढा यांनी केली.धडक मोहीम राबवा - जितेंद्र मराठेशहरातील गळत्यांबाबत लोकमतने १० जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर रायपूर, कंडारी या ठिकाणच्या मोठ्या गळत्या दुरुस्त करण्यात आल्या होत्या अशी माहिती सभापती जितेंद्र मराठे यांनी सभेत दिली. तसेच आता शहरातील ज्या भागात लहान-मोठ्या गळत्या आहेत. त्या गळत्या दुरुस्त करण्यासाठी धडक मोहीम राबविण्याचा सूचना मराठे यांनी मनपा पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.उपमहापौरांनीही दिले आदेश... ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी सकाळी १० वाजता मनपा पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके यांना आपल्या दालनात बोलावून घेत सर्व गळत्यांबाबतचा आढावा घेतला. तसेच ‘लोकमत’ ने निदर्शनास आणून दिलेल्या सर्व गळत्या दुरुस्त करण्याचे आदेश उपमहापौरांनी खडके यांना दिले. दोन दिवसात सर्व गळत्या दुरुस्त करण्यात येतील असे आश्वासन खडके यांनी उपमहापौरांनी दिले. याबाबत दोन दिवसात आपण परत आढावा घेणार असल्याचेही उपमहापौरांनी खडके यांना सांगितले. ‘लोकमत’ कडून नागरिकांच्या मदतीने