शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी, सेनेला खाते उघडण्याची संधी

By admin | Updated: October 8, 2014 11:48 IST

अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कॉँग्रेस, जनता पक्ष, जनता दल व भाजप एवढेच नाही, तर अपक्षालाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे.

अतुल जोशी ■ अमळनेर
 
अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कॉँग्रेस, जनता पक्ष, जनता दल व भाजप एवढेच नाही, तर अपक्षालाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. या वेळी कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना हे चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असून, राष्ट्रवादी व शिवसेनेला मतदारसंघात खाते उघडण्याची संधी मिळालेली आहे. या संधीचा फायदा हे दोघे पक्ष कितपत घेतात ते निकालानंतर समजेल. असे असले तरी या मतदारसंघावर पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप व कॉँग्रेसनेही कंबर कसलेली आहे.
१९५२ पासून २00९ पर्यंत १३ वेळा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. यात सर्वाधिक सहा वेळेस कॉँग्रेसने या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. त्याखालोखाल भाजपाने तीन वेळा, जनता पक्षाने दोन वेळा, जनता दल व अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक-एक वेळेस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भाजपाने मिळविले यश
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर या पक्षाने अमळनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा १९९0 मध्ये निवडणूक लढविली. सेनेतर्फे निवडणूक लढविणारे डी.एम. सुतार या गैरमराठा उमेदवाराने अन्य उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवित, तब्बल २0 हजारांपेक्षा अधिक मते घेतल्याचे सांगण्यात येते. यानंतर राज्यात भाजप-सेना युती झाल्याने, सेनेने हा मतदारसंघ भाजपाला सोडला. तेव्हापासून या मतदारसंघावर भगवा फडकला. मिळालेल्या संधीचे भाजपने सोने करीत, तीन वेळा मतदारसंघाचे एकाच उमेदवाराने प्रतिनिधित्व केले.
मे १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षातर्फे निवडणूक लढविण्यात आलेली नसली तरी त्यांनी अपक्षाला पाठिंबा दिला होता. २00४ व २00९ मध्ये आघाडी असल्याने, कॉँग्रेसने या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीने सहकार्याचीच भूमिका बजावली.
आता २0१४च्या निवडणुकीत आघाडी नाही की युती नाही. भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे जनमत अजमावित आहेत. राष्ट्रवादी पक्ष पहिल्यांदाच आपल्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने या पक्षाला अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळालेली असून, त्याचे रूपांतर खाते उघडण्यात होईल का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिवसेना स्वतंत्रपणे दुसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जात असून, सेना विजयाचे शिवधनुष्य उचलून खाते उघडणार का? याकडेही लक्ष लागले आहे. कॉँग्रेसला सातव्यांदा, तर भाजपाला हातचा गेलेला मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची संधी स्वतंत्र लढण्यामुळे मिळाली आहे. अपक्ष उमेदवाराचेही कडवे आव्हान आहे. त्यामुळे चुरशीच्या होणार्‍या लढतीत कोण बाजी मारणार ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.