शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटींचे काम, तीन वर्ष झाले तरीही मनपा म्हणते थांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत तीन वर्षापूर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांचा निधीतून अद्यापही दमडीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत तीन वर्षापूर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांचा निधीतून अद्यापही दमडीच्या कामाला देखील अद्याप सुरुवात झालेली नाही. वर्षभरात शहराचा चेहरा-मोहरा बदलविणाऱ्या तत्कालीन सत्ताधारी असो, वा बंडखोरांच्या सहाय्याने महापालिकेत सत्तांतर करून सत्तेत आलेले विद्यमान सत्ताधारी असोत, दोन्हीही सत्ताधाऱ्यांकडून शहराचा विकासाला गती देणाऱ्या या निधीच्या पाठपुराव्यात पुर्णपणे अपयश आले आहे. मनपातील पदाधिकाऱ्यांचा हेवेदाव्यामुळे शहरातील नागरिकांना मुलभुत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

१६ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोथ्थान अंतर्गत शहरासाठी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. महापालिकेत सत्ता आल्यानंतर महिनाभरातच शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. या निधीतून रस्त्यांचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र, निधी मंजूर होवून तब्बल तीन वर्ष झाल्यावर देखील या निधीतून एक रुपयांच्याही कामाला सुरुवात झालेली नाही.

१०० कोटींचा असा प्रवास

- १६ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

- तब्बल सहा महिने या निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन नाही.

- फेब्रुवारी २०१९ मध्ये १०० कोटीतून होणाऱ्या कामांचे केले नियोजन

- ८ ऑगस्ट २०१९ मध्ये शासनाने १०० पैकी ४२ कोटींच्या कामांना दिली मंजूरी

- ५८ कोटींचे नवीन प्रस्ताव पाठविण्याचा दिल्या सूचना

-सप्टेंबर २०१९ मध्ये ४२ कोटीतून निविदांना मंजुरी

- ४ डिसेंबर २०१९ मध्ये विद्यमान राज्य शासनाने १०० कोटींच्या निधीच्या खर्चावर आणली स्थगिती

- २७ एप्रिल २०२० मध्ये ४२ कोटींच्या कामावरील स्थगिती उठली

- ४ मे २०२० मध्ये पुन्हा स्थगिती

- १३ जानेवारी २०२१ रोजी ४२ कोटींच्या कामांना राज्य शासनाकडून ग्रीन सिग्नल

- २७ जानेवारी २०२१ राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने पुन्हा आणली स्थगिती

- १२ मे २०२१ रोजी ४२ कोटींमधील कामे रद्द करून, पुर्ण १०० कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे करण्याचा मनपात ठराव

- जुलै २०२१ मध्ये ४२ कोटींचे कामे रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भाजपकडून न्यायालयात याचिका

सत्ताधारी कोणीही असो, निधी खर्च करण्यात ठरले अपयशी

१. महापालिकेला शासनाकडून निधी मंजुर झाल्यानंतर तो निधी खर्च करण्यात भाजप व शिवसेना अपयशी ठरले आहेत.

२. २५ कोटींचा निधी २०१६ मध्ये मंजुर होवून देखील हा निधी खर्च तब्बल चार वर्षात खर्च करण्यात आला. तसेच त्यातील ३ कोटी अद्यापही खर्च करण्यात आलेले नाही.

३. १०० कोटींचा निधी मंजूर होवून ३ वर्ष झाल्यावर देखील मनपातील पदाधिकाऱ्यांच्या हेवेदाव्यात निधी खर्चात अपयश आले आहे.

प्रशासन, पदाधिकारी दोषी, नुकसान मात्र जनतेचे

तब्बल पाच वर्षांपासून शहरातील खराब झालेल्या रस्त्यांवरून नागरिक दररोज जीवघेणी कसरत करत आहेत. निधीचे नियोजन करण्यात पदाधिकारी व मनपा प्रशासनातील अधिकारी दोषी असले तरी यामुळे जळगावकरांचे मात्र नुकसान होत आहे. रस्त्यांची कामे होत नसल्याने जळगावकर अक्षरश त्रस्त झाले आहेत.