शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

तीन गुन्ह्यातील आरोपी निघाला अखेर एकच

By admin | Updated: October 9, 2015 00:14 IST

नंदुरबार : व्यक्तिगत वादातून सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून तीन वेगवेगळ्या पोस्ट टाकून सामाजिक बदनामी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

नंदुरबार : व्यक्तिगत वादातून सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करून तीन वेगवेगळ्या पोस्ट टाकून सामाजिक बदनामी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पोलिसांनी जिल्ह्यात दाखल तिन्ही सायबर गुन्ह्यांची उकल केली असून तिन्ही गुन्ह्यातील आरोपी एकच व्यक्ती असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडिया अर्थात फेसबुकच्या माध्यमातून आदिवासी समाज आणि एक तरुणी, तसेच राष्ट्रीय नेत्यांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून धार्मिक भावना भडकविण्यात आल्या होत्या. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. पहिल्या गुन्ह्यात एका मुलीच्या नावाने खोटी प्रोफाईल आयडी बनवून त्यावर नेत्यांविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. दुस:या गुन्ह्यात एका मुलाच्या नावाने खोटी प्रोफाईल आयडी बनवून आदिवासी समाजाच्या भावना दुखाविणारा मजकूर टाकला होता. याच प्रोफाईलवरून एका तरुणीबाबतही आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. नंदुरबार शहर व उपनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आदिवासी समाजाबाबतच्या पोस्टमुळे मोर्चे आणि बंदसारखे आंदोलन जिल्हाभर करण्यात आले होते.

तिन्ही गुन्ह्यांचा तांत्रिक तपास पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार सायबर सेलकडून सुरू होता. सर्व तांत्रिक बाबींचे वेिषण करून त्याआधारे तिन्ही गुन्ह्यांमध्ये एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यास अटकदेखील करण्यात आली. अटक करण्यात आलेल्याने त्याच्या वैयक्तिक वादातून खोटय़ा प्रोफाईल तयार करून सामाजिक व व्यक्तिगत बदनामी करणारे आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस अधीक्षक महेश घुर्ये, अपर अधीक्षक अनिता पाटील, उपविभागीय अधिकारी शिवाजी गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, शहर पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनगरचे प्रदीप ठाकूर, सायबर सेलचे प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, मोहन ढमढेरे यांनी तपास केला.

दरम्यान, समाजकंटक, विघAसंतोषी लोकांकडून त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा हेव्यादाव्यांसाठी, वैयक्तिक आकसापोटी माहिती व तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक, उच्चपदस्थ नेते, धार्मिक बाबी किंवा व्यक्तिगत पातळीवर बदनामी करणारे मजकूर टाकले जातात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सारासार विचार करून दुर्लक्ष करावे व अशी बाब निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे. पोलिसांकडून लागलीच दखल घेतली जाते. तांत्रिक तपासासाठी ठरावीक कालावधी लागतो; परंतु गुन्हेगारार्पयत पोलीस पोहचतातच. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर ज्ञानवृद्धीसाठी करावा, अशी अपेक्षाही पोलिसांनी व्यक्त केली.