शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी एक कोटींची निविदा, तीनच महिन्यात काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST

प्रश्न झाला बिकट : पंधरा दिवसात २७ जणांना चावा डमी १ हजार रुपये एका श्वानाच्या निर्बिजीकरणावर होणारा खर्च एका ...

प्रश्न झाला बिकट : पंधरा दिवसात २७ जणांना चावा

डमी

१ हजार रुपये

एका श्वानाच्या निर्बिजीकरणावर होणारा खर्च

एका कंपनीला देण्यात आला मक्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न अधिकच बिकट होत असून, गेल्या ११ महिन्यात शहरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात २७५ जण जखमी झाले आहेत तर एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मनपाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथील एका संस्थेला दीड कोटींचा मक्ता दिला होता. मात्र, केंद्र शासनाच्या ॲनिमल वेलफेअर समितीने प्राणीमित्रांच्या तक्रारीनंतर तीनच महिन्यात हे काम थांबवले आहे. या तीन महिन्यात मनपाकडून केवळ २०० भटक्या श्वानांवर ही शस्त्रक्रिया होऊ शकली.

मनपाने श्वानांच्या निर्बिजीकरणाचे काम थांबवून आता ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला असून, शहरातील भटक्या श्वानांची संख्या १९ हजारांच्या घरात गेली आहे. शहरात वाढत जाणाऱ्या या श्वानांकडून होणाऱ्या हल्ल्याचा घटना पाहता, नागरिकांमध्ये कमालीची भीती पाहायला मिळत आहे. शहरातील वाढीव भागात याचा सर्वाधिक धोका असून, याबाबत मनपाकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. केंद्र शासनाच्या ॲनिमल वेलफेअर या संस्थेनेच हे काम थांबविल्याने मनपाकडून शहरातील या भीषण समस्येबाबत आतापर्यंत कोणताही ठोस पाठपुरावा झालेला नाही.

हजारो श्वानांसाठी व्यवस्थाच नाही

शहरातील श्वानांची संख्या आता १९ हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, मनपाकडून कोणतेही नियोजन नसल्याने ही संख्या याच वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तसेच मनपाकडून आधी डॉग व्हॅनद्वारे श्वान पकडल्यानंतर त्यांना शहराबाहेर सोडण्यात येत होते. मात्र, हे कामदेखील आता बंद आहे.

वाघ नगर, शिवाजी नगर भागात दहशत

शहरातील वाढीव भागासह शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांलगत भटक्या श्वानांची सर्वाधिक भीती आहे. यामध्ये वाघ नगर भागात गेल्या पंधरा दिवसात भटक्या श्वानांनी हल्ला केल्याच्या १५पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. यासह निमखेडी, शिरसोली रस्ता, शिवाजी नगरसह कांचन नगर, आसोदा रोड, कानळदा रोड या परिसरातही श्वानांची सर्वाधिक भीती आहे.

दररोज ५ घटना

शहरातील भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यांच्या संख्येत आता दिवसेंदिवस वाढ होत असून, शहरात सरासरी अशा ५ घटना होत आहेत. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

कोट..

शहरातील समस्यांबाबत ॲनिमल वेलफेअर संस्थेशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असून, शहरातील भटक्या श्वानांच्या समस्येबाबतची माहिती दिली आहे. केंद्राकडून सूचना आल्यानंतर याविषयी तत्काळ नियोजन करण्यात येईल.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा