शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

तीन गुन्ह्यातील आरोपी निघाला अखेर एकच

By admin | Updated: October 9, 2015 00:14 IST

नंदुरबार : व्यक्तिगत वादातून सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून तीन वेगवेगळ्या पोस्ट टाकून सामाजिक बदनामी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

नंदुरबार : व्यक्तिगत वादातून सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून तीन वेगवेगळ्या पोस्ट टाकून सामाजिक बदनामी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पोलिसांनी जिल्ह्यात दाखल तिन्ही सायबर गुन्ह्यांची उकल केली असून तिन्ही गुन्ह्यातील आरोपी एकच व्यक्ती असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडिया अर्थात फेसबुकच्या माध्यमातून आदिवासी समाज आणि एक तरुणी, तसेच राष्ट्रीय नेत्यांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून धार्मिक भावना भडकविण्यात आल्या होत्या. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. पहिल्या गुन्ह्यात एका मुलीच्या नावाने खोटी प्रोफाईल आयडी बनवून त्यावर नेत्यांविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. दुस:या गुन्ह्यात एका मुलाच्या नावाने खोटी प्रोफाईल आयडी बनवून आदिवासी समाजाच्या भावना दुखाविणारा मजकूर टाकला होता. याच प्रोफाईलवरून एका तरुणीबाबतही आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. नंदुरबार शहर व उपनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आदिवासी समाजाबाबतच्या पोस्टमुळे मोर्चे आणि बंदसारखे आंदोलन जिल्हाभर करण्यात आले होते.

तिन्ही गुन्ह्यांचा तांत्रिक तपास पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार सायबर सेलकडून सुरू होता. सर्व तांत्रिक बाबींचे वेिषण करून त्याआधारे तिन्ही गुन्ह्यांमध्ये एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यास अटकदेखील करण्यात आली. अटक करण्यात आलेल्याने त्याच्या वैयक्तिक वादातून खोटय़ा प्रोफाईल तयार करून सामाजिक व व्यक्तिगत बदनामी करणारे आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस अधीक्षक महेश घुर्ये, अपर अधीक्षक अनिता पाटील, उपविभागीय अधिकारी शिवाजी गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, शहर पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनगरचे प्रदीप ठाकूर, सायबर सेलचे प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, मोहन ढमढेरे यांनी तपास केला.

दरम्यान, समाजकंटक, विघAसंतोषी लोकांकडून त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा हेव्यादाव्यांसाठी, वैयक्तिक आकसापोटी माहिती व तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक, उच्चपदस्थ नेते, धार्मिक बाबी किंवा व्यक्तिगत पातळीवर बदनामी करणारे मजकूर टाकले जातात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सारासार विचार करून दुर्लक्ष करावे व अशी बाब निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे. पोलिसांकडून लागलीच दखल घेतली जाते. तांत्रिक तपासासाठी ठरावीक कालावधी लागतो; परंतु गुन्हेगारार्पयत पोलीस पोहचतातच. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर ज्ञानवृद्धीसाठी करावा, अशी अपेक्षाही पोलिसांनी व्यक्त केली.