शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खासगीकरणामुळे फायदाच मात्र बँकांमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदाच्या अर्थसंकल्पात दोन बँकांचे खासगीकरण, सोबतच एलआयसीतील निर्गुंतवणूक हे महत्त्वाचे ठरले. त्यात आता बँकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यंदाच्या अर्थसंकल्पात दोन बँकांचे खासगीकरण, सोबतच एलआयसीतील निर्गुंतवणूक हे महत्त्वाचे ठरले. त्यात आता बँकांच्या खासगीकरणाने भविष्यात फायदाच होणार आहे. मात्र, बँकांमधील राजकीय हस्तक्षेप टाळायला हवा. त्यासोबतच नागरी बँका आणि मोठ्या पतसंस्थांनाही सरकारी योजनांमध्ये सहभागी करून घ्यायला हवे, असे मत ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पाचा बँकांच्या दृष्टीने काय अर्थ, बँकांचे खासगीकरण आणि सहकार क्षेत्राला होणारे त्याचे फायदे तोटे, यावर ‘लोकमत’ने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील शहर कार्यालयात मंगळवारी चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राला जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, सी.ए. कृष्णा कामटे, आर.जे. पवार, मधुकर पाटील, विजय जगताप, गोपाळ पाटील, चंद्रकांत जगताप, रमेश पवार, भीमराज चव्हाण, धरणगाव अर्बन बँकेचे प्रफुल्ल अग्निहोत्री, अभयकुमार ठाकरे उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले, तर ‘लोकमत’चे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आभार मानले.

यावेळी मान्यवरांनी सांगितले की, ‘सरकारी बँकांमध्ये एनपीएचे (थकीत कर्जाचे) प्रमाण वाढले आहे. त्यातच संघटित क्षेत्रातील कर्मचारी असल्याने ग्राहकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. एकेकाळी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता जो खासगीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचेही फायदे होणार आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारात आलेल्या उत्साहपूर्ण वातावरणाने दिसून आला. विमा क्षेत्रातदेखील परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे नजीकच्या काळात शेती नुकसानीसाठी द्यावा लागणारा सरकारी खर्चदेखील कमी होणार आहे.

आता बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सक्तीचे

खासगी बँकांमध्ये व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच सहकारात नागरी बँकांमध्ये संचालक मंडळासोबतच व्यवस्थापकीय मंडळदेखील असणार आहे. त्याची मुदत आता ३० जूनपर्यंत देण्यात आली आहे. त्यासाठी बँकांना त्यांच्या घटनांमध्ये बदल करावे लागतील. १०० कोटींचा व्यवसाय असलेल्या बँकेला बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सक्तीचे करण्यात आले आहे. हा बदल सहकारी बँकांनी स्वीकारावा. त्यामुळे ठेवीदारांचे हित संरक्षण होणार आहे.

बँकिंग क्षेत्रात जोखीम वाढली

सध्याच्या काळात जोखीम वाढली आहे. सहकारी बँकांमध्ये सक्षम संचालक असावे आणि बँकिंगमध्ये होणारे बदल हे तंत्रज्ञान संचालकांनी स्वीकारावेत, असेही मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.