शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

४३ लाख लोकसंख्येसाठी केवळ दोन निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याविषयी तसेच अन्न सुरक्षेसंदर्भात ज्या विभागावर मोठी जबाबदारी आहे, अशा अन्न व औषध प्रशासन विभागातच ...

जळगाव : जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याविषयी तसेच अन्न सुरक्षेसंदर्भात ज्या विभागावर मोठी जबाबदारी आहे, अशा अन्न व औषध प्रशासन विभागातच मनुष्यबळ अत्यंत कमी असल्याचे चित्र आहे. ४३ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यासाठी केवळ एक औषध व एक अन्न निरीक्षक असे दोनच निरीक्षक असून सहा पदे रिक्त आहेत. सहाय्यक आयुक्त (अन्न) हे एकच पद भरलेले असून सहाय्यक आयुक्त (औषध) हे पदही रिक्त आहे.

भौगोलिक व तालुक्यांच्या संख्येनुसारही जळगाव जिल्हा मोठा आहे. साधारण २०० कि.मी. जिल्ह्याची लांबी आहे. जवळपास ४३ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची मोठी जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. मात्र, या विभागात ना पुरेसे मनुष्यबळ आहे ना पुरेशी साधनसामग्री आहे. परिणामी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त ताण येण्यासाठी मोठ्या जिल्ह्यात वेळेवर कोठे पोहोचता येत नाही व तपासणीतही मोठ्या अडचणी येतात.

एक तपापासून स्वत:चे वाहन नाही

अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असलेल्या स्वत:च्या वाहनाची नोंदणीची मुदत २००८ मध्ये संपली व तेव्हापासून या विभागाकडे स्वत:चे वाहन नाही. जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर चाळीसगाव तालुक्यात जायचे झाल्यास ते अंतर १२० कि.मी. आहे. तेथे काही कारवाई करायची असल्यास एसटी बसने अधिकारी, कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच सर्व जिकडे-तिकडे होऊन जाते. अशाच प्रकारे जिल्ह्याला मध्यप्रदेशचीही सीमा लागून असून गुटख्याविरुद्ध कारवाई करायची झाल्यास या सीमेपर्यंतही पोहोचण्यास विलंब होतो.

तपासणीवर परिणाम

जिल्ह्यात २७०० मेडिकल दुकान असून त्यांच्या तपासणीसाठी केवळ एक औषध निरीक्षक आहे. तसे जिल्ह्यासाठी चार पदे मंजूर असून गेल्या कित्येक वर्षांपासून तीन पदे भरलीच जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मेडिकलच्या तपासणीविषयीदेखील अडचणी येतात. विशेष म्हणजे, सहायक आयुक्त (औषध) हे पददेखील रिक्त आहेच.

अन्नसुरक्षा राहणार कशी?

औषध निरीक्षकप्रमाणे अन्न निरीक्षकाचीही तीच स्थिती आहे. जिल्ह्यात १९०० हॉटेल असून इतर चहा, नाश्ता व इतर खाद्यपदार्थ विक्रीची लहान-मोठी हाॅटेल आहेत. त्यांच्या तपासणीसाठीदेखील केवळ एक अन्न निरीक्षक आहे. तसे जिल्ह्यासाठी हेदेखील चार पदे मंजूर असून गेल्या कित्येक वर्षांपासून तीन पदे भरलेच नाही.

न्यायालयाच्या कामकाजासाठी जातो वेळ

जिल्ह्यात ज्या काही कारवाया केल्या असतील त्यातील बरीच प्रकरणे ही न्यायालयात दाखल झालेली असतात. त्यामुळे सध्या कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कामकाजासाठीही वेळ द्यावा लागतो. परिणामी त्याचवेळी काही तपासणी करायची झाल्यास अडचणी येतात.

जिल्ह्याची लोकसंख्या - ४३, ०००००

जिल्ह्यातील मेडिकल्स - २७००

जिल्ह्यातील हॉटेल्स - १९००

औषध निरीक्षक -१

अन्न निरीक्षक - १

——————-

सध्या अन्न निरीक्षक व औषध निरीक्षक हे प्रत्येकी एक पद भरलेले आहे. सहायक आयुक्त (औषध) हे पददेखील रिक्त आहे. शिवाय विभागाकडे स्वत:चे वाहन नाही. यामुळे अनेक अडचणी येतात.

- वाय. के. बेंडकुळे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन