शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पुराने वाहून नेली १०० एकर शेतजमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:32 IST

पहूरच्या गोगडी नदीचा फटका :कपाशी, मका, भाजीपाल्यसह पिके पाण्यात

पहूर, ता. जामनेर : महसूल मंडळ परीसरात पावसाने कहर केला. गोगडी नदीला आलेल्या महापूरात नदीकाठाच्या दूतर्फा तब्बल शंभर एकर क्षेत्रावरील उभ्या पिकांसहित शेती वाहून गेली आहे. तर अन्य शिवारातील कपाशी, सोयाबीन पिके आजही पाण्यात असल्याने कापूस वेचणीही होणार नाही. मका, ज्वारी कणसे सडून गेले आहे. त्यामुळे कोट्यवधीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशा स्थितीत बांधावर बसून पिकांकडे पाहून रडण्यापलीकडे शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने शासनाच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.गेल्या आठवड्यत झालेल्या अवकाळी पावसामुळे पहूर आणि परिसरातील पंचवीस खेड्यातील शेतकºयांवर आसमानी संकट कोसाळले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.तेलही गेले.. तूपही गेले..हाती धुपटणे आले ..शेरी येथील रहिवासी मधुकर पांडुरंग बनकर हे भुमीहीन शेतकरी असून त्यांनी शेंगोळा शिवारात जमीन भाडेपट्टयाने केली आहे. मात्र तीन एकर जमिनीत मका सडून कणसांना कोंब आले आहे. कपाशीत पाणी असल्याने कापूस वेचणी करता येत नाही. बारा ते पंधरा एकर जमीनतील जवळपास पंधरा लाखांचे उत्पन्न पाण्यात गेले आहे. सध्या उत्पन्न तर सोडाच पण शेतीला लागलेला खर्चही निघणे अवघड आहे. त्यामुळे तेलही गेले.. तूपही गेले...हाती धुपाटणे आले अशी अवस्था शेतकºयांची झाली आहे.अनेकांची शेती वाहिलीगोगडी धरणाच्या जवळून खचार्णा पर्यंत वाहणाºया गोगडी नदीला गेल्या शनिवारी महापूर आला.यात नदीच्या दुतर्फा शंभर एकर क्षेत्रातील जमीनी सहित वाहून गेले आहे. युवराज पंडीत बनकर यांच्या साडेतीन एकर जमीनीतील कपाशी, मिरची,गिलके वाहून गेले आहे. ठिबकसंचही वाहून गेला. जमीन नदीपात्रासारखी दिसून येत आहे. याच काठावरील ओंकार पंडीत बनकर, नितीन रघुनाथ वारूळे अशा सत्तर शेतकºयांची जमीन पिकांसह वाहून गेली. शिवनगरशिवारातील एकनाथ संपत करंवदे यांचे वीस एकर क्षेत्रात कपाशी, सोयाबीन ,मिरची,गिलके पिकांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन सडल्याच्या अवस्थेत दिसून येत आहे. मिरची,गिलके नष्ट झाली आहे.सात हजार शेतकºयांच्याशेतातील नुकसानीचे पंचनामेपहूर मंडळातील १७ गावात १३ हजार ४६६ हेक्टर शेतीचे क्षेत्र असून १० हजार १०५ शेतकरी आहेत.पैकी ७ हजार २३७ शेतकºयांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे केले आहेत. राहिलेले पंचनामेही पूर्ण होत आले आहे. साडेतीन हजार हेक्टरवर मका तर १८ हजार ५०० हेक्टर कपाशी लागवड झाली आहे. तलाठी, ग्रामसेवक, क्रुषी साहाय्यक यांच्या माध्यमातून नुकसानबाधित क्षेत्रांचचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी सांगितले आहे.दरम्यान मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरूण शेवाळे यांनी पाहणी करण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.