शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

४३ लाख लोकसंख्येसाठी केवळ दोन निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याविषयी तसेच अन्न सुरक्षेसंदर्भात ज्या विभागावर मोठी जबाबदारी आहे, अशा अन्न व औषध प्रशासन विभागातच ...

जळगाव : जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याविषयी तसेच अन्न सुरक्षेसंदर्भात ज्या विभागावर मोठी जबाबदारी आहे, अशा अन्न व औषध प्रशासन विभागातच मनुष्यबळ अत्यंत कमी असल्याचे चित्र आहे. ४३ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यासाठी केवळ एक औषध व एक अन्न निरीक्षक असे दोनच निरीक्षक असून सहा पदे रिक्त आहेत. सहाय्यक आयुक्त (अन्न) हे एकच पद भरलेले असून सहाय्यक आयुक्त (औषध) हे पदही रिक्त आहे.

भौगोलिक व तालुक्यांच्या संख्येनुसारही जळगाव जिल्हा मोठा आहे. साधारण २०० कि.मी. जिल्ह्याची लांबी आहे. जवळपास ४३ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची मोठी जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे. मात्र, या विभागात ना पुरेसे मनुष्यबळ आहे ना पुरेशी साधनसामग्री आहे. परिणामी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त ताण येण्यासाठी मोठ्या जिल्ह्यात वेळेवर कोठे पोहोचता येत नाही व तपासणीतही मोठ्या अडचणी येतात.

एक तपापासून स्वत:चे वाहन नाही

अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असलेल्या स्वत:च्या वाहनाची नोंदणीची मुदत २००८ मध्ये संपली व तेव्हापासून या विभागाकडे स्वत:चे वाहन नाही. जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर चाळीसगाव तालुक्यात जायचे झाल्यास ते अंतर १२० कि.मी. आहे. तेथे काही कारवाई करायची असल्यास एसटी बसने अधिकारी, कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच सर्व जिकडे-तिकडे होऊन जाते. अशाच प्रकारे जिल्ह्याला मध्यप्रदेशचीही सीमा लागून असून गुटख्याविरुद्ध कारवाई करायची झाल्यास या सीमेपर्यंतही पोहोचण्यास विलंब होतो.

तपासणीवर परिणाम

जिल्ह्यात २७०० मेडिकल दुकान असून त्यांच्या तपासणीसाठी केवळ एक औषध निरीक्षक आहे. तसे जिल्ह्यासाठी चार पदे मंजूर असून गेल्या कित्येक वर्षांपासून तीन पदे भरलीच जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मेडिकलच्या तपासणीविषयीदेखील अडचणी येतात. विशेष म्हणजे, सहायक आयुक्त (औषध) हे पददेखील रिक्त आहेच.

अन्नसुरक्षा राहणार कशी?

औषध निरीक्षकप्रमाणे अन्न निरीक्षकाचीही तीच स्थिती आहे. जिल्ह्यात १९०० हॉटेल असून इतर चहा, नाश्ता व इतर खाद्यपदार्थ विक्रीची लहान-मोठी हाॅटेल आहेत. त्यांच्या तपासणीसाठीदेखील केवळ एक अन्न निरीक्षक आहे. तसे जिल्ह्यासाठी हेदेखील चार पदे मंजूर असून गेल्या कित्येक वर्षांपासून तीन पदे भरलेच नाही.

न्यायालयाच्या कामकाजासाठी जातो वेळ

जिल्ह्यात ज्या काही कारवाया केल्या असतील त्यातील बरीच प्रकरणे ही न्यायालयात दाखल झालेली असतात. त्यामुळे सध्या कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कामकाजासाठीही वेळ द्यावा लागतो. परिणामी त्याचवेळी काही तपासणी करायची झाल्यास अडचणी येतात.

जिल्ह्याची लोकसंख्या - ४३, ०००००

जिल्ह्यातील मेडिकल्स - २७००

जिल्ह्यातील हॉटेल्स - १९००

औषध निरीक्षक -१

अन्न निरीक्षक - १

——————-

सध्या अन्न निरीक्षक व औषध निरीक्षक हे प्रत्येकी एक पद भरलेले आहे. सहायक आयुक्त (औषध) हे पददेखील रिक्त आहे. शिवाय विभागाकडे स्वत:चे वाहन नाही. यामुळे अनेक अडचणी येतात.

- वाय. के. बेंडकुळे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन