शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

यंदा शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सागर दुबे जळगाव : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सागर दुबे

जळगाव : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली. सोबतच दहावीचा निकाल जून अखेर घोषित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा दहावीतील सर्वच विद्यार्थी पास होणार असल्यामुळे शाळांचा शंभर टक्के निकाल लागेल, अशी प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ व शिक्षकांनी दिली.

राज्य शासनाने शुक्रवारी दहावीच्या निकालाचे सूत्र जाहीर केले. एकंदरीत नेहमीच शंभर टक्के निकाल लावण्यासाठी सर्व शाळांचे प्रयत्न सुरू असतात. कुठलाही विद्यार्थी नापास होउ नये यासाठी वारंवार सराव परीक्षा शाळांकडून घेतल्या जात असतात. मात्र, यंदा परीक्षा होणार नसल्यामुळे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे सर्वचं शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागेल.

=========

दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी (नाशिक विभाग)

जळगाव : ५८ हजार ३१७

नाशिक : ९३ हजार २२०

धुळे : २८ हजार ९५५

नंदुरबार : २१ हजार १८३

===========

बारावी परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी संख्या

जळगाव : ४९ हजार ४०३

विज्ञान : २० हजार १९४

कला : २० हजार ४९१

वाणिज्य : ६ हजार २९५

एमसीव्हीसी : २ हजार ४२३

==========

- ना बोर्ड हारा... ना स्कूल..

सध्याची स्थिती पाहता शासन निर्णय योग्य वाटतो. शालेय स्तरावरील शिक्षकांचे कामकाज थोडे वाढेल. शाळेत येवून निकाल तयार करण्‍यात अडचणी येतील. दुसरीकडे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांनी भरले आहे. ते कसे परत करणार याचा सुध्दा शासनाला विचार करावा लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने घेण्यात यावी व संपूर्ण प्रक्रिया जुलै आधीपूर्ण करावी, जेणे करून नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होतील.

- किशोर राजे, शिक्षण तज्ज्ञ

-------------

जो निकाल ९४ किंवा ९५ टक्के लागत होता. तो यंदा १०० टक्के लागणार आहे. ना बोर्ड हारा, ना स्कूल हारा अशी परिस्थिती यंदा पहायला मिळत आहे. नववी आणि आणि दहावीच्या गुणांच्या आधावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

- चंद्रकांत भंडारी, शिक्षण तज्ज्ञ

=========

परीक्षा रद्द झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. प्रश्न होता, निकाल कसे लावणार. मात्र, तो प्रश्न देखील शुक्रवारी राज्य शासनाने सोडविला. मूल्यमापनाच्या धोरणानुसार निकाल जाहीर केले जातील.

- मानव भालेराव, शिक्षक

------------

दहावीची परीक्षा महत्वाची असते. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन केले होते. ऑनलाइन शिक्षण मिळाले. पण, प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाइन शिक्षणात मोठा फरक असतो. शाळाकडून सुध्दा तीन ते चार वेळा सराव परीक्षा घेवून परीक्षेची तयारी करून घेतली होती. त्यामुळे परीक्षा व्हायला हव्या होत्या.

- हेमंत साळुंखे, विद्यार्थी

==========

- असे आहे निकालाचे सूत्र

विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.