शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

४३ लाख लोकसंख्येसाठी केवळ दोन निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याविषयी तसेच अन्न सुरक्षेसंदर्भात ज्या विभागावर मोठी जबाबदारी आहे, अशा अन्न व औषध प्रशासन विभागातच ...

जळगाव : जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याविषयी तसेच अन्न सुरक्षेसंदर्भात ज्या विभागावर मोठी जबाबदारी आहे, अशा अन्न व औषध प्रशासन विभागातच मनुष्यबळ अत्यंत कमी असल्याचे चित्र आहे. ४३ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यासाठी केवळ एक औषध व एक अन्न निरीक्षक असे दोनच निरीक्षक असून सहा पदे रिक्त आहेत. सहाय्यक आयुक्त (अन्न) हे एकच पद भरलेले असून सहाय्यक आयुक्त (औषध) हे पदही रिक्त आहे.

भौगोलिक व तालुक्यांच्या संख्येनुसारही जळगाव जिल्हा मोठा आहे. साधारण २०० कि.मी. जिल्ह्याची लांबी आहे. जवळपास ४३ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची मोठी जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. मात्र, या विभागात ना पुरेसे मनुष्यबळ आहे ना पुरेशी साधनसामग्री आहे. परिणामी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त ताण येण्यासाठी मोठ्या जिल्ह्यात वेळेवर कोठे पोहोचता येत नाही व तपासणीतही मोठ्या अडचणी येतात.

एक तपापासून स्वत:चे वाहन नाही

अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असलेल्या स्वत:च्या वाहनाची नोंदणीची मुदत २००८ मध्ये संपली व तेव्हापासून या विभागाकडे स्वत:चे वाहन नाही. जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर चाळीसगाव तालुक्यात जायचे झाल्यास ते अंतर १२० कि.मी. आहे. तेथे काही कारवाई करायची असल्यास एसटी बसने अधिकारी, कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच सर्व जिकडे-तिकडे होऊन जाते. अशाच प्रकारे जिल्ह्याला मध्यप्रदेशचीही सीमा लागून असून गुटख्याविरुद्ध कारवाई करायची झाल्यास या सीमेपर्यंतही पोहोचण्यास विलंब होतो.

तपासणीवर परिणाम

जिल्ह्यात २७०० मेडिकल दुकान असून त्यांच्या तपासणीसाठी केवळ एक औषध निरीक्षक आहे. तसे जिल्ह्यासाठी चार पदे मंजूर असून गेल्या कित्येक वर्षांपासून तीन पदे भरलीच जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मेडिकलच्या तपासणीविषयीदेखील अडचणी येतात. विशेष म्हणजे, सहायक आयुक्त (औषध) हे पददेखील रिक्त आहेच.

अन्नसुरक्षा राहणार कशी?

औषध निरीक्षकप्रमाणे अन्न निरीक्षकाचीही तीच स्थिती आहे. जिल्ह्यात १९०० हॉटेल असून इतर चहा, नाश्ता व इतर खाद्यपदार्थ विक्रीची लहान-मोठी हाॅटेल आहेत. त्यांच्या तपासणीसाठीदेखील केवळ एक अन्न निरीक्षक आहे. तसे जिल्ह्यासाठी हेदेखील चार पदे मंजूर असून गेल्या कित्येक वर्षांपासून तीन पदे भरलेच नाही.

न्यायालयाच्या कामकाजासाठी जातो वेळ

जिल्ह्यात ज्या काही कारवाया केल्या असतील त्यातील बरीच प्रकरणे ही न्यायालयात दाखल झालेली असतात. त्यामुळे सध्या कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कामकाजासाठीही वेळ द्यावा लागतो. परिणामी त्याचवेळी काही तपासणी करायची झाल्यास अडचणी येतात.

जिल्ह्याची लोकसंख्या - ४३, ०००००

जिल्ह्यातील मेडिकल्स - २७००

जिल्ह्यातील हॉटेल्स - १९००

औषध निरीक्षक -१

अन्न निरीक्षक - १

——————-

सध्या अन्न निरीक्षक व औषध निरीक्षक हे प्रत्येकी एक पद भरलेले आहे. सहायक आयुक्त (औषध) हे पददेखील रिक्त आहे. शिवाय विभागाकडे स्वत:चे वाहन नाही. यामुळे अनेक अडचणी येतात.

- वाय. के. बेंडकुळे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन