शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

कांदे, बटाटे झाले स्वस्त, किराणा साहित्याचेही दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात वधारलेल्या भाजीपाल्यासह कांदे, बटाट्याचे भाव कमी झाले असून किराणा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात वधारलेल्या भाजीपाल्यासह कांदे, बटाट्याचे भाव कमी झाले असून किराणा साहित्याचे दर स्थिर आहेत. त्यामुळे हा आठवडा सर्वांसाठी दिलासादायक ठरला. विशेष म्हणजे, मागणी कायम असताना भाव कमी झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात गेल्या आठवड्यात चांगलीच वाढ झाली होती. कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, कांदे यांचे भाव वाढण्यासह किराणा साहित्यात शेंगदाणे, तूप, मूग डाळ यांचेही भाव वधारले होते तर साखर स्वस्त झाली होती.

गेल्या आठवड्यात ११५ ते १२० रुपये प्रतिकिलोवर असलेले शेंगदणे या आठवड्यातही त्याच भावावर कायम आहेत. अशाच प्रकारे बेसणपीठदेखील ८५ ते ९० रुपये प्रतिकिलो, रवा ३५ ते ४० रुपये, मैदा ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहे. गेल्या आठवड्यात वनस्पती तुपाच्याही भावात वाढ होऊन ते ११० रुपयांवरून १२० ते १२५ रुपयांवर पोहोचले होते. तेदेखील कायम आहेत.

हिरवी मिरची, मेथी आवाक्यात

अनेक दिवसांपासून बटाट्याचे भाव चांगलेच वाढले होते. मात्र, नवीन बटाट्याची आवक वाढली असल्याने बटाटे २५ रुपये प्रतिकिलोवर आले आहे. यासोबतच हिरवी मिरची ३० ते ४० रुपये तर मेथीची भाजीही ३० ते ४० रुपये प्रतिकिलोवर आली आहे.

कोथिंबीरचे दर नियंत्रणात

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे ५० रुपये प्रतिकिलोवर कोथिंबीरचे दर पोहोचले होते. आता ते कमी होऊन ३० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

साखरेचा गोडवा

गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव पुन्हा वधारले होते. मात्र, या आठवड्यात ते कमी झाले आहेत. ५० रुपयांवरून कांद्याचे भाव ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. मध्यंतरी कांद्याने सर्वांच्याच डोळ्यात चांगलेत पाणी आणले होते. आता सर्वांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात भाजीपाला व किराणा साहित्याचे दर वाढल्याने चांगलाच बोझा वाढला होता. आता भाजापील्याचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

- दिलीप पाटील, ग्राहक

गेल्या आठवड्यात भाववाढ झालेल्या किराणा साहित्याचे भाव

या आठवड्यात स्थिर आहेत. विशेष म्हणजे, मागणी कायम असली तरी भाववाढ झालेली नाही.

- संजय वाणी, व्यापारी

अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात भाववाढ झालेल्या भाजीपाल्याचे भाव या आठवड्यात कमी झाले आहेत. कोथिंबीर, टोमॅटो, कांद्याचे भाव नियंत्रणात आले आहेत.

- रवी चौधरी, भाजीपाला विक्रेते