शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सागर दुबे जळगाव : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सागर दुबे

जळगाव : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली. सोबतच दहावीचा निकाल जून अखेर घोषित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा दहावीतील सर्वच विद्यार्थी पास होणार असल्यामुळे शाळांचा शंभर टक्के निकाल लागेल, अशी प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ व शिक्षकांनी दिली.

राज्य शासनाने शुक्रवारी दहावीच्या निकालाचे सूत्र जाहीर केले. एकंदरीत नेहमीच शंभर टक्के निकाल लावण्यासाठी सर्व शाळांचे प्रयत्न सुरू असतात. कुठलाही विद्यार्थी नापास होउ नये यासाठी वारंवार सराव परीक्षा शाळांकडून घेतल्या जात असतात. मात्र, यंदा परीक्षा होणार नसल्यामुळे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे सर्वचं शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागेल.

=========

दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी (नाशिक विभाग)

जळगाव : ५८ हजार ३१७

नाशिक : ९३ हजार २२०

धुळे : २८ हजार ९५५

नंदुरबार : २१ हजार १८३

===========

बारावी परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी संख्या

जळगाव : ४९ हजार ४०३

विज्ञान : २० हजार १९४

कला : २० हजार ४९१

वाणिज्य : ६ हजार २९५

एमसीव्हीसी : २ हजार ४२३

==========

- ना बोर्ड हारा... ना स्कूल..

सध्याची स्थिती पाहता शासन निर्णय योग्य वाटतो. शालेय स्तरावरील शिक्षकांचे कामकाज थोडे वाढेल. शाळेत येवून निकाल तयार करण्‍यात अडचणी येतील. दुसरीकडे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांनी भरले आहे. ते कसे परत करणार याचा सुध्दा शासनाला विचार करावा लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने घेण्यात यावी व संपूर्ण प्रक्रिया जुलै आधीपूर्ण करावी, जेणे करून नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होतील.

- किशोर राजे, शिक्षण तज्ज्ञ

-------------

जो निकाल ९४ किंवा ९५ टक्के लागत होता. तो यंदा १०० टक्के लागणार आहे. ना बोर्ड हारा, ना स्कूल हारा अशी परिस्थिती यंदा पहायला मिळत आहे. नववी आणि आणि दहावीच्या गुणांच्या आधावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

- चंद्रकांत भंडारी, शिक्षण तज्ज्ञ

=========

परीक्षा रद्द झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. प्रश्न होता, निकाल कसे लावणार. मात्र, तो प्रश्न देखील शुक्रवारी राज्य शासनाने सोडविला. मूल्यमापनाच्या धोरणानुसार निकाल जाहीर केले जातील.

- मानव भालेराव, शिक्षक

------------

दहावीची परीक्षा महत्वाची असते. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन केले होते. ऑनलाइन शिक्षण मिळाले. पण, प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाइन शिक्षणात मोठा फरक असतो. शाळाकडून सुध्दा तीन ते चार वेळा सराव परीक्षा घेवून परीक्षेची तयारी करून घेतली होती. त्यामुळे परीक्षा व्हायला हव्या होत्या.

- हेमंत साळुंखे, विद्यार्थी

==========

- असे आहे निकालाचे सूत्र

विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.