शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

राष्ट्रवादी, सेनेला खाते उघडण्याची संधी

By admin | Updated: October 8, 2014 11:48 IST

अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कॉँग्रेस, जनता पक्ष, जनता दल व भाजप एवढेच नाही, तर अपक्षालाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे.

अतुल जोशी ■ अमळनेर
 
अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कॉँग्रेस, जनता पक्ष, जनता दल व भाजप एवढेच नाही, तर अपक्षालाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. या वेळी कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना हे चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असून, राष्ट्रवादी व शिवसेनेला मतदारसंघात खाते उघडण्याची संधी मिळालेली आहे. या संधीचा फायदा हे दोघे पक्ष कितपत घेतात ते निकालानंतर समजेल. असे असले तरी या मतदारसंघावर पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप व कॉँग्रेसनेही कंबर कसलेली आहे.
१९५२ पासून २00९ पर्यंत १३ वेळा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. यात सर्वाधिक सहा वेळेस कॉँग्रेसने या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. त्याखालोखाल भाजपाने तीन वेळा, जनता पक्षाने दोन वेळा, जनता दल व अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक-एक वेळेस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भाजपाने मिळविले यश
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर या पक्षाने अमळनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा १९९0 मध्ये निवडणूक लढविली. सेनेतर्फे निवडणूक लढविणारे डी.एम. सुतार या गैरमराठा उमेदवाराने अन्य उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवित, तब्बल २0 हजारांपेक्षा अधिक मते घेतल्याचे सांगण्यात येते. यानंतर राज्यात भाजप-सेना युती झाल्याने, सेनेने हा मतदारसंघ भाजपाला सोडला. तेव्हापासून या मतदारसंघावर भगवा फडकला. मिळालेल्या संधीचे भाजपने सोने करीत, तीन वेळा मतदारसंघाचे एकाच उमेदवाराने प्रतिनिधित्व केले.
मे १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षातर्फे निवडणूक लढविण्यात आलेली नसली तरी त्यांनी अपक्षाला पाठिंबा दिला होता. २00४ व २00९ मध्ये आघाडी असल्याने, कॉँग्रेसने या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीने सहकार्याचीच भूमिका बजावली.
आता २0१४च्या निवडणुकीत आघाडी नाही की युती नाही. भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे जनमत अजमावित आहेत. राष्ट्रवादी पक्ष पहिल्यांदाच आपल्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने या पक्षाला अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळालेली असून, त्याचे रूपांतर खाते उघडण्यात होईल का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिवसेना स्वतंत्रपणे दुसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जात असून, सेना विजयाचे शिवधनुष्य उचलून खाते उघडणार का? याकडेही लक्ष लागले आहे. कॉँग्रेसला सातव्यांदा, तर भाजपाला हातचा गेलेला मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची संधी स्वतंत्र लढण्यामुळे मिळाली आहे. अपक्ष उमेदवाराचेही कडवे आव्हान आहे. त्यामुळे चुरशीच्या होणार्‍या लढतीत कोण बाजी मारणार ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.