शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

इंजिनिअरिंगच्या मागे धावण्यापेक्षा डिप्लोमा करून कारखाना काढा: श्रीरंग गोखले यांनी दिला यशाचा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:58 IST

लोकमत मुलाखत- सुशील देवकर

जळगाव: अभियांत्रिकीच्या क्षेत्रात प्रत्येकजण बीई करून एमबीएच्या मागे धावत आहे. मात्र हे केवळ स्वत:ची उर्जा वाया घालविणे आहे. त्यापेक्षा तांत्रिक शिक्षणच हवे असेल तर डिप्लोमा किंवा आयटीआय करून दोन वर्ष कामाचा अनुभव घ्यावा आणि स्वत:चा कारखाना काढावा, आयुष्य यशस्वी होईल, असे मत पुणे येथील प्रेरणादायी मार्गदर्शक व ‘कल्पकतेचे दिवस’ या पुस्तकाचे लेखक श्रीरंग गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगावात आलेल्या गोखले यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांचे करिअर, शिक्षणपद्धती, उद्योजकता आदी मुद्यांवर मनमोकळेपणे माहिती दिली. त्यांच्याशी झालेला संवाद पुढील प्रमाणे.प्रश्न: युवकांचा त्यातही महाराष्टÑीयन युवकांचा कल उद्योगाकडे कमी आहे. त्याबद्दल काय सांगाल?गोखले: यासाठी शिक्षण पद्धती कारणीभूत आहे. घोकंपट्टी, मार्क्स ओरियंटेड शिक्षणपद्धतीमुळे शिक्षणाचे रूपांतर विद्यार्थ्यांना व्यवहारात करता येत नाही. महाराष्टÑीयन लोकांची मानसिकता अजूनही उद्योगाला अनुकूल झालेली नाही. त्यातच स्पर्धा परिक्षांचे वातावरण निर्माण झाल्यानेही उद्योगाकडे कमी लोक वळतात. सुखासीनतेकडे कल आहे. हे चुकीचे आहे.प्रश्न: उद्योगाचे बाळकडू मिळत नाही, त्याचा हा परिणाम आहे का?गोखले: स्वयंरोजगार असलेले लोक आपल्याकडे आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील अगदीच कमी शिक्षीत सांगायच तर दूध विक्रेता हे स्वयंरोजगार असलेले लोक आहेत. मात्र रोजगार निर्माण करणारा उद्योग करायला कोणी लवकर धजावत नाहीत. कारण स्वत: हात काळे करण्याची तयारी नाही. धोका पत्करण्याची तयारी नाही. पास झालो की, शिपायाची खाली बसायला स्टुल आणि डोक्यावर पंखा असलेली नोकरी मिळाली तरी संतुष्ट! अशी मनोवृत्ती आहे. त्यात आता हळूहळू बदल होत आहे. ‘स्टार्टअप’साठी चांगले वातावरण तयार होत आहे. उपक्रमावर आधारित ( प्रोजेक्ट ओरियंटेड) शिक्षण लोकप्रिय झाले तर अधिक मोठ्या संख्येने उद्योजक तयार होतील. त्यासाठी आपण केवळ ब्रिटीश अथवा अमेरिकन शिक्षणपद्धतीच्याच किंवा परंपरागत शिक्षणपद्धतीच्याच मागे न धावता जर्मनी, जपान, तसेच इतरही अनेक देशांच्या शिक्षणपद्धतींशी तुलना केली पाहिजे.प्रश्न: अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात ‘सॅच्युरेशन’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबद्दल काय सांगाल?गोखले: निश्चितपणे ‘सॅच्युरेशन आहे. मात्र कोणीच काही करत नाही. अ‍ॅक्शन होताना दिसत नाही. दहावी पास व्हावे, तसेच विद्यार्थी बीई उत्तीर्ण होत आहेत. नोकरीच करायची तर डिप्लोमा झालेले चांगले. बीई होऊनही संधी मिळत नाहीत म्हणून एमबीए करतात. यात केवळ उर्जा वाया जाते. एमबीएचा काही उपयोग नाही. पुस्तक वाचून पोहोणे शिकण्याचा हा प्रकार आहे. अनुभव नाही, माहिती नाही ते एमबीए होतात. त्यामुळे मॅनेजमेंट या शब्दाची उद्योजकांना भितीच बसली आहे. त्यामुळे आवडत्या विषयात लवकरात लवकर कामाला लागा. नंतर डिग्री मिळवत बसा. माझ्या माहितीतले सगळे डिप्लोमा धारक यशस्वी झाले आहेत.प्रश्न: उद्योजक वाढावेत, यासाठी अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत का?गोखले: अभिांत्रिकीपेक्षाही व्होकेशनल कोर्सेस जास्त सुरू व्हायला हवेत. कारण इंजिनियर झालेल्या युवकांना पुस्तकी ज्ञान आहे. मात्र व्यावहारिक ज्ञान नाही. त्यामुळे परिस्थिती बिकट आहे. सध्या शासनाने सुरू केलेला डेकॅथॉन हा शिक्षण विभागाचा उपक्रम चांगला आहे. यात उद्योगांना आलेल्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर देण्यात येत आहे. त्यातून मुलांच्या कल्पकतेला चालना मिळणार आहे.