शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

खासगीकरणामुळे फायदाच मात्र बँकांमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदाच्या अर्थसंकल्पात दोन बँकांचे खासगीकरण, सोबतच एलआयसीतील निर्गुंतवणूक हे महत्त्वाचे ठरले. त्यात आता बँकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यंदाच्या अर्थसंकल्पात दोन बँकांचे खासगीकरण, सोबतच एलआयसीतील निर्गुंतवणूक हे महत्त्वाचे ठरले. त्यात आता बँकांच्या खासगीकरणाने भविष्यात फायदाच होणार आहे. मात्र, बँकांमधील राजकीय हस्तक्षेप टाळायला हवा. त्यासोबतच नागरी बँका आणि मोठ्या पतसंस्थांनाही सरकारी योजनांमध्ये सहभागी करून घ्यायला हवे, असे मत ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पाचा बँकांच्या दृष्टीने काय अर्थ, बँकांचे खासगीकरण आणि सहकार क्षेत्राला होणारे त्याचे फायदे तोटे, यावर ‘लोकमत’ने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील शहर कार्यालयात मंगळवारी चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राला जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, सी.ए. कृष्णा कामटे, आर.जे. पवार, मधुकर पाटील, विजय जगताप, गोपाळ पाटील, चंद्रकांत जगताप, रमेश पवार, भीमराज चव्हाण, धरणगाव अर्बन बँकेचे प्रफुल्ल अग्निहोत्री, अभयकुमार ठाकरे उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले, तर ‘लोकमत’चे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आभार मानले.

यावेळी मान्यवरांनी सांगितले की, ‘सरकारी बँकांमध्ये एनपीएचे (थकीत कर्जाचे) प्रमाण वाढले आहे. त्यातच संघटित क्षेत्रातील कर्मचारी असल्याने ग्राहकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. एकेकाळी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता जो खासगीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचेही फायदे होणार आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारात आलेल्या उत्साहपूर्ण वातावरणाने दिसून आला. विमा क्षेत्रातदेखील परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे नजीकच्या काळात शेती नुकसानीसाठी द्यावा लागणारा सरकारी खर्चदेखील कमी होणार आहे.

आता बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सक्तीचे

खासगी बँकांमध्ये व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच सहकारात नागरी बँकांमध्ये संचालक मंडळासोबतच व्यवस्थापकीय मंडळदेखील असणार आहे. त्याची मुदत आता ३० जूनपर्यंत देण्यात आली आहे. त्यासाठी बँकांना त्यांच्या घटनांमध्ये बदल करावे लागतील. १०० कोटींचा व्यवसाय असलेल्या बँकेला बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सक्तीचे करण्यात आले आहे. हा बदल सहकारी बँकांनी स्वीकारावा. त्यामुळे ठेवीदारांचे हित संरक्षण होणार आहे.

बँकिंग क्षेत्रात जोखीम वाढली

सध्याच्या काळात जोखीम वाढली आहे. सहकारी बँकांमध्ये सक्षम संचालक असावे आणि बँकिंगमध्ये होणारे बदल हे तंत्रज्ञान संचालकांनी स्वीकारावेत, असेही मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.