शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीन गुन्ह्यातील आरोपी निघाला अखेर एकच

By admin | Updated: October 9, 2015 00:14 IST

नंदुरबार : व्यक्तिगत वादातून सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून तीन वेगवेगळ्या पोस्ट टाकून सामाजिक बदनामी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

नंदुरबार : व्यक्तिगत वादातून सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून तीन वेगवेगळ्या पोस्ट टाकून सामाजिक बदनामी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पोलिसांनी जिल्ह्यात दाखल तिन्ही सायबर गुन्ह्यांची उकल केली असून तिन्ही गुन्ह्यातील आरोपी एकच व्यक्ती असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडिया अर्थात फेसबुकच्या माध्यमातून आदिवासी समाज आणि एक तरुणी, तसेच राष्ट्रीय नेत्यांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून धार्मिक भावना भडकविण्यात आल्या होत्या. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. पहिल्या गुन्ह्यात एका मुलीच्या नावाने खोटी प्रोफाईल आयडी बनवून त्यावर नेत्यांविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. दुस:या गुन्ह्यात एका मुलाच्या नावाने खोटी प्रोफाईल आयडी बनवून आदिवासी समाजाच्या भावना दुखाविणारा मजकूर टाकला होता. याच प्रोफाईलवरून एका तरुणीबाबतही आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. नंदुरबार शहर व उपनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आदिवासी समाजाबाबतच्या पोस्टमुळे मोर्चे आणि बंदसारखे आंदोलन जिल्हाभर करण्यात आले होते.

तिन्ही गुन्ह्यांचा तांत्रिक तपास पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार सायबर सेलकडून सुरू होता. सर्व तांत्रिक बाबींचे वेिषण करून त्याआधारे तिन्ही गुन्ह्यांमध्ये एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यास अटकदेखील करण्यात आली. अटक करण्यात आलेल्याने त्याच्या वैयक्तिक वादातून खोटय़ा प्रोफाईल तयार करून सामाजिक व व्यक्तिगत बदनामी करणारे आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस अधीक्षक महेश घुर्ये, अपर अधीक्षक अनिता पाटील, उपविभागीय अधिकारी शिवाजी गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, शहर पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनगरचे प्रदीप ठाकूर, सायबर सेलचे प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, मोहन ढमढेरे यांनी तपास केला.

दरम्यान, समाजकंटक, विघAसंतोषी लोकांकडून त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा हेव्यादाव्यांसाठी, वैयक्तिक आकसापोटी माहिती व तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक, उच्चपदस्थ नेते, धार्मिक बाबी किंवा व्यक्तिगत पातळीवर बदनामी करणारे मजकूर टाकले जातात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सारासार विचार करून दुर्लक्ष करावे व अशी बाब निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे. पोलिसांकडून लागलीच दखल घेतली जाते. तांत्रिक तपासासाठी ठरावीक कालावधी लागतो; परंतु गुन्हेगारार्पयत पोलीस पोहचतातच. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर ज्ञानवृद्धीसाठी करावा, अशी अपेक्षाही पोलिसांनी व्यक्त केली.