शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

अभ्यासात खंड पडू नये म्हणून शाळांमध्ये ऑनलाइन परीक्षा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्‍याचा निर्णय नुकताच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्‍याचा निर्णय नुकताच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला असला, तरी सुध्दा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता टिकून रहावी व त्यांचा अभ्यासात खंड पडू नये म्हणून जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शाळांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच शाळा जवळपास बंदच आहेत. अजूनही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू झाले नाहीत. तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरू केल्या होत्या. केवळ, ऑनलाइन, ऑफलाइन, यूट्यूब, गुगलच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले होते. दरम्यान, देशातील मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे आवश्यक असते. मात्र, यंदा ते शक्य नाही. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

३ लाख मुलांचा तर २ लाख मुलींचा समावेश

जळगाव जिल्ह्यातील ३ हजार ३१९ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांमध्‍ये ६ लाख २३ हजार ९९६ विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना सरसकट पास निर्णयाचा लाभ होणार आहे. त्यात ३ लाख ३९ हजार ४६ मुलांचा तर २ लाख ८४ हजार ९५० मुलांचा समावेश आहेत.

काय आहे हेतू

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने परीक्षा जरी रद्द केल्या असल्या तरी काही शाळांमधून परीक्षा ह्या घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, यासोबतचं लेखन कौशल्यातील सातत्य टिकून रहावे, त्याचबरोबर जरी विद्यार्थी पुढल्या वर्गात गेला असला तरी त्याच्या बौध्दिक क्षमता, स्तर त्याच्या लक्षात येण्याकरिता मूल्यमापन आवश्यक आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्षातील आव्हांनाना खंबीरपणे व आत्मविश्वासाने उभ राहता यावे. ऑनलाइन परीक्षेतील गुगुल फॉर्ममुळे अचूक योग्य पर्याय निवडणे, यातून स्पर्धा परीक्षांची तयारी सुध्दा आघाने करता येत आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखत टेक्नॉलॉजीचा सुयोग्य वापर विद्यार्थी अनुभवत आहेत, अशी ऑनलाइन परीक्षांमागील भूमिका एका शिक्षकाने स्पष्ट केली.

मूल्यमापन हा शिक्षणाचा जर अविभाज्य घटक आहे तर आणि शाळा बंद, शिक्षण सुरू हे जर सूत्र आहे तर शाळांनी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा घेणे योग्यच म्हणायचं. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी त्या त्या विषयांचा अभ्यास करत ऑनलाइन पध्दतीने वा व्हॉट्सॲपद्वारे जर परीक्षा दिल्या तर त्यांनाही आपले मूल्यमापन होतेय, हे कळते. व पुढील इयत्तेच्या अभ्यासात त्यांना निश्चित फायदा होईल.

- चंद्रकांत भंडारी, शिक्षण तज्ज्ञ

सरसकट पास होणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या

तालुका विद्यार्थी संख्या

अमळनेर ४२८२६

भडगाव २३८७२

भुसावळ ४७०७७

बोदवड १२१८०

चाळीसगाव ६८८९६

चोपडा ४८१४९

धरणगाव २४८०६

एरंडोल २३८६३

जळगाव ग्रामीण ३४१७३

जळगाव शहर ७०३५२

जामनेर ५४१४७

मुक्ताईनगर २२९९८

पाचोरा ३३४४९

पारोळा २९६६३

रावेर ४३१५०

यावल ३५५०५