पहूर : ट्रक आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन त्यात गोविंद रामदास खुपसे (चाळीसगाव) हे ठार, तर त्यांच्या कुटुंबातील पाच वर्षांच्या मुलीसह पाच जण जखमी झाले. पहूरनजीक पहाटे पाच वाजता ही घटना घडली. चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील आशा गोविंद खुपसे (३०), सीमा (२९), गुंजन (५), राजू गोविंद खुपसे (३०), गोविंद रामदास खुपसे व चालक सोमनाथ मेटकर हे (एमएच १९/ बीजे ९६२६) या वाहनाने सोमनाथसाठी मुलगी पाहण्यासाठी अमरावतीला गेले होते. तेथून परतत असताना जामनेर रोडवरील कॉटन जिनजवळ पहाटे पाच वाजता (एमएच २०/एटी ६६६७) या ट्रकने धडक दिली. यात जखमी झालेले गोविंद रामदास खुपसे यांचा जळगाव येथे मृत्यू झाला. घटना पहाटेची असल्यामुळे जखमींना मदत मिळत नव्हती. शिवाजी रामदास पाटील या युवकाने त्यांना तत्काळ मदत केली. सरपंच प्रदीप लोढा, अरविंद देशमुख यांचेही सहकार्य मिळाले. जखमींवर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूषण बाबूलाल राठोड यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
अपघातात हिरापूरचा एक ठार
By admin | Updated: May 21, 2014 01:29 IST