शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

इंजिनिअरिंगच्या मागे धावण्यापेक्षा डिप्लोमा करून कारखाना काढा: श्रीरंग गोखले यांनी दिला यशाचा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:58 IST

लोकमत मुलाखत- सुशील देवकर

जळगाव: अभियांत्रिकीच्या क्षेत्रात प्रत्येकजण बीई करून एमबीएच्या मागे धावत आहे. मात्र हे केवळ स्वत:ची उर्जा वाया घालविणे आहे. त्यापेक्षा तांत्रिक शिक्षणच हवे असेल तर डिप्लोमा किंवा आयटीआय करून दोन वर्ष कामाचा अनुभव घ्यावा आणि स्वत:चा कारखाना काढावा, आयुष्य यशस्वी होईल, असे मत पुणे येथील प्रेरणादायी मार्गदर्शक व ‘कल्पकतेचे दिवस’ या पुस्तकाचे लेखक श्रीरंग गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगावात आलेल्या गोखले यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांचे करिअर, शिक्षणपद्धती, उद्योजकता आदी मुद्यांवर मनमोकळेपणे माहिती दिली. त्यांच्याशी झालेला संवाद पुढील प्रमाणे.प्रश्न: युवकांचा त्यातही महाराष्टÑीयन युवकांचा कल उद्योगाकडे कमी आहे. त्याबद्दल काय सांगाल?गोखले: यासाठी शिक्षण पद्धती कारणीभूत आहे. घोकंपट्टी, मार्क्स ओरियंटेड शिक्षणपद्धतीमुळे शिक्षणाचे रूपांतर विद्यार्थ्यांना व्यवहारात करता येत नाही. महाराष्टÑीयन लोकांची मानसिकता अजूनही उद्योगाला अनुकूल झालेली नाही. त्यातच स्पर्धा परिक्षांचे वातावरण निर्माण झाल्यानेही उद्योगाकडे कमी लोक वळतात. सुखासीनतेकडे कल आहे. हे चुकीचे आहे.प्रश्न: उद्योगाचे बाळकडू मिळत नाही, त्याचा हा परिणाम आहे का?गोखले: स्वयंरोजगार असलेले लोक आपल्याकडे आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील अगदीच कमी शिक्षीत सांगायच तर दूध विक्रेता हे स्वयंरोजगार असलेले लोक आहेत. मात्र रोजगार निर्माण करणारा उद्योग करायला कोणी लवकर धजावत नाहीत. कारण स्वत: हात काळे करण्याची तयारी नाही. धोका पत्करण्याची तयारी नाही. पास झालो की, शिपायाची खाली बसायला स्टुल आणि डोक्यावर पंखा असलेली नोकरी मिळाली तरी संतुष्ट! अशी मनोवृत्ती आहे. त्यात आता हळूहळू बदल होत आहे. ‘स्टार्टअप’साठी चांगले वातावरण तयार होत आहे. उपक्रमावर आधारित ( प्रोजेक्ट ओरियंटेड) शिक्षण लोकप्रिय झाले तर अधिक मोठ्या संख्येने उद्योजक तयार होतील. त्यासाठी आपण केवळ ब्रिटीश अथवा अमेरिकन शिक्षणपद्धतीच्याच किंवा परंपरागत शिक्षणपद्धतीच्याच मागे न धावता जर्मनी, जपान, तसेच इतरही अनेक देशांच्या शिक्षणपद्धतींशी तुलना केली पाहिजे.प्रश्न: अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात ‘सॅच्युरेशन’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबद्दल काय सांगाल?गोखले: निश्चितपणे ‘सॅच्युरेशन आहे. मात्र कोणीच काही करत नाही. अ‍ॅक्शन होताना दिसत नाही. दहावी पास व्हावे, तसेच विद्यार्थी बीई उत्तीर्ण होत आहेत. नोकरीच करायची तर डिप्लोमा झालेले चांगले. बीई होऊनही संधी मिळत नाहीत म्हणून एमबीए करतात. यात केवळ उर्जा वाया जाते. एमबीएचा काही उपयोग नाही. पुस्तक वाचून पोहोणे शिकण्याचा हा प्रकार आहे. अनुभव नाही, माहिती नाही ते एमबीए होतात. त्यामुळे मॅनेजमेंट या शब्दाची उद्योजकांना भितीच बसली आहे. त्यामुळे आवडत्या विषयात लवकरात लवकर कामाला लागा. नंतर डिग्री मिळवत बसा. माझ्या माहितीतले सगळे डिप्लोमा धारक यशस्वी झाले आहेत.प्रश्न: उद्योजक वाढावेत, यासाठी अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत का?गोखले: अभिांत्रिकीपेक्षाही व्होकेशनल कोर्सेस जास्त सुरू व्हायला हवेत. कारण इंजिनियर झालेल्या युवकांना पुस्तकी ज्ञान आहे. मात्र व्यावहारिक ज्ञान नाही. त्यामुळे परिस्थिती बिकट आहे. सध्या शासनाने सुरू केलेला डेकॅथॉन हा शिक्षण विभागाचा उपक्रम चांगला आहे. यात उद्योगांना आलेल्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर देण्यात येत आहे. त्यातून मुलांच्या कल्पकतेला चालना मिळणार आहे.